शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

दुसऱ्यांचे अस्तित्व, विचारांचा आदर करा : आचार्य लाेकेशन मुनिजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST

नवी दिल्ली : भगवान महावीर स्वामी यांनी ‘आयतुलेपयासु’ म्हणजे सर्व आत्मा समान, कुणीही लहान-माेठा नाही, असे सांगितले हाेते. या ...

नवी दिल्ली : भगवान महावीर स्वामी यांनी ‘आयतुलेपयासु’ म्हणजे सर्व आत्मा समान, कुणीही लहान-माेठा नाही, असे सांगितले हाेते. या सिद्धांतामधून ‘वननेस’ किंवा ‘एकात्मता’ ही संकल्पना सहज लक्षात येते, असे विचार विश्व शांतिदूत व अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डाॅ. लाेकेश मुनिजी महाराज साहेब यांनी व्यक्त केले. संयुक्त राष्ट्र संघातर्फे घाेषित ‘डे ऑफ लिव्हींग टूगेदर इन पीस’ निमित्त आयाेजित ‘डिवाइन बियोंड डिवाइड्स : कॉम्पेशन, वननेस ॲन्ड इको-फ्रेंडलीनेस’ वेबिनारमध्ये ते बाेलत हाेते. वेबिनारचे आयाेजन व संचालन युनायटेड काॅशियसनेसचे ग्लाेबल कन्वेनर डाॅ. विक्रांतसिंह ताेमर यांनी केले.

मुनिश्री म्हणाले, प्रत्येकाने स्वत:चे अस्तित्व आणि विचारांप्रमाणे इतरांचे अस्तित्व आणि विचारांचा आदर करायला हवा. हेच भगवान महावीर यांच्या अहिंसेतील मूळ आहे. एखाद्या प्राण्याची हत्या करणेच म्हणजे हिंसा नव्हे तर एखाद्याप्रति वाईट चिंतन करणे ही सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे.

आचार्य प्रवर यांनी करुणेच्या संदर्भात बाेलताना सांगितले, ‘‘असंविभागी न हु तस्स मोक्खो म्हणजे एक भाऊ उपाशी झाेपत असेल आणि दुसरा पाेटभर जेवण करीत असेल, अशी व्यक्ती माेक्षप्राप्तीची अधिकारी ठरू शकत नाही.’’ इकाे-फ्रेंडलीनेसबाबत महाराज म्हणाले, ‘‘षट्जीवनिकाय म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वनस्पती हे सर्व जीव आहेत. त्यांचे आवश्यकतेपेक्षा अधिक शाेषण करणे एकप्रकारे हिंसा आहे. मर्यादित गाेष्टीतही गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात. मात्र कुणाच्या अमर्याद इच्छांना पूर्ण केले जाऊ शकत नाही.’’

या वेबीनारमध्ये युनिव्हर्सल ग्रीन टेक्नालाॅजीचे संचालक डॉ. लियॉन मोस्स (अमेरिका), बर्थलाईटच्या संस्थापक व संचालक फ्रांसिस फ्रीडमैन (इंग्लंड), निद्रा कॉशियसनेस फाऊंडेशनचे संस्थापक योगी आंद्रे रिएहल (फ्रान्स), युरोपियन योगा फेडरेशनचे अध्यक्ष स्वामी सूर्यनन्दा (इटली) यांच्यासह जगभरातील अनेक विद्वान उपस्थित हाेते.