शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
3
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
4
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
5
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
6
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
7
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
8
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
9
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
10
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
11
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
12
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
13
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
14
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
15
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
16
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
17
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  
18
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
19
मुलांना वाढवणं सोप्प नाही! जन्मापासून कॉलेजपर्यंतच्या खर्चाचा आकडा वाचून डोळे होतील पांढरे
20
भारत-पाकिस्तान सीमेवर दोन मृतदेह आढळले, जवळच पडले होते पाकिस्तानी सिम, ओळखपत्रे

धार्मिक उन्माद लोकच खवपून घेणार नाहीत

By admin | Updated: October 19, 2015 03:15 IST

देशात सध्या काही लोक धार्मिक उन्माद घडवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

विचारपूर्वक राज्य करा : सुशीलकुमार शिंदे यांचा सरकारला इशारानागपूर : देशात सध्या काही लोक धार्मिक उन्माद घडवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु हा धार्मिक उन्माद देशात चालू शकत नाही. लोकही तो खपवून घेणार नाहीत, तेव्हा राज्यकर्त्यांनी लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता यांचा विचार करून राज्य करावे, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आज येथे दिला. मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार सोहळ्यासाठी ते नागपुरात आले असता पत्रकारांशी बोलत होते. सुशीलकुमार शिंदे म्हणाले, हा देश धर्मनिरपेक्ष आहे. डॉ. आंबेडकरांनी या देशाची घटना लिहिली असून ती धर्मनिरपेक्ष व लोकतांत्रिक आहे. या धर्मनिरपेक्ष देशात धार्मिक उन्माद चालू देणार नाही. लोकही ते चालू देणार नाही. या धार्मिक उन्मादाच्या विरोधात देशभरातील साहित्यिक त्यांना मिळालेले पुरस्कार परत करीत आहेत. त्याबाबत ते म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्याच्या आणि एकूणच चळवळीमध्ये साहित्यिकांची भूमिका ही नेहमीच महत्त्वाची राहिली आहे. तेव्हा देशातील साहित्यिक याप्रकारे आपला विरोध प्रकट करीत असतील तर ती साधीसुधी बाब नाही. पुरस्कार परत करणे, राजीनामा देणे हे सरकारसाठी चांगले संकेत नाहीत, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. सनातन वरील बंदीबाबत विचारले असता यापूर्वीच आपण यावर प्रतिक्रिया दिली असल्याचे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.(प्रतिनिधी)