शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
5
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
6
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
7
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
8
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
9
हृदयविकाराच्या झटक्याने प्रसिद्ध मराठी अभिनेता-दिग्दर्शकाचं निधन; ४२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
12
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
13
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
14
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
15
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
16
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
17
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
18
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
19
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
20
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

वीज बिलाची थकबाकी दुसऱ्या उद्योजकाकडून वसूल करता येणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 13:52 IST

थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मनमानी केल्यामुळे वीज विभागाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दणका बसला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा दणकाउद्योजकांना दिलासा देणारा निर्वाळा

राकेश घानोडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी मनमानी केल्यामुळे वीज विभागाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दणका बसला. वीज विभागाने एमआयडीसीमधील एका भूखंडावरील आधीच्या उद्योजकाकडील थकीत वीज बिल त्यानंतरच्या उद्योजकाकडून वसूल करण्याची प्रक्रिया अवलंबली होती. उच्च न्यायालयाने या पद्धतीने वीज बिल वसूल करणे अवैध असल्याचा निर्णय दिला. एका उद्योजकाकडील वीज बिलाची थकबाकी दुसऱ्या उद्योजकाकडून वसूल करता येणार नाही. भारतीय वीज कायदा-१९१० मध्ये तशी तरतूद नाही, असे या निर्णयात स्पष्ट करण्यात आले. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर यांनी हा निर्णय दिला. हा निर्णय उद्योजकांना दिलासा देणारा ठरला आहे.विदर्भ फूड अ‍ॅन्ड डेअरी इंडस्ट्रिजने अकोला एमआयडीसीमधील एक भूखंड लीजवर घेऊन आईसक्रीमसह अन्य थंड पदार्थ उत्पादनाची फॅ क्टरी टाकली होती. तो भूखंड विदर्भ फूडच्या आधी दुसºया एका उद्योजकाच्या ताब्यात होता व त्याच्याकडे ६७ हजार ८५ रुपयाचे वीज बिल थकीत होते. विदर्भ फूडने वीज पुरवठ्याची मागणी केली असता, त्यावेळच्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने त्यांना आधीच्या उद्योजकाकडे थकीत असलेले ६७ हजार ८५ रुपयाचे वीज बिल भरण्यास सांगितले होते. सदर वाद उच्च न्यायालयात पोहोचल्यानंतर हा निर्णय देण्यात आला. उच्च न्यायालयाने हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेताना, या पद्धतीने थकीत वीज बिलाची वसुली करता येऊ शकते का? हा कायद्याचा मुद्दा निर्धारित केला होता. अंतिम सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने या मुद्याचे उत्तर नकारात्मक दिले. विदर्भ फूडच्या वतीने अ‍ॅड. जुगलकिशोर गिल्डा यांनी बाजू मांडली.

असा चालला न्यायालयीन लढासुरुवातीला विदर्भ फूडने दिवाणी न्यायालयात दावा दाखल करून, वीज मंडळाची कृती बेकायदेशीर ठरविण्याची विनंती केली. ४ डिसेंबर १९९९ रोजी दिवाणी न्यायालयाने वीज मंडळाची कृती अवैध ठरवली. त्या निर्णयाविरुद्ध वीज मंडळाने जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले. १ नोव्हेंबर २००४ रोजी जिल्हा न्यायालयाने वीज मंडळाला दिलासा देऊन दिवाणी न्यायालयाचा निर्णय रद्द केला. त्यामुळे विदर्भ फूडने उच्च न्यायालयात द्वितीय अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवून जिल्हा न्यायालयाचा निर्णय रद्द केला.

टॅग्स :Courtन्यायालय