शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सामूहिक वनहक्कातील बांबू निष्कासन वन विभागाच्याच नियंत्रणाबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 12:13 IST

सामूहिक वनहक्कांतर्गत होणाऱ्या बांबू निष्कासनासारखी महत्त्वाची प्रक्रियाच आता वन विभागाच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

ठळक मुद्देग्रामसभांकडून समन्वयाचा अभाववरिष्ठ पातळीवरूनच घोळ घोळ सामूहिक वनहक्काचा

गोपालकृष्ण मांडवकरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २००६ मध्ये केद्र सरकारने वनहक्क कायदा पारित केला. वैयक्तिक वनहक्क आणि सामूहिक वनहक्क असे वर्गीकरण करून वनग्राम तसेच जंगलव्याप्त गावांना हक्काचा लाभ देण्याची योजना आखली. सुरुवातीला ही प्रक्रिया बऱ्यापैकी चाललीदेखील; मात्र त्यातील क्लिष्टतेमुळे बऱ्याच तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामत: सामूहिक वनहक्कांतर्गत होणाऱ्या बांबू निष्कासनासारखी महत्त्वाची प्रक्रियाच आता वन विभागाच्या नियंत्रणाबाहेर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

महाराष्ट्रातील वन क्षेत्रामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यातील वनवृत्तामध्ये उत्तम प्रतीचा बांबू आहे. केंद्र सरकारचा ‘अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनवासी (वन अधिकारांची मान्यता) अधिनियम२००६’ राज्यात ३१ डिसेबर २००७ पासून लागू झाला. जंगलात राहणारे आदिवासी तसेच पारंपरिक वनवासी यांची वनावर गुजराण होते, हा शाश्वत आधार मान्य करण्यात आला. त्यांच्या उपजीविकेच्या आणि अन्न सुरक्षेच्या जतनासाठी १ जानेवारी २००८ पासून राज्यात सुधारित नियम लागू झाला आहे. याअंतर्गत कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने वैयक्तिक वनहक्क आणि सामूहिक वनहक्क असे भाग पाडून आदिवासींना त्यांचे हक्क देण्याची योजना आखली गेली.

या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आदिवासी विकास विभागाची राज्य सरकारने समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांची यावर नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कायद्यानुसार ग्रामपातळीवर ग्रामसभा वनहक्क समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत ग्रामसभांनी परवानगी घेऊनच बांबूचे निष्कासन करणे अभिप्रेत आहे. असे असले तरी ग्रामसभा परवानगी न घेताच निष्कासन करत असल्याचा प्रकार चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये घडत आहे.सूक्ष्म कृती आराखडा आणि गावकऱ्यांचे अज्ञानहस्तांतरित वनक्षेत्रातील बांबू रांझी सामूहिक वनहक्क सूक्ष्मकृती आराखड्याप्रमाणे निष्कासित करण्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबलप्रमुख) यांचे आदेश आहेत. हा सूक्ष्म कृती आराखडा करायचा कसा, हे गावकऱ्यांना ठाऊकच नाही. वनविभाग किंवा आदिवासी विकास विभागानेही यासाठी स्वत:हून पुढाकार घेतला नाही. मात्र यासाठी स्वयंसेवी संस्था (एनजीओ) यांच्यामार्फत असा आराखडा तयार करण्यास आणि त्यांच्या माध्यमातून प्रकिया करण्याची तरतूद नियमात केली. आज अनेक गावांकडे असा आराखडाच नाही, असला तरी तो गावांनी वन विभागाकडे सादर केलेला नाही, तरीही बांबू निष्कासन मात्र सुरूच आहे.

 

टॅग्स :Bambu Gardenबांबू गार्डन