शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

दुसऱ्यांचे अस्तित्व, विचारांचा आदर करा : आचार्य लाेकेशन मुनिजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:12 IST

नवी दिल्ली : भगवान महावीर स्वामी यांनी ‘आयतुलेपयासु’ म्हणजे सर्व आत्मा समान, कुणीही लहान-माेठा नाही, असे सांगितले हाेते. या ...

नवी दिल्ली : भगवान महावीर स्वामी यांनी ‘आयतुलेपयासु’ म्हणजे सर्व आत्मा समान, कुणीही लहान-माेठा नाही, असे सांगितले हाेते. या सिद्धांतामधून ‘वननेस’ किंवा ‘एकात्मता’ ही संकल्पना सहज लक्षात येते, असे विचार विश्व शांतिदूत व अहिंसा विश्व भारतीचे संस्थापक आचार्य डाॅ. लाेकेश मुनिजी महाराज साहेब यांनी व्यक्त केले. संयुक्त राष्ट्र संघातर्फे घाेषित ‘डे ऑफ लिव्हींग टूगेदर इन पीस’ निमित्त आयाेजित ‘डिवाइन बियोंड डिवाइड्स : कॉम्पेशन, वननेस ॲन्ड इको-फ्रेंडलीनेस’ वेबिनारमध्ये ते बाेलत हाेते. वेबिनारचे आयाेजन व संचालन युनायटेड काॅशियसनेसचे ग्लाेबल कन्वेनर डाॅ. विक्रांतसिंह ताेमर यांनी केले.

मुनिश्री म्हणाले, प्रत्येकाने स्वत:चे अस्तित्व आणि विचारांप्रमाणे इतरांचे अस्तित्व आणि विचारांचा आदर करायला हवा. हेच भगवान महावीर यांच्या अहिंसेतील मूळ आहे. एखाद्या प्राण्याची हत्या करणेच म्हणजे हिंसा नव्हे तर एखाद्याप्रति वाईट चिंतन करणे ही सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे.

आचार्य प्रवर यांनी करुणेच्या संदर्भात बाेलताना सांगितले, ‘‘असंविभागी न हु तस्स मोक्खो म्हणजे एक भाऊ उपाशी झाेपत असेल आणि दुसरा पाेटभर जेवण करीत असेल, अशी व्यक्ती माेक्षप्राप्तीची अधिकारी ठरू शकत नाही.’’ इकाे-फ्रेंडलीनेसबाबत महाराज म्हणाले, ‘‘षट्जीवनिकाय म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, वनस्पती हे सर्व जीव आहेत. त्यांचे आवश्यकतेपेक्षा अधिक शाेषण करणे एकप्रकारे हिंसा आहे. मर्यादित गाेष्टीतही गरजा पूर्ण केल्या जाऊ शकतात. मात्र कुणाच्या अमर्याद इच्छांना पूर्ण केले जाऊ शकत नाही.’’

या वेबीनारमध्ये युनिव्हर्सल ग्रीन टेक्नालाॅजीचे संचालक डॉ. लियॉन मोस्स (अमेरिका), बर्थलाईटच्या संस्थापक व संचालक फ्रांसिस फ्रीडमैन (इंग्लंड), निद्रा कॉशियसनेस फाऊंडेशनचे संस्थापक योगी आंद्रे रिएहल (फ्रान्स), युरोपियन योगा फेडरेशनचे अध्यक्ष स्वामी सूर्यनन्दा (इटली) यांच्यासह जगभरातील अनेक विद्वान उपस्थित हाेते.