शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
3
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
4
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
5
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
6
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
7
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
8
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
9
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
10
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
11
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
12
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
13
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
14
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
15
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
16
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
17
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
18
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
19
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
20
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
Daily Top 2Weekly Top 5

शासनाची पुन्हा नाचक्की

By admin | Updated: March 30, 2016 03:05 IST

आदर्श शिक्षकांच्या वेतनवाढीसंदर्भातील प्रकरणात शासनाची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. शासनाने स्वत:ची बाजू उचलून धरण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळला गेला आहे.

हायकोर्टातील अर्ज खारीज : आदर्श शिक्षकांच्या वेतनवाढीचे प्रकरणनागपूर : आदर्श शिक्षकांच्या वेतनवाढीसंदर्भातील प्रकरणात शासनाची पुन्हा एकदा नाचक्की झाली आहे. शासनाने स्वत:ची बाजू उचलून धरण्यासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेला अर्ज फेटाळला गेला आहे.राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी देण्याचे शासनाचे धोरण होते. ४ सप्टेंबर २०१४ रोजी जीआर जारी करून या धोरणात बदल करण्यात आला. आदर्श शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी न देता एकमुस्त एक लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय ४ सप्टेंबर २०१४ पासून पुढे लागू असताना शासनाने त्यापूर्वीच्या अनेक आदर्श शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी दिल्या नाहीत. यामुळे नागपूर, अमरावती, गोंदिया, अकोला येथील शिक्षकांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती.दरम्यान, शासनाने संबंधित जीआर ४ सप्टेंबर २०१४ पूर्वीच्या आदर्श शिक्षकांना लागू होणार नाही व त्यांना दोन आगाऊ वेतनवाढी दिल्या जातील, असे न्यायालयाला सांगितले होते. यामुळे १६ डिसेंबर २०१४ रोजी न्यायालयाने याचिकाकर्त्यांना सहा महिन्यांत वेतनवाढी देण्याचे निर्देश देऊन याचिका निकाली काढली होती. या आदेशाचे अद्यापही पालन झाले नाही.या प्रकरणात शासनाला आतापर्यंत तीन-चारवेळा दणका बसला आहे. असे असतानाही शासनाने १६ डिसेंबर २०१४ रोजीच्या आदेशावर पुनर्विचार करण्यासाठी अर्ज सादर केला होता. याचिकाकर्त्यांना दोन आगाऊ वेतनवाढी देण्याचे वक्तव्य चुकीने करण्यात आले होते. यामुळे नव्याने सुनावणीची संधी देऊन आदेशावर पुनर्विचार करावा, अशी विनंती अर्जात करण्यात आली होती. न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व विनय देशपांडे यांनी शासनाची बाजू ऐकल्यानंतर हा अर्ज फेटाळून लावला. तसेच, १६ डिसेंबर २०१४ रोजीच्या आदेशावर अंमलबजावणी करण्यासाठी शासनाला आणखी सहा आठवड्यांचा वेळ दिला. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न झाल्यामुळे संबंधित शिक्षकांनी न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. पुढील तारखेस या अवमानना याचिकेवर सुनावणी होणार असून, त्यावेळी शासनाने आदेशावर अंमलबजावणी केली की नाही, याची माहिती घेण्यात येणार आहे. शिक्षकांतर्फे अ‍ॅड. ए.आर. देशपांडे यांनी बाजू मांडली.सचिवांनी मागितली होती क्षमा-याप्रकरणात आदेशाचे पालन झाले नाही म्हणून गेल्या १६ फेब्रुवारी रोजी वित्त विभागाचे प्रधान सचिव (खर्च) सीताराम कुंटे व शालेय शिक्षण विभागाचे सचिव नंदकुमार यांनी व्यक्तीश: उपस्थित राहून न्यायालयाची क्षमा मागितली होती. दोन्ही अधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आले होते. न्यायालयाने क्षमा स्वीकारून त्यांना अवमानना कारवाईतून मुक्त केले होते. तसेच, यापुढे शासकीय अधिकारी न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करतील अशी अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु, परिस्थितीत काहीच बदल झाला नाही.