शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
7
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
8
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
9
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
10
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
11
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
12
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
13
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
14
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
15
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
16
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
17
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
18
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
19
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
20
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच

कर्जमाफीसाठी ७९ हजार शेतकºयांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:07 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ७९ हजार शेतकºयांनी आतापर्यंत आॅनलाईन अर्ज केले आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी घेतला आढावा : एकही लाभार्थी वंचित राहू नये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ७९ हजार शेतकºयांनी आतापर्यंत आॅनलाईन अर्ज केले आहेत.आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला. या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी केली. तसेच तहसीलदार, मंडळ अधिकारी, कृषी सहायक व तलाठी यांनी प्रत्येक गावात शेतकºयांच्या बैठकी घेऊन आॅनलाईन कर्जमाफीचे अर्ज १५ सप्टेंबरपूर्वी भरून घ्यावेत, अशा सूचनाही दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचतभवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते. कर्जमाफीसंदर्भात राष्ट्रीयकृत बँकांनी तात्काळ लाभार्थी शेतकºयांच्या याद्या संबंधित तहसीलदाराकडे उपलब्ध करून द्याव्यात.तहसीलदारांनी यातून गावनिहाय याद्या तयार कराव्यात. कुणी सुटत असतील तर त्यांचे आॅनलाईन अर्ज भरून घ्यावेत. या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी उपविभागीय महसूल अधिकाºयांनी घ्यावी. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात अद्यापपर्यंत ज्या शेतकºयांना योजनेची माहिती नाही अशा सर्व शेतकºयांकडून कर्जमाफीचे अर्ज भरून घ्यावेत, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर, अविनाश कातडे, जिल्हा उपनिबंधक एस.एल. भोसले, लिड बँक मॅनेजर अयुब खान, तसेच सर्व तहसीलदार, बँकेचे व्यवस्थापक, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घ्यावाशासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी प्रत्येक बँकेच्या शाखेत शेतकरी कर्जदारांना माहिती देण्यासाठी तसेच आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बँकेच्या अधिकाºयांना केल्या.टाळाटाळ करणाºया बँकावर नाराजीपात्र लाभार्थ्यांच्या याद्या देण्यासाठी टाळाटाळ करणाºया बँकेबद्दल नाराजी व्यक्त करून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सर्व बँकांना सूचना देऊन सायंकाळपर्यंत तहसीलदारांकडे बँकनिहाय याद्या प्राप्त होतील या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.१.६० लाख शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज बाकीजिल्ह्यातील मंडळ तसेच ग्रामपंचायत स्तरापर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी ६२४ बायोमेट्रिक केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील तीन दिवसात ६७ हजार आॅनलाईन अर्ज भरून घेण्यात आले असून आजपर्यंत ७९ हजार अर्ज भरण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. जिल्ह्यात सुमारे १ लक्ष ६० हजार शेतकºयांकडून कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरून घ्यायचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.शेतकºयांसाठी टोल फ्री क्रमांककर्जमाफी योजनेचा लाभ घेताना शेतकरी सभासदांना आॅनलाईन अर्ज भरताना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ७८८७४६३२९० हा स्वतंत्र टोलफ्री क्रमांक सुरू केला आहे. शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरताना बॉयोमेट्रिक संदर्भात तसेच इतर कुठलीही अडचण आल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.जिल्हाधिकाºयांचे काम चांगले, प्रभावीजिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे शासनाच्या योजनांचे काम चांगले आणि प्रभावीपणे करीत आहेत. त्यांच्या कामावर सरकार समाधानी आहे, अशी पावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली. पण तालुका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी मात्र सुस्त आहेत, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या प्रयत्नांवरच या योजनेचे यश अवलंबून आहे, हे लक्षात घ्यावे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत हलगर्जी झाली तर खपवून घेतली जाणार नाही, असेही पालकमंत्री आणि जिल्हाधिकाºयांनी सर्व अधिकाºयांना सांगितले.