शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त आवरमारा गावाचे पुनर्वसन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 19:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पग्रस्त आवरमारा (ता. कुही) गावाचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून गावकऱ्यांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी विनंती मुंबई उच्च न्यायालया च्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली आहे. यासंदर्भात शेतकरी कवडू वंजारी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.गोसेखुर्द प्रकल्प व कन्हान नदीच्या पाण्यामुळे ...

ठळक मुद्देहायकोर्टात याचिका : नागरिकांना सोसावा लागतोय विविध त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पग्रस्त आवरमारा (ता. कुही) गावाचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करून गावकऱ्यांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी विनंती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला करण्यात आली आहे. यासंदर्भात शेतकरी कवडू वंजारी यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.गोसेखुर्द प्रकल्प व कन्हान नदीच्या पाण्यामुळे गावकऱ्यांना विविध प्रकारचा त्रास सहन करावा लागत आहे. हे गाव कन्हान नदीच्या काठावर वसले आहे. गावाच्या उत्तर व पूर्व बाजूला नदीचा वेढा आहे तर, दक्षिण बाजूला गोसेखुर्दचा मोठा कालवा आहे. त्यामुळे पावसाळ्यात संपूर्ण गाव जलमय होते. भविष्यात मोठा पाऊस झाल्यास गावकऱ्यांना प्राण वाचविण्यासाठी गाव खाली करावे लागू शकते. सध्या गावातून बाहेर पडण्यासाठी मातीगोट्यांचा एकच मार्ग आहे. गावकऱ्यांची शेती कन्हान नदीच्या दोन्ही बाजूला आहे. शेतात जाण्यासाठी नावेने नदी ओलांडावी लागते. नावेत शेती यंत्रे, खते, कीटकनाशके इत्यादी साहित्य नेताना अडचणी येतात. धरणाच्या व नदीतील पाण्यामुळे डास व अन्य कीटकांचा त्रास वाढला आहे. त्यातून आरोग्याच्या विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. परिणामी, उर्वरित जमीन संपादित करून गावकऱ्यांचे पुनर्वसन करणे आवश्यक आहे. यासंदर्भात सरकारला निवेदन सादर करण्यात आले होते, पण त्याची दखल घेण्यात आली नाही असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. सरकारने धरणातील पाण्यामुळे झालेल्या नुकसानीचे मूल्यांकन करून गावकºयांना कायद्यानुसार भरपाई द्यावी व आरोग्यविषयक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांचा समावेश असणारी जिल्हास्तरीय समिती स्थापन करावी असेही याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे.केंद्र व राज्य सरकारला नोटीसउच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व अरुण उपाध्ये यांनी केंद्र सरकार, राज्य पाटबंधारे विभाग, जिल्हाधिकारी व गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता यांना नोटीस बजावून यावर १३ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला आहे. तसेच, यादरम्यान सरकारला पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्याची मोकळीक देण्यात आली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. प्रकाश रणदिवे यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्पHigh Courtउच्च न्यायालय