शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

यंदा जिल्ह्यात पाणी टंचाईचा दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:06 IST

नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पाणी टंचाईची भीषणता कमी जाणवत आहे. यावर्षी जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेल्या टंचाई आराखड्याला ...

नागपूर : गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात पाणी टंचाईची भीषणता कमी जाणवत आहे. यावर्षी जिल्हा परिषदेने प्रस्तावित केलेल्या टंचाई आराखड्याला जिल्हा प्रशासनाने ५० टक्क्याची कपात लावल्यानंतरही जिल्ह्यात पाणी टंचाईची ओरड झाली नाही. विशेष म्हणजे ३० जूनपर्यंत टंचाई आराखड्यातील मंजूर कामे पूर्ण करायची असतात. जूनच्या पहिल्या आठवड्यात टंचाईची ६० टक्के कामे पूर्ण झाल्याचा गोषवारा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने दिला आहे.

जिल्हा परिषदेने टंचाईचा ५१ कोटीचा आराखडा मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे पाठविला होता. परंतु जिल्हा प्रशासनाने ५० टक्केची कपात करीत २४ कोटीच्या कामाला मंजुरी दिली. २४ कोटीच्या कामांमध्ये ६५८ गावांमध्ये ८७५ टंचाई निवारणार्थ उपाययोजना करायच्या होत्या. जिल्ह्यात मे महिन्यापासून कामाला सुरूवात झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यात विभागाने दिलेल्या गोषवाऱ्यानुसार १४ कोटीची कामे पूर्ण झाली आहेत. यामध्ये नळ योजनेच्या विशेष दुरूस्तीवर १२.८९ कोटी रुपये खर्च झाले आहेत. टँकरद्वारे पाणी पुरवठ्यावर ७१ लाख खर्च झाले आहेत. खासगी विहीर अधिग्रहणावर ३७ लाख रुपयांचा खर्च गोषवाऱ्यात दाखविला आहे. पण गोषवाऱ्यातील प्रत्यक्षात पूर्ण झालेल्या उपाययोजनांच्या कॉलममध्ये शून्य नोंद आहे. याचाच अर्थ ६० टक्के कामे प्रगतीपथावर आहेत.

- नवीन बोअरवेलला मंजुरीच नाही

जिल्हा परिषदेने टंचाई आराखड्यात २५७ नवीन बोअरवेलचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला होता. परंतु एकाही नवीन बोअरवेलला यंदा मंजुरी दिली नाही. पण विंधन विहिरींची विशेष दुरूस्ती (फ्लशिंग) वर यंदा जास्त फोकस करण्यात आला. आतापर्यंत फ्लशिंगची ९१ टक्के कामे पूर्ण झाली आहेत.

- २५ गावात टँकरने पाणी पुरवठा

टंचाई आराखड्यात ४८ गावात टँकरने पाणी पुरवठा प्रस्तावित केला होता. परंतु प्रशासनाने आवश्यकतेनुसार २५ गावात टँकरद्वारे पाणी पुरवठ्याला मंजुरी दिली. हिंगणा, नागपूर व कामठी तालुक्यातच टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला.