शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

धार्मिक उन्माद लोकच खवपून घेणार नाहीत

By admin | Updated: October 19, 2015 03:15 IST

देशात सध्या काही लोक धार्मिक उन्माद घडवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

विचारपूर्वक राज्य करा : सुशीलकुमार शिंदे यांचा सरकारला इशारानागपूर : देशात सध्या काही लोक धार्मिक उन्माद घडवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु हा धार्मिक उन्माद देशात चालू शकत नाही. लोकही तो खपवून घेणार नाहीत, तेव्हा राज्यकर्त्यांनी लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यांचा विचार करून राज्य करावे, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज येथे दिला. मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार सोहळ्यासाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, हा देश धर्मनिरपेक्ष आहे. डॉ. आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली असून ती धर्मनिरपेक्ष व लोकतांत्रिक आहे. या धर्मनिरपेक्ष देशात धार्मिक उन्माद चालू देणार नाही. लोकही ते चालू देणार नाही. या धार्मिक उन्मादाच्या विरोधात देशभरातील साहित्यिक त्यांना मिळालेले पुरस्कार परत करीत आहेत. त्याबाबत ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याच्या आणि एकूणच चळवळीमध्ये साहित्यिकांची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. तेव्हा देशातील साहित्यिक याप्रकारे आपला विरोध प्रकट करीत असतील तर ती साधीसुधी बाब नाही. पुरस्कार परत करणे, राजीनामा देणे हे सरकारसाठी चांगले संकेत नाहीत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. सनातन वरील बंदीबाबत विचारले असता यापूर्वीच आपण यावर प्रतिक्रिया दिली असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.(प्रतिनिधी)