शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
4
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
5
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
6
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
7
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
8
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
9
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
10
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
11
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
12
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
13
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
14
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
15
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
16
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
17
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
18
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
19
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
20
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा

नाते घट्ट करण्यासाठी प्रेम वाटणे आवश्यक

By admin | Updated: June 3, 2016 03:00 IST

नाते घट्ट करण्यासाठी प्रेम वाटणे आवश्यक आहे. यामुळे संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता राहत नाही,

अब्दुल बासित यांचे मत : ताजबाग दर्गा व दीक्षाभूमीला दिली भेटनागपूर : नाते घट्ट करण्यासाठी प्रेम वाटणे आवश्यक आहे. यामुळे संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता राहत नाही, असे मत पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी व्यक्त केले.अब्दुल बासित सध्या नागपुरात असून त्यांनी गुरुवारी ताजबाग दर्गा, दीक्षाभूमी व झिरो माईलला भेट दिली. दरम्यान, त्यांनी काही वेळ पत्रकारांशी संवाद साधला. भारत व पाकिस्तानमधील कटुता जगजाहीर आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रेम वाटण्याची भूमिका मांडल्यामुळे नागरिकांमध्ये सकारात्मक संदेश गेला आहे. नागपुरातील ताजबाग दर्गा व पाकिस्तानातील दर्ग्यांमध्ये काहीच फरक नाही. नागपूर फारच सुंदर शहर असून येथील नागरिक आदरातिथ्यप्रिय आहेत. त्यांच्याकडून फार प्रेम मिळत आहे, असेही बासित यांनी सांगितले.बासित यांनी सर्वप्रथम दीक्षाभूमीला भेट दिली. त्यांनी भगवान गौतम बुद्धाच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांना दीक्षाभूमीच्या इतिहासाची माहिती देण्यात आली. दीक्षाभूमी समितीने त्यांचा सत्कारही केला. यानंतर ते देशाचे केंद्रस्थान असलेल्या झिरो माईल येथे पोहोचले. त्यांना झिरो माईलची विस्तृत माहिती देण्यात आली. येथून ते सायंकाळी ६.२० च्या सुमारास ताजबाग दर्गा येथे गेले. दर्ग्यात त्यांनी ताजबाग ट्रस्टचे अध्यक्ष शेख हुसेन व सचिव इकबाल वेलची यांच्यासोबत फातिहा पठण केले व दोन्ही देशांत शांती नांदण्याची प्रार्थना केली. मोठ्या मशिदीमध्ये त्यांनी नमाज पठण केले. या ठिकाणी त्यांनी किमान एक तास घालवला. दरम्यान, त्यांना हजरत बाबा ताजुद्दीन यांच्यासंदर्भात माहिती देण्यात आली.(प्रतिनिधी)