शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
3
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
4
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
5
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
6
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
7
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
8
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
9
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
10
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
11
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
12
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."
13
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
14
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
15
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
16
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
17
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
18
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
19
उद्यापासून महाराष्ट्रातील या ठिकाणी पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; कारण काय? जाणून घ्या...
20
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा

बेजबाबदार अधिकाऱ्यांचा विद्यापीठाकडून बचाव

By admin | Updated: April 8, 2016 03:13 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला जागतिक पातळीवर नेण्याचे दावे प्रशासनाकडून करण्यात येतात.

‘एनआयआरएफ’ला माहिती पाठविलीच नाही : ‘रँकिंग’बाबत उशिरा पत्र मिळाल्याची सबबनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला जागतिक पातळीवर नेण्याचे दावे प्रशासनाकडून करण्यात येतात. परंतु राष्ट्रीय पातळीवरील ‘रँकिंग’साठी साधी माहिती पाठविण्याची तसदीदेखील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घेतली नाही. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या ‘एनआयआरएफ’अंतर्गत (नॅशनल इन्स्टिट्यूट रॅकिंग फ्रेमवर्क) नागपूर विद्यापीठाला ‘रँकिंग’च न मिळाल्याने नाचक्की झाली आहे. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे यासाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालण्याचे काम विद्यापीठाकडून करण्यात येत आहे.‘एनआयआरएफ’तर्फे देशभरातील विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांचे ‘रँकिंग’ या आठवड्यात जाहीर करण्यात आले. शिवाजी विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला या यादीत स्थान मिळाले आहे. परंतु ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा मिळूनदेखील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला यात स्थान मिळवता आले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘एनआयआरएफ’बाबत विद्यापीठातील अधिकाऱ्यांना माहितीच नव्हती. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी नागपूर दौऱ्यादरम्यान याबाबत आवाहनदेखील केले होते. शिवाय ‘आॅनलाईन’ माहितीदेखील उपलब्ध नव्हती. ‘एनआयआरएफ’मध्ये माहिती पाठवावी लागणार आहे हे लक्षात येताच याची ‘आॅनलाईन’ नोंदणी करण्यात आली. विद्यापीठाची इत्थंभूत माहिती पाठविण्याची जबाबदारी ‘बीसीयूडी’ संचालक डॉ.डी.के.अग्रवाल यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांकडे दिली. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी ही माहिती वेळेत पाठविलीच नाही. त्यामुळे साहजिकच विद्यापीठाला ‘रँकिंग’ मिळू शकले नाही. याबाबत कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांना विचारणा करण्यात आली असता ‘एनआयआरएफ’चे पत्र विद्यापीठाला उशिरा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. पत्र मिळाल्यापासून प्रस्ताव पाठविण्यासाठी केवळ २ दिवसांचा वेळ उपलब्ध होता. तेवढ्या वेळेत विस्तृत स्वरूपातील माहिती सादर करणे शक्य नव्हते असेदेखील ते म्हणाले. यात अधिकाऱ्यांचा कुठलाही दोष नसून कुणावर कारवाई करण्याचा प्रश्नच येत नसल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)