शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
2
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
4
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
5
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
6
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
7
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
8
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
9
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
10
७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर
11
'क्रू २' ची तयारी सुरू! करीना कपूर-क्रिती सनॉन-तब्बू सुपरहिट त्रिकुट पुन्हा दिसणार का?, जाणून घ्या याबद्दल
12
Latur: 'मला वाचवा', आयुष्य संपवायचं म्हणून तरुणीने पाण्यात उडी मारली अन् पुन्हा जगण्याची इच्छा झाली
13
बँकिंग क्षेत्राला हादरवणारी बातमी! ३८ भारतीय बँकांचा डेटा लीक; पगार ट्रान्सफर, लोनचे हफ्ते सगळेच...
14
मुंबईत बेकायदेशीर भाडे आकारणाऱ्या अ‍ॅप-आधारित टॅक्सी, रिक्षा आणि वाहनांवर कारवाईचा बडगा
15
जीएसटी कपातीचा उलटा फेरा! वह्या, पुस्तके महागणार; शिक्षणासोबत काय खेळ केला पहा...
16
सिमेंटची गोणी ४२५ वरून ३७५ रुपयांवर! पण, कंपन्या करू शकतात चलाखी? ग्राहकांना लाभ मिळणार का?
17
"तो काय बोलतो तुम्हाला तरी कळतं का?", भार्गवला हिणावणाऱ्यांना भावाचं सणसणीत उत्तर, म्हणाला...
18
बिहारमध्ये महिला मंडळ खूश...! 'लाडकी बहीण नाही', सुरू करण्यात आली ही खास योजना; खात्यात धडा-धड जमा झाले 10-10 हजार; PM मोदी म्हणाले...
19
कार, आयफोन आणि विदेशवारीचे आमिष देऊन करत होता विद्यार्थिनींची निवड! चैतन्यानंदवर आणखी गंभीर आरोप
20
"दुर्गा मातेला प्रार्थना करतो की, निवडणुकीनंतर असे सरकार बनावे जे..."; बंगालमध्ये नेमकं काय म्हणले अमित शाह?

‘पालका’ची जबाबदारी निष्ठेने बजावली

By admin | Updated: December 26, 2015 03:37 IST

पालकमंत्री म्हणून गेल्या वर्षभरात आपण नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी शक्य ते सर्वकाही केले.

नागपूर : पालकमंत्री म्हणून गेल्या वर्षभरात आपण नागपूर जिल्ह्याच्या विकासासाठी शक्य ते सर्वकाही केले. मिहान प्रकल्प, रस्त्यांचा विकास, धार्मिक स्थळांचा विकास, एम्स, आयआयटी, आयआयएम या सारख्या संस्थांना जागा उपलब्ध करून दिली. ग्रामीण भागाचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य दिले. जिल्ह्याच्या पालकाची जबाबदारी निष्ठेने बजावली, असे सांगत नव्या वर्षात आरोग्य सेवा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, पार्किंग, बाजार, शेतकऱ्यांचे पांदण रस्ते, जलयुक्त शिवार अंतर्गत संपूर्ण जिल्ह्याचा समावेश करणे व मागेल त्याला वीज कनेक्शन या प्रश्नांकडे विशेष लक्ष देण्याचा संकल्प पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.पालकमंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांना आज (२६ डिसेंबर) एक वर्ष पूर्ण झाले. वर्षपूर्ती केलेल्या पालकमंत्र्यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या विकास कामांचा, घेतलेल्या निर्णयांचा लेखाजोखा पत्रकार परिषदेत सादर केला. बावनकुळे म्हणाले, गेल्या वर्षभरात मिहान प्रकल्पासाठी १ हजार ५०८ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली. ७३९ कोटींची वित्तीय मान्यता दिली. भूसंपादनासाठी ८९.७२ कोटी दिले. कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवस्थानच्या विकासासाठी ४१४.६५ कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कामठी येथे ड्रॅगन पॅलेस परिसरात बहुउद्देशीय प्रशिक्षण केंद्राच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. नॅशनल लॉ विद्यापीठासाठी कालाडोंगरी येथे ६० एकर जमीन मंजूर केली. एम्ससाठी मिहानमध्ये १४३ एकर जमीन, आयआयएमसाठी मिहानमध्ये १५० एकर, आयआयटीसाठी वारंगा येथे १०० एकर जमीन मंजूर करण्यात आली. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठासाठी कालाडोंगरी येथे ५० एकर जागेचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. महापालिकेला रस्त्यांसाठी १०० कोटींचे अनुदान मिळवून देण्यास मदत केली. शांतिनगर, यशोधरानगर, कळमना, राणाप्रतापनगर, हुडकेश्वर व मानकापूर या सहा पोलीस ठाण्यासाठी नासुप्रकडून जागा मंजूर करण्यात आली. जिल्हा बँकेचे कर्ज वाटप बंद असतानाही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेऊन ७५३ कोटींचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. जिल्ह्यात समाधान शिबिर आयोजित करून नागरिकांच्या प्रश्नांचे समाधान करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जून २०१६ पर्यंत नागपूर जिल्ह्यात वीज कनेक्शन नसलेला एकही कृषीपंप राहणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.(प्रतिनिधी)