शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

रिपब्लिकन पक्षाची पुनर्बांधणी व्हावी

By admin | Updated: June 23, 2014 01:24 IST

सध्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. दलित, शोषित, आदिवासींना जगणे कठीण झाले आहे. आंबेडकरी चळवळसुद्धा संक्रमणावस्थेत आहे. प्रस्थापित राजकीय पक्ष हे भांडवलदार व उद्योगपती

खोरिपची अपरिहार्य सभा : बागडे यांचे प्रतिपादननागपूर : सध्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. दलित, शोषित, आदिवासींना जगणे कठीण झाले आहे. आंबेडकरी चळवळसुद्धा संक्रमणावस्थेत आहे. प्रस्थापित राजकीय पक्ष हे भांडवलदार व उद्योगपती धार्जिणे आहेत, तेव्हा देशातील दलित, शोषित आदिवासांना न्याय मिळवून देण्यासाठी रिपब्लिकन पक्षाची पुन्हा एकदा पुनर्बांधणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे (खोरिपा) अध्यक्ष अ‍ॅड. वासुदेवराव बागडे यांनी येथे केले. खोरिपातर्फे हिंदी मोरभवन येथे पक्षाची अपरिहार्य सभा आयोजित करण्यात आली होती. सभेच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. खोरिपाचे प्रदेशाध्यक्ष सयाजीराव वाघमारे, बनारस हिंदू विद्यापीठाचे प्रा. डॉ. प्रमोद बागडे, जी. दीपक महेशराम, बाळू खोब्रागडे, देशक खोब्रागडे, द्रोपदाबाई रामटेके प्रमुख वक्ते होते. अ‍ॅड. वासुदेवराव बागडे म्हणाले, हजारो वर्षांपासूनच्या ज्या जातीय शक्तीने या देशावर अधिकार गाजवले आहे त्या शक्ती आजही अस्तित्वात आहेत. गेल्या काही वर्षांपासून दलित, आदिवासींवरील अत्याचारात वाढ झाली आहे. दलित आदिवासी एकसंघ नसल्याचे हे द्योतक आहे. रिपब्लिकन पाटी ही या देशातील शेतकरी, मजूर व सर्वसामान्यांसाठी लढा देणारी पहिली राजकीय पार्टी होती. भूमिहिनांचा लढा हा देशातील ऐतिहासिक लढ्यांपैकी एक मानला जातो. रिपब्लिकन पक्षाच्या एका हाकेवर लाखो लोक तेव्हा रस्त्यावर उतरले होते. रिपाइंची ती ताकद पुन्हा निर्माण करण्यासाठी पक्षाची पुनर्बांधणी व्हावी. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन कार्यक्रम निश्चित करावा, असे आवाहन त्यांनी केले. सयाजीराव वाघमारे यांनी रिपाइं नेत्यांना राजकारण सोडून सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करण्याचे आवाहन केले. डॉ. प्रमोद बागडे यांनी बाबासाहेबांच्या स्वतंत्र मजूर पक्षाचा वारसा पुढे चालवण्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नाही, असे मत व्यक्त केले. खोरिपचे सरचिटणीस प्रा. डॉ. प्रदीप बोरकर यांनी प्रास्ताविक केले. जी. वासुदेवन यांनी संचालन केले. पांडुरंग बोरकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)