शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

‘पेट’ उत्तीर्णांना दिलासा

By admin | Updated: October 27, 2016 02:31 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यंदापासून ‘पेट’च्या नियमांत बदल केले आणि अगोदर ‘पेट’ उत्तीर्ण केलेल्यांना फटका बसला.

नागपूर विद्यापीठ : जुन्या निर्देशांनुसार पात्र उमेदवार करूशकणार ‘पीएचडी’ नोंदणीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यंदापासून ‘पेट’च्या नियमांत बदल केले आणि अगोदर ‘पेट’ उत्तीर्ण केलेल्यांना फटका बसला. या मुद्यावरून विद्यापीठ प्रशासनावर सातत्याने दबाव वाढत होता व अखेर जुन्या निर्देशांनुसार ‘पीएचडी’ नोंदणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना दिलासा देणारा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. ज्या उमेदवारांनी अगोदर ‘पेट’ उत्तीर्ण केली असेल व जे अद्यापही कालमर्यादेच्या पात्रतेत बसत असतील, असे उमेदवार ‘पीएचडी’ नोंदणीसाठी ‘सिनॉप्सिस’ सादर करू शकतात, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी ‘पेट’ उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. विविध विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीधारक असलेल्या उमेदवारांनी विद्यापीठाच्या ‘निर्देश क्र. २९/१२’अनुसार ‘पेट’ दिली. जुन्या निर्देशांनुसार उमेदवाराला निकालाच्या तारखेपासून पाच वर्षांपर्यंत पीएच. डी. नोंदणीकरिता अर्ज सादर करता येऊ शकत होता. त्यामुळे अनेक उमेदवारांनी तयारीसाठी वेळ घेत नोंदणीसाठी मागील वर्षी ‘सिनॉप्सिस’ सादर केले नाहीत.मात्र, विद्यापीठाने ९ जून २०१६ रोजी अधिसूचना जारी करून ‘पेट’ची नवीन पद्धती जाहीर केली. यानुसार उमेदवारांना ‘पेट-१’ व ‘पेट-२’ अशा २ परीक्षा उत्तीर्ण करायच्या होत्या. ही अधिसूचना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आल्यामुळे ‘निर्देश क्र. २९/१२’अनुसार ‘पेट’ उत्तीर्ण उमेदवारांनाही नवीन पद्धतीनुसार ‘पेट’ द्यावी लागणार होती. जुन्या निर्देशांनुसार उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा मागील ‘पेट’चा निकाल वैध ठरणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले होते.याविरोधात पाच विद्यार्थी उच्च न्यायालयात गेले होते. ‘पेट’विषयी ९ जून २०१६ रोजी जारी अधिसूचना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी दिला होता. यानंतर विद्यापीठावर सातत्याने दबाव वाढत होता.मंगळवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. जर पाच विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे, तर इतर विद्यार्थ्यांनादेखील संधी दिली पाहिजे, असा या बैठकीत सूर होता. अखेर ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या निर्देशांनुसार ‘पेट’ उत्तीर्ण केली आहे व जे पाच वर्षांच्या कालमर्यादेत बसतात त्यांना नोंदणीची संधी देण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला.(प्रतिनिधी)