शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कर्जमाफीसाठी ७९ हजार शेतकºयांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:07 IST

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ७९ हजार शेतकºयांनी आतापर्यंत आॅनलाईन अर्ज केले आहेत.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांनी घेतला आढावा : एकही लाभार्थी वंचित राहू नये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यातील ७९ हजार शेतकºयांनी आतापर्यंत आॅनलाईन अर्ज केले आहेत.आॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा घेतला. या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याची सूचना त्यांनी केली. तसेच तहसीलदार, मंडळ अधिकारी, कृषी सहायक व तलाठी यांनी प्रत्येक गावात शेतकºयांच्या बैठकी घेऊन आॅनलाईन कर्जमाफीचे अर्ज १५ सप्टेंबरपूर्वी भरून घ्यावेत, अशा सूचनाही दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील बचतभवन सभागृहात आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे उपस्थित होते. कर्जमाफीसंदर्भात राष्ट्रीयकृत बँकांनी तात्काळ लाभार्थी शेतकºयांच्या याद्या संबंधित तहसीलदाराकडे उपलब्ध करून द्याव्यात.तहसीलदारांनी यातून गावनिहाय याद्या तयार कराव्यात. कुणी सुटत असतील तर त्यांचे आॅनलाईन अर्ज भरून घ्यावेत. या संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी उपविभागीय महसूल अधिकाºयांनी घ्यावी. शेतकरी कर्जमाफीसंदर्भात अद्यापपर्यंत ज्या शेतकºयांना योजनेची माहिती नाही अशा सर्व शेतकºयांकडून कर्जमाफीचे अर्ज भरून घ्यावेत, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले.यावेळी उपविभागीय महसूल अधिकारी बाळासाहेब कोळेकर, अविनाश कातडे, जिल्हा उपनिबंधक एस.एल. भोसले, लिड बँक मॅनेजर अयुब खान, तसेच सर्व तहसीलदार, बँकेचे व्यवस्थापक, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.राष्ट्रीयकृत बँकांनी पुढाकार घ्यावाशासनाच्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना मिळण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांनी प्रत्येक बँकेच्या शाखेत शेतकरी कर्जदारांना माहिती देण्यासाठी तसेच आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करावी, अशी सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बँकेच्या अधिकाºयांना केल्या.टाळाटाळ करणाºया बँकावर नाराजीपात्र लाभार्थ्यांच्या याद्या देण्यासाठी टाळाटाळ करणाºया बँकेबद्दल नाराजी व्यक्त करून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा समन्वय समितीच्या माध्यमातून अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सर्व बँकांना सूचना देऊन सायंकाळपर्यंत तहसीलदारांकडे बँकनिहाय याद्या प्राप्त होतील या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.१.६० लाख शेतकºयांचे आॅनलाईन अर्ज बाकीजिल्ह्यातील मंडळ तसेच ग्रामपंचायत स्तरापर्यंत आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी ६२४ बायोमेट्रिक केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील तीन दिवसात ६७ हजार आॅनलाईन अर्ज भरून घेण्यात आले असून आजपर्यंत ७९ हजार अर्ज भरण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली. जिल्ह्यात सुमारे १ लक्ष ६० हजार शेतकºयांकडून कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरून घ्यायचे असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.शेतकºयांसाठी टोल फ्री क्रमांककर्जमाफी योजनेचा लाभ घेताना शेतकरी सभासदांना आॅनलाईन अर्ज भरताना येणाºया अडचणी सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ७८८७४६३२९० हा स्वतंत्र टोलफ्री क्रमांक सुरू केला आहे. शेतकºयांना आॅनलाईन अर्ज भरताना बॉयोमेट्रिक संदर्भात तसेच इतर कुठलीही अडचण आल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी केले आहे.जिल्हाधिकाºयांचे काम चांगले, प्रभावीजिल्हाधिकारी सचिन कुर्वे हे शासनाच्या योजनांचे काम चांगले आणि प्रभावीपणे करीत आहेत. त्यांच्या कामावर सरकार समाधानी आहे, अशी पावती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिली. पण तालुका प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी मात्र सुस्त आहेत, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. प्रशासनाच्या प्रयत्नांवरच या योजनेचे यश अवलंबून आहे, हे लक्षात घ्यावे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत हलगर्जी झाली तर खपवून घेतली जाणार नाही, असेही पालकमंत्री आणि जिल्हाधिकाºयांनी सर्व अधिकाºयांना सांगितले.