शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

ई-कॉमर्स कंपन्यांच्या विक्रीवर प्रतिबंध आणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:07 IST

नागपूर : कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या कारणांनी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंची विक्री वगळता सर्व वस्तूंच्या ...

नागपूर : कोरोना संसर्ग वाढत असल्याच्या कारणांनी संपूर्ण राज्यात लॉकडाऊन आहे. या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंची विक्री वगळता सर्व वस्तूंच्या विक्रीवर बंदी आहे. पण या काळातही देश-विदेशातील ई-कॉमर्स कंपन्या सरकारी नियमांचे उल्लंघन करून अन्य वस्तूंची विक्री करीत आहेत. या कंपन्यांच्या विक्रीवर प्रतिबंध आणून मोबाईल विक्री थांबवावी, अशी मागणी रिटेल मोबाईल विक्रेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यासंदर्भात ऑल इंडिया मोबाईल रिटेल असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन त्यांचे लक्ष वेधले. असोसिएशनचे अध्यक्ष कैलास लखनानी आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत ऑनलाईन चर्चा केली आहे. पदाधिकाऱ्यांनी सांगितले, महाराष्ट्रात कठोर लॉकडाऊनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांना राज्य शासनाने आवश्यक वस्तूंच्या विक्रीची परवानगी दिली आहे. त्यानंतरही या कंपन्या मोबाईल, अ‍ॅक्सेसरीज आणि अन्य अनावश्यक वस्तूंची विक्री करीत आहेत. त्यामुळे रिटेल मोबाईल विक्रेत्यांवर परिणाम झाला आहे. सरकारने यासंदर्भात कठोर कारवाई करावी. ही बाब मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाला त्वरित सूचना करून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी असोसिएशनच्या विविध मागण्यांवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

मोबाईल विक्रीची दुकाने बंद असल्याने वीज बिलात निश्चित आकार शुल्कात सूट देण्याची मागणी असोसिएशनने केली. रिटेलर्स आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. त्यामुळे पुढे दुकानात ग्राहक येतील आणि सुरक्षितरीत्या खरेदी करतील.