शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

भूखंडाच्या विकास शुल्कात कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 03:11 IST

कष्टाचा एक एक रुपया गोळा करून लोक शहरात भूखंड खरेदी करतात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा : हजारो नागरिकांना फायदानागपूर : कष्टाचा एक एक रुपया गोळा करून लोक शहरात भूखंड खरेदी करतात. मात्र, तो भूखंड नियमित करण्यासाठी नासुप्रमध्ये हजारो रुपये शुल्कापोटी भरावे लागतात. यामुळे त्रस्त झालेल्या नागपूरकरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा दिलासा दिला आहे. विकास शुल्काच्या दरात मोठी कपात करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी शनिवारी केली. यामुळे एक हजार चौरस फुटाचा भूखंड नियमित करण्यासाठी सध्याच्या दराच्या तुलनेत आता सुमारे ३५ ते ४० हजार रुपयांची बचत होणार आहे. नागपुरातील हजारो भूखंडधारकांना याचा फायदा होणार आहे.नासुप्रतर्फे शनिवारी दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील मौजा भामटी, परसोडी व जयताळा येथील नागरिकांसाठी गुंठेवारी नियमित अभिन्यासातील भूखंडांचे नियमितीकरण करण्यासाठी नैैवेद्यम सभागृह येथे शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही घोषणा केली. नासुप्रतर्फे ना विकास क्षेत्र (एनडीझेड) व हरित पट्ट्यातील (ग्रीन बेल्ट) ले-आऊटमधील भूखंड नियमित करण्यासाठी सध्या प्रति चौरस फूट १२० रुपये शुल्क आकारले जाते. यात कपात करून आता प्रति चौरस फूट ७५ रुपये शुल्क आकारले जाईल. तर नियमित ले-आऊटमधील भूखंड नियमित करण्यासाठी सुरुवातीला प्रति चौरस फूट १६ रुपये प्रमाणे शुल्क आकारले जात होते. त्यात वाढ करून प्रति चौरस फूट ५६ रुपये प्रमाणे शुल्क आकारले जात आहे. नासुप्रच्या विश्वस्त मंडळाने दोन महिन्यांपूर्वी या शुल्कात दुप्पट वाढ करून प्रति चौरस फूट ११२ रुपये करण्याचा ठराव मंजूर केला. संबंधित ठराव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यातही दिलासा दिला आहे. नासुप्रने दर दुप्पट करण्याचा प्रस्ताव दिला असला तरी तसे न करता दर दुप्पट ऐवजी दीडपट केले जातील, असे त्यांनी जाहीर केले. यामुळे नियमित ले-आऊटमधील भूखंड नियमित करण्यासाठी ८० ते ८५ रुपये विकास शुल्क आकारले जाईल. मात्र, यासाठी नासुप्रला तसा सुधारित प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर करावा लागणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री ही घोषणा करीत असताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व उपस्थित आमदारांनी संबंधित शुल्क देखील ५६ रुपये करण्यात आल्याची चिठ्ठी मुख्यमंत्र्यांकडे सोपविली. मुख्यमंत्र्यांनी ती वाचूनही दाखविली. मात्र, मुख्यमंत्र्यांनी नंतर मला गोंधळवू नका, असे सांगत शुल्क दीडपट होणार असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमानंतर मात्र आमदारांनी संबंधित शुल्क ५६ रुपये करण्याचा ठराव नासुप्रच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत मंजूर करून राज्य सरकारकडे पाठविला जाईल, असे पत्रकारांना सांगितले. तसे झाले तर संबंधित दर ५६ रुपये होऊ शकतो.