शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील आरक्षण ५० टक्क्यांवर जायला नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:08 IST

नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील एकूण आरक्षण ५० टक्क्यांवर जायला नको, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने ...

नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील एकूण आरक्षण ५० टक्क्यांवर जायला नको, असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला. तसेच, या निवडणुकीमध्ये ओबीसी आरक्षण ५० टक्क्यांत बसवण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.

न्या. ए. एम. खानविलकर, न्या. इंदू मल्होत्रा व न्या. अजय रस्तोगी यांच्या न्यायपीठाने हा निर्णय दिला. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायद्यातील कलम १२ (२) (सी) मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ओबीसीला २७ टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे. त्यामुळे एकूण आरक्षण ५० टक्क्यांवर जाते. परिणामी, वाशिम जिल्हा परिषदेचे सदस्य विकास गवळी व इतरांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून सदर तरतूद आर्टिकल २४३ - डी, २४३ - टी, १४ व १६ मधील तरतुदींचा भंग करणारी आहे, असा दावा केला होता. तसेच, नागपूर, वाशिम, अकोला व भंडारा जिल्हा परिषद आणि या जिल्ह्यांतील पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये ओबीसींकरिता २७ टक्के आरक्षण निश्चित करणाऱ्या २७ जुलै २०१८ व १४ फेब्रुवारी २०२० रोजीच्या अधिसूचना रद्द करण्याची मागणी केली होती. 'के. कृष्णमूर्ती' प्रकरणातील निर्णयानुसार एकूण आरक्षण ५० टक्क्यांवर जाऊ शकत नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते. सर्वोच्च न्यायालयाला त्यात तथ्य आढळून आल्यामुळे सर्व याचिका अंशत: मंजूर करून वादग्रस्त अधिसूचना ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत रद्द करण्यात आल्या. 'के. कृष्णमूर्ती' प्रकरणातील निर्णयानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये ५० टक्क्यांवर आरक्षण निश्चित करणे अवैध आहे, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. याचिकाकर्त्यांच्या वतीने वरिष्ठ वकील मुकेश समर्थ, सत्यजित देसाई व सोमनाथ प्रधान यांनी कामकाज पाहिले.

--------------------

घटनाबाह्यतेचा दावा अमान्य

कलम १२ (२) (सी) मधील तरतूद घटनाबाह्य असल्याचा दावा सर्वोच्च न्यायालयाने अमान्य करून संबंधित तरतूद, ओबीसींना २७ टक्के आरक्षण द्यावे अशी न वाचता, २७ टक्क्यांपर्यंत आरक्षण द्यावे, अशी वाचावी असे स्पष्ट केले. तसेच, ओबीसींना २७ टक्क्यांपर्यंत आरक्षण देताना एकूण आरक्षण ५० टक्क्यांवर जाऊ देऊ नका, असे सांगितले.

--------------------

खुल्या प्रवर्गासाठी निवडणूक

या निर्णयामुळे संबंधित जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये रिक्त होणाऱ्या जागा उर्वरित कार्यकाळाकरिता खुल्या प्रवर्गातून भरण्यासाठी दोन आठवड्यात निवडणूक जाहीर करा, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला.

-------------

ओबीसींकरिता सुधारित आरक्षणानुसार निवडणूक

या निर्णयामुळे नागपूर, वाशिम, अकोला व भंडारा जिल्हा परिषद आणि या जिल्ह्यांतील पंचायत समित्यांमध्ये ओबीसींकरिता सुधारित आरक्षण निश्चित करून निवडणूक घ्यावी लागणार आहे. न्यायालयाने आधीचे वादग्रस्त आरक्षण रद्द केले आहे.