शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

शेतकरी, नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा

By admin | Updated: May 25, 2017 01:45 IST

ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करून ते गावकऱ्यांना सहज उपलब्ध करून द्यावे, जलयुक्त शिवार योजनेची कामे, ...

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे : वार्षिक आमसभेचे आयोजन लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर मात करून ते गावकऱ्यांना सहज उपलब्ध करून द्यावे, जलयुक्त शिवार योजनेची कामे, ग्रामविकासाची कामे तातडीने पूर्ण करावीत व कृषी विभागाशी संबंधित छायाचित्रे काढून शासनाला तातडीने सुपूर्द करून पूर्ण झालेल्या कामांचे सरपंचाकडून प्रमाणपत्र प्राप्त करून घेण्याचे आदेश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. खापरी येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी, महसूल, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, भूमी अभिलेख, विद्युत पारेषण, महिला व बालकल्याण आदी विभागातील मंजूर कामे तसेच राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांसंदर्भात वार्षिक आमसभेत आढावा घेण्यात आला. यावेळी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, उपाध्यक्ष शरद डोणेकर, सदस्य रूपराव शिंगणे, शुभांगी गायधने, पं.स. नागपूरच्या सभापती नम्रता राऊत, उपसभापती सुजित नितनवरे उपस्थित होते. कृषी अधिकाऱ्यांनी नागपूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत शेतकऱ्यांची जाहीर सभा घ्यावी. यामध्ये शेतकऱ्यांच्या समस्या, भौगोलिक परिस्थिती, पाण्याची समस्या, पिकांची माहिती शेतकऱ्यांकडून जाणून घ्यावी. याकरिता कृषी अधिकाऱ्यांना जाहीर सभा घेण्याचा सूचना दिल्या. तसेच जलयुक्त शिवार अभियानाबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी गंभीरतेने व तातडीने कामे पूर्ण करावीत अन्यथा कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालकमंत्र्यांनी दिला. यावेळी त्यांनी आरोग्य विभागातील योजनांचा आढावा घेतला.नागपूर तालुक्यातील रस्त्यांची कामे उत्कृष्ट दर्जाची करण्यात यावी. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत तसेच सुरू असलेली कामे एक महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री बावनकुळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना दिल्या. रस्त्यांचे बांधकाम करतेवेळी मुख्य अभियंता व अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळी हजर राहावे, अशा सूचना केल्या. भूमिअभिलेख विभागातील शेतकऱ्यांसाठी योजनांचा आढावा घेतला. ग्रामीण भागापर्यंत सर्वांना वीज पुरवठा करण्यासाठी नागपूर तालुक्यामध्ये अनेक कामे सुरू आहेत. सदर कामे जलदगतीने पूर्ण करावीत. तसेच वीजसंबंधी सर्व समस्या दूर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. विजेसंबंधी ग्राहकांच्या तक्रार निवारणासाठी ग्रामपंचायतमध्ये सहा महिने ग्राहक मेळाव्याचे आयोजन विद्युत पारेषण विभागाने करावे. यावेळी नागपूर तालुक्यातील शासनाच्या विविध विभागातील अधिकारी तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.