शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

बळकट चळवळीसाठी रिपब्लिकन पक्षाची गरज

By admin | Updated: June 24, 2014 01:00 IST

रिपब्लिकन पक्ष केवळ राजकीय पार्टी नव्हे तर ती एक चळवळ आहे. आंबेडकरी विचारांवर चालणारी ही चळवळ दलित, शोषित आदिवासींसह सामान्य जनांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे.

नागपूर : रिपब्लिकन पक्ष केवळ राजकीय पार्टी नव्हे तर ती एक चळवळ आहे. आंबेडकरी विचारांवर चालणारी ही चळवळ दलित, शोषित आदिवासींसह सामान्य जनांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिली आहे. केवळ सत्ता मिळविणे हे पक्षाचे उद्दिष्ट नसून लोकांचे प्रश्न सोडविणे हा विचार घेऊन रिपब्लिकन पक्ष कार्यरत राहिला आहे. परंतु सध्या पक्षाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. चळवळीवरसुद्धा त्याचा परिणाम दिसून येत आहे, तेव्हा आंबेडकरी चळवळीला गतिमान करायचे असेल तर रिपब्लिकन पक्ष बळकट करावाच लागेल, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा) राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र शेंडे यांनी केले. रिपब्लिकन पक्ष खोरिपातर्फे हिंदी मोरभवन येथे पूर्व विदर्भीय कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रल्हाद गजबे होते. सी.एम. वंजारी, उत्तमराव गवई, पुरुषोत्तम शेंडे, रामलाल सोमकुंवर, अ‍ॅड. डी.के. वानखेडे, प्राचार्य सत्यपाल काटकर, अ‍ॅड. यु.जी. कराडे, डॉ. शिवशंकर बनकर, चंद्रकांत वाघमारे, डॉ. रवी जांभुळकर आदी प्रमुख पाहुणे होते. उपेंद्र शेंडे पुढे म्हणाले, रिपब्लिकन पक्षाला बळकट करावेच लागेल. त्यादृष्टीने पक्ष विदर्भाच्या गावखेड्यात पोहचला पाहिजे. रिपब्लिकन पक्षाला पूर्वीचे गतवैभव आपल्याला मिळवून द्यायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उत्तमराव गवई, पुरुषोत्तम शेंडे, प्राचार्य सत्यपाल काटकर, अ‍ॅड. डी.के. वानखेडे यांनीही मार्गदर्शन केले. खोरिपचे सरचिटणीस नितीन साखरे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला शिशुपाल टिपले, डी.डी. बन्सोड, दादाराव अंबादे, नाना धनविजय, महिपाल ढवळे, अरुण कोटांगळे, माया राऊत, पूनम टेंभुर्णीकर, सुनील वासनिक आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)