शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
6
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
7
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
8
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
10
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
11
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
12
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
13
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
14
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
15
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
16
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
17
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
18
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
19
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
20
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय

कोरोनावरील उपाययोजनांसाठी सीएसआर निधीची मागणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:07 IST

नागपूर : विदर्भातील कंपन्यांकडे किती सीएसआर निधी उपलब्ध आहे याची येत्या गुरुवारपर्यंत माहिती घ्या आणि या निधीची कोरोनावरील उपाययोजनांसाठी ...

नागपूर : विदर्भातील कंपन्यांकडे किती सीएसआर निधी उपलब्ध आहे याची येत्या गुरुवारपर्यंत माहिती घ्या आणि या निधीची कोरोनावरील उपाययोजनांसाठी मागणी करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नागपूर व अमरावती विभागीय आयुक्तांना दिले.

प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने सदर आदेश देण्यापूर्वी कंपन्यांच्या उदासीनतेवर नाराजी व्यक्त केली. कोरोनाचे संकट परतवून लावण्याकरिता विदर्भातील आरोग्यसेवा बळकट करण्यामध्ये राज्य सरकारसह सार्वजनिक व खासगी कंपन्यांनीही योगदान द्यावे, अशी न्यायालयाला अपेक्षा होती. न्यायालयाने खासगी कंपन्यांकडील सीएसआर निधी मिळविण्यासाठी विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनला प्रकरणात प्रतिवादी केले व यासंदर्भात माहिती घेण्याचे निर्देश दिले होते; परंतु खासगी कंपन्यांनी असोसिएशनला समाधानकारक प्रतिसाद दिला नाही, तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडिया, वेकोलि व मॉईल या कंपन्या वगळता एनटीपीसी, महानिर्मिती, महापारेषण, महावितरण यासह इतर कंपन्यांनी सीएसआर निधी देण्यास पुढाकार घेतला नाही. तिरोडा थर्मल पॉवर स्टेशन गोंदिया व चंद्रपूर येथील सिमेंट उत्पादक कंपन्यांनीही उदासीनता दाखविली. परिणामी, न्यायालयाने नाराजी व्यक्त करून संबंधित कंपन्यांना समाजाप्रतीचे दायित्व पूर्ण करण्याची ही चांगली संधी आहे अशी आठवण करून दिली. एवढेच नाही, तर कंपन्या न्यायालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नसतील तर, याकरिता कायद्यानुसार निर्देश जारी करावे लागतील, अशी समजदेखील दिली.

------------

मध्यस्थी करण्यास मनाई

कोरोनासंदर्भात न्यायालयात तीन जनहित याचिका प्रलंबित असून त्यामध्ये अनेकांनी मध्यस्थी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे रेकॉर्ड वाढल्याने प्रकरण सुरळीत हाताळणे कठीण झाले आहे. करिता, न्यायालयाने यापुढे सर्व मध्यस्थांनी न्यायालय मित्र अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना संबंधित माहिती व तक्रारी सांगाव्यात, असे निर्देश देऊन वर्तमान सर्व मध्यस्थी अर्ज निकाली काढले, तसेच यापुढे न्यायालयाच्या परवानगीशिवाय कोणताही मध्यस्थी अर्ज स्वीकारला जाणार नाही असे स्पष्ट केले.