शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पेंचमध्ये पाच टीएमसी पाणी सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 20:37 IST

उत्तर विदर्भात कमी पावसामुळे व मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे पाणीटंचाईचा निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच धरणात पाच टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे केली.

ठळक मुद्देबावनकुळे यांची मागणी : शिवराज सिंग चौहान यांच्याशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उत्तर विदर्भात कमी पावसामुळे व मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे पाणीटंचाईचा निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच धरणात पाच टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे केली.नवी दिल्लीत मुख्यमंत्री चौहान व पालकमंत्री बावनकुळे यांची केंद्रीय कोळसामंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. मध्यप्रदेशमधील चौराई धरणामुळे पेंचमधील पाणीसाठा कमी झाला असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. पेंचमधून नागपूर व भंडारा जिल्ह्याला पिण्यासाठ़ी पाणीपुरवठा करण्यात येतो. नागपूर व भंडाऱ्यातील ३० लाख लोकसंख्येला टंचाईचा सामना करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत चौराई धरणातून पाच टीएमसी पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री चौहान यांना करण्यात आली.चौराई जलाशयाचे काम यंदा पूर्ण झाले असून या जलाशयात ६० टक्के पाणी आहे. शिवाय चौराईच्या शेजारील भाग अजूनही विकसित झाला नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाण्यातून ५ टीएमसी पाणी नागपूर आणि भंडारा जिल्ह्यासाठी सोडण्यात यावे. मध्यप्रदेशचा पाणीपुरवठा विस्कळीत न होता, हे पाणी महाराष्ट्राला देण्यात यावे, याकडेही बावनकुळे यांनी लक्ष वेधले.सावनेरचा विकास आराखडा रखडला बावनकुळे यांनी दिल्लीत कोळसामंत्री पीयूष गोयल यांचीही भेट घेतली. सावनेर शहरासह परिसराचा ८० टक्के भाग हा कोळसा खाणीसाठी आरक्षित करण्यात आला असल्यामुळे सावनेरचा विकास आराखडा मंजूर होऊ शकला नाही. कोळसा खाणीसाठी आरक्षण करण्यात आले. पण अजूनपर्यंत कोणतेही भूसंपादन वेकोलिने केलेले नाही. त्यामुळे शेतकरी आणि शहरातील नागरिक अडचणीत सापडले आहे. तसेच शहराचा विकास आराखडा मंजूर करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, याकडे बावनकुळे यांनी कोळसामंत्री पीयूष गोयल यांचे लक्ष वेधले.आदासा खाणीचे काम सुरू नाही आदासा खाणीसाठी २०५.४६ हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात आली. पण आजपर्यंत कोणतेही काम सुरु झाले नाही आणि भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांसाठी कोणताही करार करण्यात आला नाही. हेवती आणि मकरधोकडा या दोन्ही गावांचे पुनर्वसनही झाले नाही. हे दोन्ही विषय लवकर सोडविण्यात यावे, अशी विनंतीही कोळसा मंत्र्यांना करण्यात आली. याशिवाय कामठी रेल्वे स्टेशन आणि जवळच्या रेल्वे स्टेशनच्या समस्यांवरही दोन्ही मंत्र्यांची चर्चा झाली.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराजसिंह चौहानChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे