शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत गेम झाला ...! इस्रायलवरील हल्ले रोखण्यासाठी लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर पाठविलेली...
2
मेळाव्यात कोण कुठे बसणार? कुणाची भाषणं होणार? सगळं ठरलं; दोन्ही ठाकरेंचं १५ मुद्द्यांवर एकमत...
3
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे एअर इंडियावर गंभीर आरोप, कंपनीनं दिलं असं स्पष्टीकरण
4
"मला सतत वकिलांचे फोन येताहेत, पण माझी एक अट..."; सोनमच्या भावाने स्पष्टच सांगितलं
5
केजरीवालांचा शीषमहल, तर रेखा गुप्तांचा 'मायामहल'; ९ लाखांचे टीव्ही, रिनोवेशनसाठी ६० लाखांचे टेंडर
6
AI म्हणालं, चूप, तुझं अफेअर उघड करीन! एआय माॅडेलच्या या धमकीनं साऱ्यांनाच धडकी भरली
7
महागाई भत्त्यात ४ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता; मोदी सरकार कर्मचाऱ्यांना देऊ शकतं मोठं गिफ्ट
8
टाटांच्या या कंपनीला मोठा धक्का! एका घोषणेने शेअर ९% घसरला, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले!
9
छत्रपती संभाजीनगर हादरलं; काळा गणपती मंदिराजवळ भीषण अपघात, दोन ठार, चार जखमी
10
Video: फरार विजय मल्ला अन् ललित मोदीची लंडनमध्ये ग्रँड पार्टी; ख्रिस गेलसह अनेकजण उपस्थित
11
तरुण दिसण्यासाठी भारतीय लाखो रुपये उधळतायेत? ग्लुटाथिओनची किंमत पाहून धक्का बसेल!
12
IND vs ENG: भारताने इंग्लंडच्या 'बॅझबॉल'ची काढली हवा, नवा रेकॉर्ड बनवला; पाकिस्तानला टाकले मागे
13
पंतप्रधान कमलांसह 38 मंत्री, 4 खासदार; PM मोदींच्या स्वागतासाठी पूर्ण मंत्रिमंडळ विमानतळावर दाखल
14
ज्यांना इंग्रजीत पत्रिका हवी, त्यांना इंग्लंडला पाठवा; सुधीर मुनगंटीवार यांचा सरकारला घरचा अहेर
15
भारतीय वंशाच्या तरुणाचा विमानात धिंगाणा; प्रवाशावर हल्ला, गळाच दाबला; व्हिडीओ व्हायरल
16
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!
17
चीनमध्ये जिनपिंग पर्व संपुष्टात? १६ दिवसांपासून बेपत्ता; सत्तेतून बेदखल होण्याची चिन्हे....
18
"राक्षस मोकाट फिरतायेत...", मनसेची अमराठी हॉटेल मालकाला मारहाण; बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट
19
एक मिनिटात तत्काळ तिकीट, रेल्वेच्या नव्या नियमानंतर काढली अशी पळवाट, टेलिग्रामवर रॅकेट सक्रिय
20
अमित शाह पुणे दौरा: झाडाझडतीत तरुणाकडे मिळाले पिस्तुल, पोलिसांनी केले जप्त

इच्छित ध्येय गाठण्यासाठी सैनिकी शिस्त आवश्यक

By admin | Updated: July 26, 2016 02:22 IST

मुलांना सामान्य शिक्षणासह सैनिकी प्रशिक्षणाचीही आवश्यकता आहे.

एस. बी. सिंग : कारगील विजय दिवस साजरानागपूर : मुलांना सामान्य शिक्षणासह सैनिकी प्रशिक्षणाचीही आवश्यकता आहे. यामुळे आत्मविश्वासासह सातत्य, चारित्र्य, देशाभिमान आणि शिस्त सहजच निर्माण होते. विद्यार्थ्यांना इच्छित ध्येय गाठण्यासाठी सैनिकी शिस्त निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे मत एनसीसी ओटीए कामठीचे डेप्युटी कमांडन्ट ब्रिगेडिअर एस. बी. सिंग यांनी व्यक्त केले. कारगील विजयी दिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.रविनगर येथील प्रहार मिलिटरी स्कूल आणि प्रहार समाज जागृती संस्थेतर्फे कारगील विजय दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला ब्रि. सिंग यांच्या पत्नी इंदू सिंग, मेजर जनरल ए.एस. देव, प्रहार संस्थेचे अध्यक्ष कर्नल सुनील देशपांडे, कर्नल व्ही.एल. वडोदकर, रजत महाजन, प्रहार वासुदेवलीला शाळेच्या मुख्याध्यापिका दर्शना करजगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. अमर जवानांना श्रद्धांजली व पुष्पचक्र अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. शिस्तबद्ध बँड पथक आणि सैनिकी युनिफार्म परिधान करून उपस्थित झालेले विद्यार्थी कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी पॉवर पार्इंट प्रेझेन्टेशनद्वारे कारगील युद्धातील कामगिरीमुळे परमवीर चक्र मिळविलेल्या जवानांची शौर्यगाथा सादर केली.विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करताना एस.बी. सिंग यांनी कारगील युद्धाच्या आठवणी सांगितल्या. भारताच्या सीमेत घुसून काश्मीरमध्ये उत्पात करण्याचा मनसुबा ठेवून पाकिस्तानी सैनिकांनी घुसखोरी केली होती. मात्र भारतीय सैनिकांनी सर्वस्व पणाला लावून त्यांचे मनसुबे उधळून लावले. विद्यार्थ्यांनी आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या क्षेत्राची करिअर म्हणून निवड करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. अमेरिकेसारखे देश आज शांतीची भाषा बोलत आहेत. मात्र भारत आधीपासूनच शांतीप्रिय देश असल्याचे सांगत ही शांती टिकवून ठेवण्यासाठी देशाचा सर्व क्षेत्राचा विकास होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन नवव्या वर्गातील खुशी सिरसाट हिने केले. शाळेच्या मुख्याध्यापिका शुभा मोहगावकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)विजयाची किंमत रक्ताने चुकविलीया कार्यक्रमात चौथ्या वर्गाच्या त्रिशा पर्वते या मुलीचे भाषण रोमांच जागविणारे ठरले. कोणत्याही युद्धात विजयाची किंमत वीरांना आपल्या रक्ताने चुकवावी लागते. कारगील युद्धातही भारतीय जवानांनी आपल्या रक्ताने विजयाची किंमत चुकविली आहे. या युद्धात देशाचे ५०० वीर पुत्र शहीद झाले तर हजारो जखमी झाले होते. तेव्हा कुठे विजयाचा दिवस साजरा करण्याचे सौभाग्य लाभत आहे. त्यांच्या आठवणी नेहमीच जाग्या राहाव्या असे आवाहन तिने केले.