शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

रिलायन्स पॉलिएस्टरच्या कर्मचाऱ्यांना मिळाला मोबदला

By admin | Updated: September 24, 2015 03:23 IST

मौदा येथील रिलायन्स पॉलिएस्टर इंडस्ट्रीज या कंपनीतील शेकडो कामगारांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीमुळे प्रत्येकी सुमारे २२ लाख रुपये ...

पालकमंत्री बावनकुळे यांची मध्यस्थी : २२ लाख रुपयांपर्यंत मोबदला नागपूर : मौदा येथील रिलायन्स पॉलिएस्टर इंडस्ट्रीज या कंपनीतील शेकडो कामगारांना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मध्यस्थीमुळे प्रत्येकी सुमारे २२ लाख रुपये किंवा उर्वरित सेवा कालावधीचे संपूर्ण वेतन यापैकी जे कमी असेल ते इतका मोबदला मिळाला. विदर्भात पहिल्यांदाच कामगारांना अशा प्रकारचा मोबदला केवळ पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीमुळे मिळाला आहे. एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून कठीण परिस्थितीतून या कंपनीचा प्रवास सुरू होता. व्यवस्थापनाला उत्पादन सुरू ठेवणे कठीण झाले होते. परिणामी काम ठप्प पडले. कंपनीतर्फे कामगारांना पगार व अन्य सवलती देण्यात येत होत्या. पण उत्पादन बंद होते. कंपनीतील भारतीय पॉलिएस्टर कामगार संघटनेच्या कामगारांनी या संदर्भात कंपनीकडे विचारणा केली. परंतु उत्पादन सुरू करण्यास कंपनीने असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर कामगारांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अर्ज केला. पालकमंत्र्यांनी मध्यस्तीचा प्रयत्न केला. अप्पर कामगार आयुक्तांकडे सहा वेळा बैठकी झाल्या. कंपनीने आर्थिक स्थितीच्या कारणाखाली कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला. २८ आॅगस्ट २०१५ रोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बिजलीनगर येथे अप्पर कामगार आयुक्त अनिल लाकसवार, कामगार संघटना आणि व्यवस्थापन यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत ठरल्यानुसार नोकरीतून स्वेच्छेने राजीनामा देणाऱ्या कामगाराला २२ लाख रुपये देण्याचे ठरले. २० लाख रुपयांपेक्षा ज्या कामगारांना कमी रक्कम प्रदेय ठरते त्या कामगारांना प्रदेय ठरणाऱ्या रकमेवर एक लाख रुपये अधिक देण्याचे ठरविण्यात आले. परंतु २२ लाखापेक्षा अधिक कुणालाही जास्त रक्कम मिळणार नाही, असा निर्णय झाला. याशिवाय ज्या पात्र कामगारांना मेडिक्लेम इन्शुरन्स योजना निर्णयाच्या दिवशी लागू असेल त्यांना ती ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत लागू असेल. याशिवाय स्वतंत्रपणे ग्रॅच्युईटी, रजेचा पगार, बोनस या सवलतीही मिळतील. या योजनेत ज्यांचे अर्ज स्वीकारले गेले त्यांना टोकन म्हणून दीड लाख रुपये अग्रीम देण्यात येईल. यानंतर कामगारांकडून न्यायालयात दाखल असलेले सर्व खटले परत घेतले जातील आणि सर्व रक्कम ८ दिवसात संबंधित कामगारांच्या खात्यात जमा करण्यात येईल. कामगारांची मुले रिलायन्स फाऊंडेशन स्कूलमध्ये जात आहेत. त्यांना शैक्षणिक सवलत यावर्षी व पुढील वर्षी मिळेल. जे कामगार कंपनीच्या घरात राहतात त्यांना घर परत करावे लागेल. जास्तीत जास्त ३१ मे २०१६ पर्यंत पर्यायी व्यवस्था होईपर्यंत त्यांना कंपनीच्या घरात राहता येईल, असा करार झाला. हा संपूर्ण निर्णय अप्पर कामगार आयुक्त अनिल लाकसवार, कंपनीचे व्यवस्थापन आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाला आणि पात्र कामगारांना त्यांच्या कंपनीकडून योग्य मोबदला मिळाला. (प्रतिनिधी)