शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

झाडांवर गुंतलेला १० किलाे मांजा काढला ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:07 IST

नागपूर : झाडांवर, विजेच्या तारांवर गुंतलेला नायलाॅन मांजा आताही पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. वेळाेवेळी हाेणाऱ्या अपघातांतून ही बाब दृष्टीस ...

नागपूर : झाडांवर, विजेच्या तारांवर गुंतलेला नायलाॅन मांजा आताही पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. वेळाेवेळी हाेणाऱ्या अपघातांतून ही बाब दृष्टीस पडत आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी काही ध्येयवेड्या तरुणांची धडपड आताही चालली आहे. संक्रांतीनंतरही सातत्याने सुरू असलेल्या उपक्रमातून या तरुणांनी झाडांवर किंवा तारांवर गुंतून राहिलेला १० किलाेवर मांजा काढून पक्ष्यांच्या सुरक्षित भ्रमणाचा मार्ग माेकळा केला.

संक्रांतीच्या काळात पतंग उडविण्यासाठी नायलाॅन मांजावर बॅन असूनही सर्रास विक्रीही झाली आणि वापरही झाला. त्याची प्रचिती आजही येते. झाडांवर, इमारतींवर किंवा विद्युततारांवर पक्षी अडकल्याची प्रकरणे आजही समाेर येतात. मात्र काही पक्षीप्रेमी आताही पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी सरसावले आहेत. ग्राेव्हील फाउंडेशन हा त्यातलाच तरुणांचा ग्रुप आहे. या ग्रुपच्या सदस्यांनी संक्रांतीपूर्वी नायलाॅन मांजाच्या विक्रीवर बंधने घालण्यासाठी कार्य केले. मात्र संक्रांतीनंतर स्वस्थ न बसता सातत्याने अडकलेला नायलाॅन मांजा काढण्याची माेहीम राबविली. ग्रुपच्या २५-३० सक्रिय सदस्यांनी याेग्य प्रशिक्षणासह श्रमदान करून झाडांवर, इमारतींवर, विजेच्या तारांवर गुंतलेला मांजा काढला. १० किलाेवर मांजा काढून झाडे माेकळी केली.

या ग्रुपसाेबत अनेक संस्थांच्या सदस्यांनी, महाविद्यालयीन तरुणांनी माेहिमेत सहभाग घेतला. मॅट्रिक्स वाॅरियर्सच्या सदस्यांनी पाेलिसांच्या मदतीने मांजा विक्रेत्यांच्या गाेडाऊनमध्ये धाड घालून कारवाईस भाग पाडले. सर्पमित्रांच्या अनेक सदस्यांनीही सापांच्या सुरक्षेसाठी अडकलेला मांजा काढण्याच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला. रितिक कापरे, तृप्ती तायडे, अमित वंजारी, बंटी शर्मा, अशाेक प्रजापती, राजेश सबनीस, हर्षल गटकिने, नितीन मसिह, रेणुका गिरडे, पार्थ धाेंड, राहुल खापेकर, पंकज आसरे आदी अनेक सक्रिय सदस्य अभियानात सेवा देत असून पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भविष्यासाठी स्वाक्षरी माेहीम

दरवर्षी नायलाॅन मांजावर बंधने लावली जातात, पण ऐनवेळी कारवाई माेहीम राबविली जाते. व्यापारी आधीच मांजा आणून ठेवल्याचे कारण देत विक्रीसाठी तगादा लावत असतात. त्यामुळे संक्रांत आल्यानंतर वेळेवर कारवाईचा बडगा उभारण्यापेक्षा आतापासून कठाेर अंमलबजावणी करण्याची मागणी या सदस्यांनी केली आहे. यासाठी शहरातील उद्याने, तलाव परिसरात १५ स्वाक्षरी अभियान राबविली जाणार आहेत. त्यानंतर न्यायालयात हे निवेदन सादर केले जाणार असल्याचे डाॅ. अभिक घाेष यांनी सांगितले.