शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
3
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
4
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
5
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
6
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
7
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
8
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
9
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
10
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
11
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
12
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
13
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
14
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
15
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
16
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
17
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
18
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
19
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
20
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना

सुरनदी आणि पेंचच्या कालव्याला पाणी सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:07 IST

खात : मौदा तालुक्यातील सूर नदीपात्र कोरडे पडल्याने खातसह परिसरातील बहुतांश गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाण्याच्या ...

खात : मौदा तालुक्यातील सूर नदीपात्र कोरडे पडल्याने खातसह परिसरातील बहुतांश गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. पाण्याच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे येथील पाणी पुरवठा योजना प्रभावित झाल्या आहेत. या परिसरातील गावांना एक दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे. सूर नदीवर धर्मापुरी ते महालगाव या सात किलोमीटर अंतरावर कमीत कमी १५ ते २० गावांच्या पाणी पुरवठा योजना आहेत. या नदीवर पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करून १० ते १५ किलोमीटरपर्यंत पाणी नेले जाते. मात्र, मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सूर नदी कोरडी पडली आहे. पेंच प्रकल्पाचे पाणी पेंचच्या मुख्य कालव्याला व नदीला सोडले तर याचा फायदा पाणी पुरवठा योजनांना होईल, असे या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.

एकही बंधारा नाही

सूर नदीवर परिसरातील धर्मापुरी ते महालगावपर्यंत एकही बंधारा शासनाने बांधला नाही. जलयुक्त शिवार योजनेतून नदीवर बंधारा बांधला तर याचा फायदा या परिसरातील जनतेला होईल. बंधारा बांधण्याची मागणी या परिसरातील जनतेची आहे. परंतु रेती चोरट्यांचा याला विरोध आहे. नदीवर बंधारा बांधला तर पाणी जमा राहील. त्यामुळे त्यांना रेतीची चोरी करणे शक्य होणार नाही.

...या गावांना होतो पाणी पुरवठा

सूर नदीवरून धर्मापुरी, रेवराल, श्रीखंडा, नवरगाव, मोरगाव, तांडा, सिरसोली, देवमुंढरी, वायगाव, मुरमाडी, पिंपळगाव, खात या गावांना पाणी पुरवठा केला जातो.