शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

जयताळ्यातील ९ हेक्टर जागेवरील आरक्षण रद्द

By admin | Updated: August 11, 2015 03:55 IST

मौजा जयताळा येथील आरक्षित ९.२४ हेक्टर जमिनीचे ठराविक कालावधीत भूसंपादन न केल्याने कायद्यानुसार या

नागपूर : मौजा जयताळा येथील आरक्षित ९.२४ हेक्टर जमिनीचे ठराविक कालावधीत भूसंपादन न केल्याने कायद्यानुसार या जागेवरील आरक्षण रद्द झाले आहे. त्यामुळे यासंदर्भात महापालिका प्रशासनाने आपल्या स्तरावर निर्णय घ्यावा, असा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला.मौजा जयताळा येथील खसरा क्र. १२२ व १६२ मधील ३.०९ जागेवरील आरक्षण या जागेचे मालक श्री मारोती देवस्थानातर्फे विनोद गुडधे यांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६ नुसार १ फेबु्रवारी २०१३ रोजी मनपाला सूचना बजावली होती. या जागेचा टीडीआर घेण्यात जागा मालकांनी नकार दिला होता. त्यामुळे २०१३-१४ च्या शीघ्रगणकानुसार या जागेची किंमत ६०,७६,४८,५०० गृहित धरण्यात आली होती. या जमिनीच्या भूसंपादनाबाबतचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्याचा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याच भागातील २.०३ हेक्टर जमिनीसंदर्भात मालक कल्पना अशोक ठाकरे यांच्यातर्फे प्रफुल्ल गुडधे यांनी मनपाला सूचना नोटीस बजावली होती. या जागेच्या भूसंपादनासाठी ४०,९७,०४,७५० ची तरतूद करणे, तसेच मनीष गुडधे यांच्या मालकीची ४.१२ हेक्टर जमीन भूसंपादनासाठी ८३,१५,१९,००० ची तरतूद करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला होता. परंतु भूसंपादनाचा कालावधी संपला आहे की नाही, यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा करण्यात आली. नियमानुसार कालावधी संपला असल्याने हा प्रस्ताव परत पाठवून याबाबत प्रशासनाने निर्णय घ्यावा, अशी सूचना केल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी दिली. (प्रतिनिधी)समिती गठित करणार४शहर विकास आराखड्यातील आरक्षित जागांचे भूसंपादन करण्याची गरज आहे की नाही, याबाबत चौक शी करण्यासाठी उपसमिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्थायी समिती अध्यक्षांच्या नियंत्रणात ही समिती काम करेल. समिती चौकशी अहवाल सादर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई४भूसंपादनाची कार्यवाही वेळीच न केल्याने आरक्षण रद्द झाले आहे. आरक्षणाला गरज असताना भूसंपादन केले नसल्याचे चौकशीत आढळून आल्यास या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा सिंगारे यांनी दिला.अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही४जयताळा येथील आरक्षित ९.२४ हेक्टर जमिनीसंदर्भात अधिकाऱ्यांनी स्थायी पूर्वसूचना दिली नाही. याची वेळीच माहिती दिली असती तर अर्थसंकल्पात आवश्यक तरतूद करता आली असती. प्रस्तावाला विलंब झाल्याने व आर्थिक तरतूद नसल्याने हा विषय प्रशासनाकडे परत पाठविण्यात आला.