शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

निकालाचे फटाके, दाव्यांच्या फुलझड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:31 IST

जिल्ह्यातील २३८ ग्राम पंचायतींचे निकाल धनत्रयोदशीच्या दिवशी लागले. अनेकांना विजयाचे फटाके फोडण्याची संधी मिळाली. तर काहींचे बार फुसके ठरले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात भाजपा ‘खालसा’ : बावनकुळेंच्या मूळ गावात विजयाचा झेंडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील २३८ ग्राम पंचायतींचे निकाल धनत्रयोदशीच्या दिवशी लागले. अनेकांना विजयाचे फटाके फोडण्याची संधी मिळाली. तर काहींचे बार फुसके ठरले. जसजसे निकाल लागत गेले तसतसे काँग्रेस, भाजपाच्या नेत्यांकडून विजयाच्या दाव्या-प्रतिदाव्यांच्या फुलझड्या उडविल्या गेल्या. भाजपाने जिल्ह्यात १३२ ठिकाणी आपले सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे तर काँग्रेसने आपले ९३ व भाजपाचे ९१ सरपंच विजयी झाल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ६६ तर शिवसेनेने ४८ ग्राम पंचायतींवर भगवा फडकल्याचा दावा केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले नागपूर ग्रामीण तालुक्यातील फेटरी व पालकमंत्री तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दत्तक घेतलेल्या सुरादेवी या गावात भाजपा ‘खालसा’ झाला. येथे भाजपा समर्थित सरपंचपदाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. तर बावनकुळे यांचे मूळ गाव असलेल्या खसाळा येथे मात्र सरपंचासह भाजपाचे अख्खे पॅनल विजयी झाले. फेटरीत भाजप समर्थित गटाने विद्यमान सरपंच ज्योती राऊत यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेस समर्थित राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या धनश्री ढोमणे यांनी त्यांना ९७ मतांनी पराभूत केले. मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात भाजपाला काट्याच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. या ग्राम पंचातीमध्ये ९ सदस्य व एक सरपंच अशा १० जागांसाठी निवडणूक झाली. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस गटाने सरपंचासह ५ जागा जिंकल्या. तर भाजपा समर्थित गटाला पाच सदस्यांचा विजयश्री खेचण्यात यश आले. तर बावनकुळे यांचे मूळ गाव असलेल्या खसाळा येथे सरपंचासह भाजपाचे अख्खे पॅनल विजयी झाले. सरपंचासह आठही जागा जिंकल्या. रवींद्र पारधी यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. बावनकुळे यांची सासुरवाडी असलेल्या सिंदी (उमरी) ता.नरखेड येथेही भाजपाच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या गटाचा पूर्ण पराभव करून सरपंचासह संपूर्ण नऊ सदस्य निवडून आले आहेत.जि.प. अध्यक्षांच्या जाऊ पराभूतजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांच्या धानला या गावी त्यांच्या जाऊ ज्योती सावरकर या भाजपा समर्थित गटाकडून रिंगणात होत्या. त्यांचा शिवसेनेचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य यांच्या पत्नी वनिता वैद्य यांनी पराभव केला. येथे धनुष्य बाणाने कमळावर नेम साधला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या या येरखेडा या गावी काँग्रेस समर्थित पॅनलने सरपंचासह १२ जागा जिंकत बाजी मारली. येथे मंगला मनीष कारेमोरे या सरपंचपदी विजयी झाल्या.