शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

बळकट चळवळीसाठी रिपब्लिकन पक्षाची गरज

By admin | Updated: June 24, 2014 01:00 IST

रिपब्लिकन पक्ष केवळ राजकीय पार्टी नव्हे तर ती एक चळवळ आहे. आंबेडकरी विचारांवर चालणारी ही चळवळ दलित, शोषित आदिवासींसह सामान्य जनांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.

नागपूर : रिपब्लिकन पक्ष केवळ राजकीय पार्टी नव्हे तर ती एक चळवळ आहे. आंबेडकरी विचारांवर चालणारी ही चळवळ दलित, शोषित आदिवासींसह सामान्य जनांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे. केवळ सत्ता मिळविणे हे पक्षाचे उद्दिष्ट नसून लोकांचे प्रश्न सोडविणे हा विचार घेऊन रिपब्लिकन पक्ष कार्यरत राहिला आहे. परंतु सध्या पक्षाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. चळवळीवरसुद्धा त्याचा परिणाम दिसून येत आहे, तेव्हा आंबेडकरी चळवळीला गतिमान करायचे असेल तर रिपब्लिकन पक्ष बळकट करावाच लागेल, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र शेंडे यांनी केले. रिपब्लिकन पक्ष खोरिपातर्फे हिंदी मोरभवन येथे पूर्व विदर्भीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद गजबे होते. सी.एम. वंजारी, उत्तमराव गवई, पुरुषोत्तम शेंडे, रामलाल सोमकुंवर, अ‍ॅड. डी.के. वानखेडे, प्राचार्य सत्यपाल काटकर, अ‍ॅड. यु.जी. कराडे, डॉ. शिवशंकर बनकर, चंद्रकांत वाघमारे, डॉ. रवी जांभुळकर आदी प्रमुख पाहुणे होते. उपेंद्र शेंडे पुढे म्हणाले, रिपब्लिकन पक्षाला बळकट करावेच लागेल. त्यादृष्टीने पक्ष विदर्भाच्या गावखेड्यात पोहचला पाहिजे. रिपब्लिकन पक्षाला पूर्वीचे गतवैभव आपल्याला मिळवून द्यायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उत्तमराव गवई, पुरुषोत्तम शेंडे, प्राचार्य सत्यपाल काटकर, अ‍ॅड. डी.के. वानखेडे यांनीही मार्गदर्शन केले. खोरिपचे सरचिटणीस नितीन साखरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला शिशुपाल टिपले, डी.डी. बन्सोड, दादाराव अंबादे, नाना धनविजय, महिपाल ढवळे, अरुण कोटांगळे, माया राऊत, पूनम टेंभुर्णीकर, सुनील वासनिक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)