शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

निकालाचे फटाके, दाव्यांच्या फुलझड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:31 IST

जिल्ह्यातील २३८ ग्राम पंचायतींचे निकाल धनत्रयोदशीच्या दिवशी लागले. अनेकांना विजयाचे फटाके फोडण्याची संधी मिळाली. तर काहींचे बार फुसके ठरले.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात भाजपा ‘खालसा’ : बावनकुळेंच्या मूळ गावात विजयाचा झेंडा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील २३८ ग्राम पंचायतींचे निकाल धनत्रयोदशीच्या दिवशी लागले. अनेकांना विजयाचे फटाके फोडण्याची संधी मिळाली. तर काहींचे बार फुसके ठरले. जसजसे निकाल लागत गेले तसतसे काँग्रेस, भाजपाच्या नेत्यांकडून विजयाच्या दाव्या-प्रतिदाव्यांच्या फुलझड्या उडविल्या गेल्या. भाजपाने जिल्ह्यात १३२ ठिकाणी आपले सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे तर काँग्रेसने आपले ९३ व भाजपाचे ९१ सरपंच विजयी झाल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने ६६ तर शिवसेनेने ४८ ग्राम पंचायतींवर भगवा फडकल्याचा दावा केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेले नागपूर ग्रामीण तालुक्यातील फेटरी व पालकमंत्री तसेच ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दत्तक घेतलेल्या सुरादेवी या गावात भाजपा ‘खालसा’ झाला. येथे भाजपा समर्थित सरपंचपदाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. तर बावनकुळे यांचे मूळ गाव असलेल्या खसाळा येथे मात्र सरपंचासह भाजपाचे अख्खे पॅनल विजयी झाले. फेटरीत भाजप समर्थित गटाने विद्यमान सरपंच ज्योती राऊत यांनाच पुन्हा उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेस समर्थित राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या धनश्री ढोमणे यांनी त्यांना ९७ मतांनी पराभूत केले. मुख्यमंत्र्यांच्या दत्तक गावात भाजपाला काट्याच्या लढतीत पराभव पत्करावा लागला. या ग्राम पंचातीमध्ये ९ सदस्य व एक सरपंच अशा १० जागांसाठी निवडणूक झाली. काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस गटाने सरपंचासह ५ जागा जिंकल्या. तर भाजपा समर्थित गटाला पाच सदस्यांचा विजयश्री खेचण्यात यश आले. तर बावनकुळे यांचे मूळ गाव असलेल्या खसाळा येथे सरपंचासह भाजपाचे अख्खे पॅनल विजयी झाले. सरपंचासह आठही जागा जिंकल्या. रवींद्र पारधी यांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडली. बावनकुळे यांची सासुरवाडी असलेल्या सिंदी (उमरी) ता.नरखेड येथेही भाजपाच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या गटाचा पूर्ण पराभव करून सरपंचासह संपूर्ण नऊ सदस्य निवडून आले आहेत.जि.प. अध्यक्षांच्या जाऊ पराभूतजिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर यांच्या धानला या गावी त्यांच्या जाऊ ज्योती सावरकर या भाजपा समर्थित गटाकडून रिंगणात होत्या. त्यांचा शिवसेनेचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तापेश्वर वैद्य यांच्या पत्नी वनिता वैद्य यांनी पराभव केला. येथे धनुष्य बाणाने कमळावर नेम साधला. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या या येरखेडा या गावी काँग्रेस समर्थित पॅनलने सरपंचासह १२ जागा जिंकत बाजी मारली. येथे मंगला मनीष कारेमोरे या सरपंचपदी विजयी झाल्या.