शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

झाडांवर गुंतलेला १० किलाे मांजा काढला ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:07 IST

नागपूर : झाडांवर, विजेच्या तारांवर गुंतलेला नायलाॅन मांजा आताही पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. वेळाेवेळी हाेणाऱ्या अपघातांतून ही बाब दृष्टीस ...

नागपूर : झाडांवर, विजेच्या तारांवर गुंतलेला नायलाॅन मांजा आताही पक्ष्यांसाठी जीवघेणा ठरत आहे. वेळाेवेळी हाेणाऱ्या अपघातांतून ही बाब दृष्टीस पडत आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या सुरक्षेसाठी काही ध्येयवेड्या तरुणांची धडपड आताही चालली आहे. संक्रांतीनंतरही सातत्याने सुरू असलेल्या उपक्रमातून या तरुणांनी झाडांवर किंवा तारांवर गुंतून राहिलेला १० किलाेवर मांजा काढून पक्ष्यांच्या सुरक्षित भ्रमणाचा मार्ग माेकळा केला.

संक्रांतीच्या काळात पतंग उडविण्यासाठी नायलाॅन मांजावर बॅन असूनही सर्रास विक्रीही झाली आणि वापरही झाला. त्याची प्रचिती आजही येते. झाडांवर, इमारतींवर किंवा विद्युततारांवर पक्षी अडकल्याची प्रकरणे आजही समाेर येतात. मात्र काही पक्षीप्रेमी आताही पक्ष्यांचा जीव वाचविण्यासाठी सरसावले आहेत. ग्राेव्हील फाउंडेशन हा त्यातलाच तरुणांचा ग्रुप आहे. या ग्रुपच्या सदस्यांनी संक्रांतीपूर्वी नायलाॅन मांजाच्या विक्रीवर बंधने घालण्यासाठी कार्य केले. मात्र संक्रांतीनंतर स्वस्थ न बसता सातत्याने अडकलेला नायलाॅन मांजा काढण्याची माेहीम राबविली. ग्रुपच्या २५-३० सक्रिय सदस्यांनी याेग्य प्रशिक्षणासह श्रमदान करून झाडांवर, इमारतींवर, विजेच्या तारांवर गुंतलेला मांजा काढला. १० किलाेवर मांजा काढून झाडे माेकळी केली.

या ग्रुपसाेबत अनेक संस्थांच्या सदस्यांनी, महाविद्यालयीन तरुणांनी माेहिमेत सहभाग घेतला. मॅट्रिक्स वाॅरियर्सच्या सदस्यांनी पाेलिसांच्या मदतीने मांजा विक्रेत्यांच्या गाेडाऊनमध्ये धाड घालून कारवाईस भाग पाडले. सर्पमित्रांच्या अनेक सदस्यांनीही सापांच्या सुरक्षेसाठी अडकलेला मांजा काढण्याच्या अभियानात सक्रिय सहभाग घेतला. रितिक कापरे, तृप्ती तायडे, अमित वंजारी, बंटी शर्मा, अशाेक प्रजापती, राजेश सबनीस, हर्षल गटकिने, नितीन मसिह, रेणुका गिरडे, पार्थ धाेंड, राहुल खापेकर, पंकज आसरे आदी अनेक सक्रिय सदस्य अभियानात सेवा देत असून पुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भविष्यासाठी स्वाक्षरी माेहीम

दरवर्षी नायलाॅन मांजावर बंधने लावली जातात, पण ऐनवेळी कारवाई माेहीम राबविली जाते. व्यापारी आधीच मांजा आणून ठेवल्याचे कारण देत विक्रीसाठी तगादा लावत असतात. त्यामुळे संक्रांत आल्यानंतर वेळेवर कारवाईचा बडगा उभारण्यापेक्षा आतापासून कठाेर अंमलबजावणी करण्याची मागणी या सदस्यांनी केली आहे. यासाठी शहरातील उद्याने, तलाव परिसरात १५ स्वाक्षरी अभियान राबविली जाणार आहेत. त्यानंतर न्यायालयात हे निवेदन सादर केले जाणार असल्याचे डाॅ. अभिक घाेष यांनी सांगितले.