शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

अवनी प्रकरणात अवमानना कारवाई करण्यास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:08 IST

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अवनी प्रकरणामध्ये वन विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह एकूण नऊ अधिकाऱ्यांविरुद्ध अवमानना ...

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी अवनी प्रकरणामध्ये वन विभागाचे तत्कालीन प्रधान सचिव विकास खारगे यांच्यासह एकूण नऊ अधिकाऱ्यांविरुद्ध अवमानना कारवाई करण्यास नकार दिला. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला.

सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपन्ना व न्या. व्ही. रामासुब्रमनियन यांच्या न्यायपीठाने हा निर्णय दिला. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वन परिक्षेत्रात अवनी (टी-१) वाघिणीला ठार मारण्यात आल्यानंतर खासगी शूटर असगरअली खान यांना बक्षीस देण्यात आल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाला असा दावा करणारी याचिका वन्यजीव संशोधक संगीता डोगरा यांनी दाखल केली होती. त्यात विकास खारगे यांच्यासह नऊ अधिकाऱ्यांविरुद्ध अवमानना कारवाई करण्याची विनंती न्यायालयाला करण्यात आली होती. न्यायालयाने राज्य सरकारची बाजू ऐकल्यानंतर डोगरा यांची विनंती मंजूर करण्यास नकार देऊन याचिका फेटाळण्याचे संकेत दिले. दरम्यान, डोगरा यांनी याचिका मागे घेण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने ती विनंती मान्य केल्यामुळे याचिका मागे घेण्यात आली.

अवनीने १३ महिला-पुरुषांची शिकार केल्याचा वन विभागाचा दावा लक्षात घेता ११ सप्टेंबर २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने तिला ठार मारण्याची परवानगी दिली होती आणि ठार मारणाऱ्या व्यक्तीस बक्षीस देण्यास मनाई केली होती. असे असताना अवनीला ठार मारण्यात आल्यानंतर जंगी कार्यक्रम आयोजित करून खासगी शूटर असगरअली खान यांना वाघिणीची चांदीची मूर्ती भेट देण्यात आली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली झाली असा आरोप अवमानना याचिकेत करण्यात आला होता.

--------------------

राज्य सरकारने असे मुद्दे मांडले

राज्य सरकारच्यावतीने नागपूर येथील ॲड. कार्तिक शुकुल यांनी बाजू मांडून विविध महत्वपूर्ण मुद्यांकडे सर्वोच्च न्यायालयाचे लक्ष वेधले. ते मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.

१ - राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा आरोप चुकीचा आहे.

२ - अवनी नरभक्षक होती किंवा नाही, यावर सर्वोच्च व उच्च न्यायालयाने आधीच निर्णय दिला आहे.

३ - अवनीला ठार मारणाऱ्या खासगी शुटर्सचा सत्कार करण्यात आला नाही.

४ - अवनीच्या शवविच्छेदन अहवालात बदल करण्यात आला नाही. अहवालामध्ये विविध ठिकाणी गोळ्याचे घाव असल्याचा उल्लेख आहे.