शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीर्थक्षेत्र शेगावच्या विकासापुढील मोठे अडथळे दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 21:13 IST

देशविदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथील मंदिराचा विस्तार व परिसर विकासापुढील काही मोठे अडथळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दूर केलेत. त्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या विकासकामांना चालना मिळणार आहे.

ठळक मुद्देहायकोर्ट : मातंगपुरा, खळवाडीची जमीन रिकामी होणार

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशविदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथील मंदिराचा विस्तार व परिसर विकासापुढील काही मोठे अडथळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी दूर केलेत. त्यामुळे अनेक महिन्यांपासून रखडलेल्या विकासकामांना चालना मिळणार आहे.मातंगपुरा वस्तीची जमीन मंदिराला देण्यात आली आहे. येथे नागरिकांचे स्वत:च्या मालकीचे २२ भूखंड आहेत. त्यांना रहिवासी कॉम्प्लेक्समध्ये स्थानांतरित होण्याचा पर्याय देण्यात आला होता. परंतु, त्यांनी असहमती दर्शविली. त्यामुळे न्यायालयाने हे भूखंड संपादित करण्यासाठी सात दिवसांत विशेष भूसंपादन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी व त्यानंतर विशेष भूसंपादन अधिकाºयाने २७ एप्रिलपर्यंत बाजारभावाच्या पाचपट मोबदल्याचा निवाडा जाहीर करावा असे निर्देश दिलेत. या वस्तीत १७ कुटुंबांचे अतिक्रमण आहे. त्यापैकी सहा कुटुंबांना म्हाडाच्या प्रकल्पात घरे देण्यात आली आहेत. उर्वरित ११ कुटुंबांनी दुकानांची मागणी केली आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना आठवडी बाजारात दुकाने बांधून देण्यास सांगितले आहे. तसेच, या कुटुंबांना सात दिवसांमध्ये जागा रिकामी करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचे पालन न झाल्यास जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी कारवाईद्वारे जागा रिकामी करून संत गजानन महाराज संस्थानला जागेचा ताबा द्यावा असे स्पष्ट करण्यात आले आहे. मोबदला व दुकाने बांधण्यासाठी संस्थान पैसे देणार आहे. खळवाडी येथील १९ भूखंड मालकांना दुकाने बांधून देण्यात आली आहेत. संस्थानने प्रत्येक दुकानासाठी २२ लाख रुपये दिले आहेत. परंतु, भूखंड मालकांनी दुकाने स्वीकारली नाहीत. न्यायालयाने त्यांना जागा रिकामी करण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली असून त्यानंतर जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना कायद्यानुसार कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. याशिवाय गाडगेबाबा चौक ते महात्मा गांधी चौकापर्यंतच्या रोड रुंदीकरणाचा प्रश्नही सोडविण्यात आला आहे. या प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. अ‍ॅड. फिरदोस मिर्झा प्रकरणात न्यायालय मित्र असून संस्थानतर्फे अ‍ॅड. अरुण पाटील तर, प्रभावित नागरिकांतर्फे अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयShegaonशेगाव