शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्यांचे अस्तित्व, विचारांचा आदर करा : आचार्य लाेकेशन मुनिजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST

नवी दिल्ली : भगवान महावीर स्वामी यांनी ‘आयतुलेपयासु’ म्हणजे सर्व आत्मा समान, कुणीही लहान-माेठा नाही, असे सांगितले हाेते. या ...

नवी दिल्ली : भगवान महावीर स्वामी यांनी ‘आयतुलेपयासु’ म्हणजे सर्व आत्मा समान, कुणीही लहान-माेठा नाही, असे सांगितले हाेते. या सिद्धांतामधून ‘वननेस’ किंवा ‘एकात्मता’ ही संकल्पना सहज लक्षात येते, असे विचार विश्व शांतिदूत व अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डाॅ. लाेकेश मुनिजी महाराज साहेब यांनी व्यक्त केले. संयुक्त राष्ट्र संघातर्फे घाेषित ‘डे ऑफ लिव्हींग टूगेदर इन पीस’ निमित्त आयाेजित ‘डिवाइन बियोंड डिवाइड्स : कॉम्पेशन, वननेस ॲन्ड इको-फ्रेंडलीनेस’ वेबिनारमध्ये ते बाेलत हाेते. वेबिनारचे आयाेजन व संचालन युनायटेड काॅशियसनेसचे ग्लाेबल कन्वेनर डाॅ. विक्रांतसिंह ताेमर यांनी केले.

मुनिश्री म्हणाले, प्रत्येकाने स्वत:चे अस्तित्व आणि विचारांप्रमाणे इतरांचे अस्तित्व आणि विचारांचा आदर करायला हवा. हेच भगवान महावीर यांच्या अहिंसेतील मूळ आहे. एखाद्या प्राण्याची हत्या करणेच म्हणजे हिंसा नव्हे तर एखाद्याप्रति वाईट चिंतन करणे ही सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे.

आचार्य प्रवर यांनी करुणेच्या संदर्भात बाेलताना सांगितले, ‘‘असंविभागी न हु तस्स मोक्खो म्हणजे एक भाऊ उपाशी झाेपत असेल आणि दुसरा पाेटभर जेवण करीत असेल, अशी व्यक्ती माेक्षप्राप्तीची अधिकारी ठरू शकत नाही.’’ इकाे-फ्रेंडलीनेसबाबत महाराज म्हणाले, ‘‘षट्जीवनिकाय म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वनस्पती हे सर्व जीव आहेत. त्यांचे आवश्यकतेपेक्षा अधिक शाेषण करणे एकप्रकारे हिंसा आहे. मर्यादित गाेष्टीतही गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात. मात्र कुणाच्या अमर्याद इच्छांना पूर्ण केले जाऊ शकत नाही.’’

या वेबीनारमध्ये युनिव्हर्सल ग्रीन टेक्नालाॅजीचे संचालक डॉ. लियॉन मोस्स (अमेरिका), बर्थलाईटच्या संस्थापक व संचालक फ्रांसिस फ्रीडमैन (इंग्लंड), निद्रा कॉशियसनेस फाऊंडेशनचे संस्थापक योगी आंद्रे रिएहल (फ्रान्स), युरोपियन योगा फेडरेशनचे अध्यक्ष स्वामी सूर्यनन्दा (इटली) यांच्यासह जगभरातील अनेक विद्वान उपस्थित हाेते.