शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
2
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
3
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
4
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
5
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
6
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
7
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
8
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
9
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
10
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
11
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
12
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
13
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
14
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
15
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
16
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
17
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
18
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
19
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
20
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप

ओबीसींना दिले गेलेले आरक्षण २७ टक्केपेक्षा कमीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मुळातच ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण २७ टक्केपेक्षा कमीच आहे. त्यामुळे सर्वोच्च ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मुळातच ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण २७ टक्केपेक्षा कमीच आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नागपूर, भंडारा, अकोला, वाशिम, गोंदिया या जिल्ह्यांत निवडून आलेल्या ओबीसींच्या जागा कमी होऊच शकत नाही, असा दावा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने एस.सी, एस.टी, ओबीसी सर्व मिळून आरक्षण ५० टक्केपेक्षा जास्त देता येणार नाही, असे म्हटले आहे. राज्यात सध्या एस. सी. संवर्गाकरिता १३ टक्के, एसटी संवर्गाकरिता ७ व ओबीसी संवर्गाकरिता (ओबीसी व्ही.जे.एन.टी मिळून) ३० टक्के आरक्षण आहे. या प्रचलित टक्केवारीप्रमाणे ओबीसी संवर्गाकरिता जेवढ्या जागा द्याव्यास पाहिजे होत्या त्यापेक्षा कमीच देण्यात आलेल्या आहेत. उदाहरणार्थ नागपुरात जि.प.च्या एकूण ५८ जागा आहेत. यात एस.सी. प्रवर्गास ८ जागा द्यावयास पाहिजे होत्या दिल्या १०, एस.टी प्रवर्गास ४ जागा द्यावयास पाहिजे होत्या दिल्या ७ व ओबीसी संवर्गास १७ द्यावयास पाहिजे होत्या पण दिल्या १६ हीच परिस्थिती इतर जिल्ह्याची आहे. त्यामुळे ओबीसी समाजास कोणत्याही जिल्ह्यात टक्केवारीपेक्षा जास्त जागा दिलेल्या नाहीत. त्यामुळे त्या कमी होण्याचा प्रश्नच येत नाही. जिल्हा प्रशासन, राज्य सरकार व राज्य निवडणूक आयोग यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करून ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची दखल घ्यावी. आवश्यक असेल तर राज्य सरकार व केंद्र सरकारने नियमात आवश्यक ते बदल करून ओबीसी समाजाचे संरक्षण करावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच ओबीसी समाजाला मिळत असलेले आरक्षण कमी करण्याचा प्रयत्न केल्यास राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशाराही डॉ. तायवाडे यांच्यासह महासचिव सचिन राजूरकर, अशोक जिवतोडे, शरद वानखेडे, गुणेश्वर आरीकर, शकील पटेल, संजय पन्नासे, ईश्वर ढोले, सुरेंद्र मोरे, संजय मांगे, सुषमा भड, आदींनी दिला आहे.