शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

खुल्या प्रवर्गामधील नोकऱ्यांसाठी आरक्षित प्रवर्गाचे उमेदवारही पात्र, उच्च न्यायालयाचा निर्णय

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 31, 2023 16:01 IST

केवळ गुणवत्ता पाहणे बंधनकारक

नागपूर : खुल्या प्रवर्गामधील नोकऱ्यांसाठी आरक्षित प्रवर्गातील उमेदवारही पात्र असतात, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पुन्हा एकदा एका प्रकरणावरील निर्णयात सांगितले. तसेच, यासंदर्भातील कायदा स्पष्ट असतानाही आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वारंवार खुल्या प्रवर्गामधील नोकऱ्या नाकारल्या जात असल्यामुळे सरकार व सरकारी यंत्रणांची कानउघाडणी केली.

न्यायमूर्तिद्वय रोहित देव व अनिल पानसरे यांनी हा निर्णय दिला. खुला प्रवर्गाचा अर्थ सर्वांसाठी खुला, असा होतो. त्यामुळे खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी तयार करताना जात किंवा पंथाचा विचार करता येत नाही. तसेच, आरक्षित प्रवर्गातून अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना या यादीमधून वगळता येत नाही. ही यादी तयार करण्यासाठी सर्व प्रवर्गाच्या उमेदवारांनी मिळविलेले गुण विचारात घेणे बंधनकारक आहे, असे न्यायालयाने निर्णयात नमूद केले.

खुल्या प्रवर्गातील गुणवत्ता यादीमधून वगळण्यात आल्यामुळे अमरावती येथील ओबीसी उमेदवार चंदा वानखडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये वाहक पदी कार्यरत आहेत. महामंडळाने २०१७ मध्ये वाहतूक निरीक्षक (कनिष्ठ) पदभरतीकरिता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. वानखडे यांनी ओबीसी (महिला) प्रवर्गातून अर्ज दाखल केला होता.

परीक्षेमध्ये त्यांनी ११० गुण प्राप्त केले. या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ११२ गुणांवर बंद झाली. त्यामुळे त्यांचा या यादीत समावेश करण्यात आला नाही. परंतु, खुल्या प्रवर्गातील महिलांची गुणवत्ता यादी १०८ गुणांवर बंद झाल्यामुळे त्यांचा या यादीत समावेश करणे आवश्यक होते. मात्र, महामंडळाने त्या ओबीसी महिला असल्यामुळे त्यांचा या यादीत समावेश केला नाही. उच्च न्यायालयाने महामंडळाची ही कृती अवैध ठरवून वानखडे यांचा खुल्या प्रवर्गातील महिलांच्या गुणवत्ता यादीत समावेश करण्याचे आणि पात्रतेसंदर्भात इतर काही अडचणी नसल्यास त्यांना वाहतूक निरीक्षक (कनिष्ठ) पदी नियुक्त करण्याचे निर्देश महामंडळाला दिले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालय