शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

‘पेट’ उत्तीर्णांना दिलासा

By admin | Updated: October 27, 2016 02:31 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यंदापासून ‘पेट’च्या नियमांत बदल केले आणि अगोदर ‘पेट’ उत्तीर्ण केलेल्यांना फटका बसला.

नागपूर विद्यापीठ : जुन्या निर्देशांनुसार पात्र उमेदवार करूशकणार ‘पीएचडी’ नोंदणीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने यंदापासून ‘पेट’च्या नियमांत बदल केले आणि अगोदर ‘पेट’ उत्तीर्ण केलेल्यांना फटका बसला. या मुद्यावरून विद्यापीठ प्रशासनावर सातत्याने दबाव वाढत होता व अखेर जुन्या निर्देशांनुसार ‘पीएचडी’ नोंदणीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना दिलासा देणारा निर्णय परीक्षा मंडळाने घेतला आहे. ज्या उमेदवारांनी अगोदर ‘पेट’ उत्तीर्ण केली असेल व जे अद्यापही कालमर्यादेच्या पात्रतेत बसत असतील, असे उमेदवार ‘पीएचडी’ नोंदणीसाठी ‘सिनॉप्सिस’ सादर करू शकतात, अशी माहिती कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी दिली.नागपूर विद्यापीठात ‘पीएचडी’ नोंदणीसाठी ‘पेट’ उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. विविध विषयांमध्ये पदव्युत्तर पदवीधारक असलेल्या उमेदवारांनी विद्यापीठाच्या ‘निर्देश क्र. २९/१२’अनुसार ‘पेट’ दिली. जुन्या निर्देशांनुसार उमेदवाराला निकालाच्या तारखेपासून पाच वर्षांपर्यंत पीएच. डी. नोंदणीकरिता अर्ज सादर करता येऊ शकत होता. त्यामुळे अनेक उमेदवारांनी तयारीसाठी वेळ घेत नोंदणीसाठी मागील वर्षी ‘सिनॉप्सिस’ सादर केले नाहीत.मात्र, विद्यापीठाने ९ जून २०१६ रोजी अधिसूचना जारी करून ‘पेट’ची नवीन पद्धती जाहीर केली. यानुसार उमेदवारांना ‘पेट-१’ व ‘पेट-२’ अशा २ परीक्षा उत्तीर्ण करायच्या होत्या. ही अधिसूचना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आल्यामुळे ‘निर्देश क्र. २९/१२’अनुसार ‘पेट’ उत्तीर्ण उमेदवारांनाही नवीन पद्धतीनुसार ‘पेट’ द्यावी लागणार होती. जुन्या निर्देशांनुसार उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा मागील ‘पेट’चा निकाल वैध ठरणार नाही, असे विद्यापीठाने स्पष्ट केले होते.याविरोधात पाच विद्यार्थी उच्च न्यायालयात गेले होते. ‘पेट’विषयी ९ जून २०१६ रोजी जारी अधिसूचना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करता येऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी दिला होता. यानंतर विद्यापीठावर सातत्याने दबाव वाढत होता.मंगळवारी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत या मुद्यावर सविस्तर चर्चा झाली. जर पाच विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे, तर इतर विद्यार्थ्यांनादेखील संधी दिली पाहिजे, असा या बैठकीत सूर होता. अखेर ज्या विद्यार्थ्यांनी जुन्या निर्देशांनुसार ‘पेट’ उत्तीर्ण केली आहे व जे पाच वर्षांच्या कालमर्यादेत बसतात त्यांना नोंदणीची संधी देण्यात यावी, असा निर्णय घेण्यात आला.(प्रतिनिधी)