शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

‘पालका’ची जबाबदारी निष्ठेने बजावली

By admin | Updated: December 26, 2015 03:37 IST

पालकमंत्री म्हणून गेल्या वर्षभरात आपण नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी शक्य ते सर्वकाही केले.

नागपूर : पालकमंत्री म्हणून गेल्या वर्षभरात आपण नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी शक्य ते सर्वकाही केले. मिहान प्रकल्प, रस्त्यांचा विकास, धार्मिक स्थळांचा विकास, एम्स, आयआयटी, आयआयएम या सारख्या संस्थांना जागा उपलब्ध करून दिली. ग्रामीण भागाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले. जिल्ह्याच्या पालकाची जबाबदारी निष्ठेने बजावली, असे सांगत नव्या वर्षात आरोग्य सेवा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पार्किंग, बाजार, शेतकऱ्यांचे पांदण रस्ते, जलयुक्त शिवार अंतर्गत संपूर्ण जिल्ह्याचा समावेश करणे व मागेल त्याला वीज कनेक्शन या प्रश्नांकडे विशेष लक्ष देण्याचा संकल्प पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना आज (२६ डिसेंबर) एक वर्ष पूर्ण झाले. वर्षपूर्ती केलेल्या पालकमंत्र्यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या विकास कामांचा, घेतलेल्या निर्णयांचा लेखाजोखा पत्रकार परिषदेत सादर केला. बावनकुळे म्हणाले, गेल्या वर्षभरात मिहान प्रकल्पासाठी १ हजार ५०८ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. ७३९ कोटींची वित्तीय मान्यता दिली. भूसंपादनासाठी ८९.७२ कोटी दिले. कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवस्थानच्या विकासासाठी ४१४.६५ कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कामठी येथे ड्रॅगन पॅलेस परिसरात बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. नॅशनल लॉ विद्यापीठासाठी कालाडोंगरी येथे ६० एकर जमीन मंजूर केली. एम्ससाठी मिहानमध्ये १४३ एकर जमीन, आयआयएमसाठी मिहानमध्ये १५० एकर, आयआयटीसाठी वारंगा येथे १०० एकर जमीन मंजूर करण्यात आली. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठासाठी कालाडोंगरी येथे ५० एकर जागेचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. महापालिकेला रस्त्यांसाठी १०० कोटींचे अनुदान मिळवून देण्यास मदत केली. शांतिनगर, यशोधरानगर, कळमना, राणाप्रतापनगर, हुडकेश्वर व मानकापूर या सहा पोलीस ठाण्यासाठी नासुप्रकडून जागा मंजूर करण्यात आली. जिल्हा बँकेचे कर्ज वाटप बंद असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन ७५३ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. जिल्ह्यात समाधान शिबिर आयोजित करून नागरिकांच्या प्रश्नांचे समाधान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जून २०१६ पर्यंत नागपूर जिल्ह्यात वीज कनेक्शन नसलेला एकही कृषीपंप राहणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)