शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
7
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
8
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
11
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
12
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
13
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
14
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
15
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
16
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
17
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
19
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
20
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी

यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:06 IST

नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पाणी टंचाईची भीषणता कमी जाणवत आहे. यावर्षी जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेल्या टंचाई आराखड्याला ...

नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पाणी टंचाईची भीषणता कमी जाणवत आहे. यावर्षी जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेल्या टंचाई आराखड्याला जिल्हा प्रशासनाने ५० टक्क्याची कपात लावल्यानंतरही जिल्ह्यात पाणी टंचाईची ओरड झाली नाही. विशेष म्हणजे ३० जूनपर्यंत टंचाई आराखड्यातील मंजूर कामे पूर्ण करायची असतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात टंचाईची ६० टक्के कामे पूर्ण झाल्याचा गोषवारा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दिला आहे.

जिल्हा परिषदेने टंचाईचा ५१ कोटीचा आराखडा मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. परंतु जिल्हा प्रशासनाने ५० टक्केची कपात करीत २४ कोटीच्या कामाला मंजुरी दिली. २४ कोटीच्या कामांमध्ये ६५८ गावांमध्ये ८७५ टंचाई निवारणार्थ उपाययोजना करायच्या होत्या. जिल्ह्यात मे महिन्यापासून कामाला सुरूवात झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यात विभागाने दिलेल्या गोषवाऱ्यानुसार १४ कोटीची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये नळ योजनेच्या विशेष दुरूस्तीवर १२.८९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. टँकरद्वारे पाणी पुरवठ्यावर ७१ लाख खर्च झाले आहेत. खासगी विहीर अधिग्रहणावर ३७ लाख रुपयांचा खर्च गोषवाऱ्यात दाखविला आहे. पण गोषवाऱ्यातील प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या उपाययोजनांच्या कॉलममध्ये शून्य नोंद आहे. याचाच अर्थ ६० टक्के कामे प्रगतीपथावर आहेत.

- नवीन बोअरवेलला मंजुरीच नाही

जिल्हा परिषदेने टंचाई आराखड्यात २५७ नवीन बोअरवेलचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. परंतु एकाही नवीन बोअरवेलला यंदा मंजुरी दिली नाही. पण विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती (फ्लशिंग) वर यंदा जास्त फोकस करण्यात आला. आतापर्यंत फ्लशिंगची ९१ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.

- २५ गावात टँकरने पाणी पुरवठा

टंचाई आराखड्यात ४८ गावात टँकरने पाणी पुरवठा प्रस्तावित केला होता. परंतु प्रशासनाने आवश्यकतेनुसार २५ गावात टँकरद्वारे पाणी पुरवठ्याला मंजुरी दिली. हिंगणा, नागपूर व कामठी तालुक्यातच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला.