शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
5
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
6
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
8
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
9
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
10
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
11
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
12
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
13
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
14
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
15
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
16
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
17
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
18
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
19
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
20
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा

निकालाचे फटाके, दाव्यांच्या फुलझड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:31 IST

जिल्ह्यातील २३८ ग्राम पंचायतींचे निकाल धनत्रयोदशीच्या दिवशी लागले. अनेकांना विजयाचे फटाके फोडण्याची संधी मिळाली. तर काहींचे बार फुसके ठरले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात भाजपा ‘खालसा’ : बावनकुळेंच्या मूळ गावात विजयाचा झेंडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील २३८ ग्राम पंचायतींचे निकाल धनत्रयोदशीच्या दिवशी लागले. अनेकांना विजयाचे फटाके फोडण्याची संधी मिळाली. तर काहींचे बार फुसके ठरले. जसजसे निकाल लागत गेले तसतसे काँग्रेस, भाजपाच्या नेत्यांकडून विजयाच्या दाव्या-प्रतिदाव्यांच्या फुलझड्या उडविल्या गेल्या. भाजपाने जिल्ह्यात १३२ ठिकाणी आपले सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे तर काँग्रेसने आपले ९३ व भाजपाचे ९१ सरपंच विजयी झाल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ६६ तर शिवसेनेने ४८ ग्राम पंचायतींवर भगवा फडकल्याचा दावा केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले नागपूर ग्रामीण तालुक्यातील फेटरी व पालकमंत्री तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दत्तक घेतलेल्या सुरादेवी या गावात भाजपा ‘खालसा’ झाला. येथे भाजपा समर्थित सरपंचपदाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. तर बावनकुळे यांचे मूळ गाव असलेल्या खसाळा येथे मात्र सरपंचासह भाजपाचे अख्खे पॅनल विजयी झाले. फेटरीत भाजप समर्थित गटाने विद्यमान सरपंच ज्योती राऊत यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेस समर्थित राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या धनश्री ढोमणे यांनी त्यांना ९७ मतांनी पराभूत केले. मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात भाजपाला काट्याच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. या ग्राम पंचातीमध्ये ९ सदस्य व एक सरपंच अशा १० जागांसाठी निवडणूक झाली. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस गटाने सरपंचासह ५ जागा जिंकल्या. तर भाजपा समर्थित गटाला पाच सदस्यांचा विजयश्री खेचण्यात यश आले. तर बावनकुळे यांचे मूळ गाव असलेल्या खसाळा येथे सरपंचासह भाजपाचे अख्खे पॅनल विजयी झाले. सरपंचासह आठही जागा जिंकल्या. रवींद्र पारधी यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. बावनकुळे यांची सासुरवाडी असलेल्या सिंदी (उमरी) ता.नरखेड येथेही भाजपाच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या गटाचा पूर्ण पराभव करून सरपंचासह संपूर्ण नऊ सदस्य निवडून आले आहेत.जि.प. अध्यक्षांच्या जाऊ पराभूतजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांच्या धानला या गावी त्यांच्या जाऊ ज्योती सावरकर या भाजपा समर्थित गटाकडून रिंगणात होत्या. त्यांचा शिवसेनेचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य यांच्या पत्नी वनिता वैद्य यांनी पराभव केला. येथे धनुष्य बाणाने कमळावर नेम साधला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या या येरखेडा या गावी काँग्रेस समर्थित पॅनलने सरपंचासह १२ जागा जिंकत बाजी मारली. येथे मंगला मनीष कारेमोरे या सरपंचपदी विजयी झाल्या.