शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

ओबीसींना दिले गेलेले आरक्षण २७ टक्केपेक्षा कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मुळातच ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण २७ टक्केपेक्षा कमीच आहे. त्यामुळे सर्वोच्च ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मुळातच ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण २७ टक्केपेक्षा कमीच आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नागपूर, भंडारा, अकोला, वाशिम, गोंदिया या जिल्ह्यांत निवडून आलेल्या ओबीसींच्या जागा कमी होऊच शकत नाही, असा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एस.सी, एस.टी, ओबीसी सर्व मिळून आरक्षण ५० टक्केपेक्षा जास्त देता येणार नाही, असे म्हटले आहे. राज्यात सध्या एस. सी. संवर्गाकरिता १३ टक्के, एसटी संवर्गाकरिता ७ व ओबीसी संवर्गाकरिता (ओबीसी व्ही.जे.एन.टी मिळून) ३० टक्के आरक्षण आहे. या प्रचलित टक्केवारीप्रमाणे ओबीसी संवर्गाकरिता जेवढ्या जागा द्याव्यास पाहिजे होत्या त्यापेक्षा कमीच देण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ नागपुरात जि.प.च्या एकूण ५८ जागा आहेत. यात एस.सी. प्रवर्गास ८ जागा द्यावयास पाहिजे होत्या दिल्या १०, एस.टी प्रवर्गास ४ जागा द्यावयास पाहिजे होत्या दिल्या ७ व ओबीसी संवर्गास १७ द्यावयास पाहिजे होत्या पण दिल्या १६ हीच परिस्थिती इतर जिल्ह्याची आहे. त्यामुळे ओबीसी समाजास कोणत्याही जिल्ह्यात टक्केवारीपेक्षा जास्त जागा दिलेल्या नाहीत. त्यामुळे त्या कमी होण्याचा प्रश्नच येत नाही. जिल्हा प्रशासन, राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोग यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करून ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची दखल घ्यावी. आवश्यक असेल तर राज्य सरकार व केंद्र सरकारने नियमात आवश्यक ते बदल करून ओबीसी समाजाचे संरक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ओबीसी समाजाला मिळत असलेले आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशाराही डॉ. तायवाडे यांच्यासह महासचिव सचिन राजूरकर, अशोक जिवतोडे, शरद वानखेडे, गुणेश्वर आरीकर, शकील पटेल, संजय पन्नासे, ईश्वर ढोले, सुरेंद्र मोरे, संजय मांगे, सुषमा भड, आदींनी दिला आहे.