शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

मास्कच्या वापराने व्हायरलचे रुग्ण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:24 IST

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्कच्या वापराची सवय गरजेची झाली आहे. या सवयीमुळे कोरोनाच नव्हे तर विषाणूजन्य आजारांनाही दूर ठेवणे ...

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्कच्या वापराची सवय गरजेची झाली आहे. या सवयीमुळे कोरोनाच नव्हे तर विषाणूजन्य आजारांनाही दूर ठेवणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, बदलत्या वातावरणामुळे व्हायरलच्या रुग्णांत दरवर्षी मोठी वाढ होते, परंतु मास्कचा उपयोग वाढल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी विषाणूजन्य आजारांचे रुग्ण कमी झाले आहेत. मास्कचा वापर व सुरक्षित अंतराचे आपण नेहमी पालन केल्यास क्षयरोगाच्या नव्या रुग्णांतही घट येऊ शकते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढताच मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व वारंवार हात धुणे या त्रिसूत्रींचे आवाहन केले जात आहे. आता तर हा एक जीवनशैलीचा भाग झाला आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरण्यास प्राधान्य दिले जात आहे. याचा फायदा कोरोनासोबतच इतर विषाणूजन्य आजारांना दूर ठेवण्यास मदत होत आहे. परंतु दरम्यानच्या काळात कोरोनाचे रुग्ण कमी होताच मास्कचा वापर कमी झाल्याचे दिसून आले. परिणामी, महानगरपालिका व पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. दंडाची रक्कम वाढवून ५०० रुपये केली. यामुळे कारवाईच्या भितीने का होईना, मास्कचा वापर पुन्हा वाढला आहे. कोरोनासोबतच इतर विषाणूजन्य आजारांना दूर ठेवण्यास त्याचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

अ‍ॅलर्जी सारख्या रुग्णांची संख्याही कमी

पावसाळ्यात व हिवाळ्यात सर्वाधिक रुग्ण अ‍ॅलर्जीचे दिसून यायचे. सर्दी, खोकल्याने नागपुरकर हैराण व्हायचे. परंतु शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये आता या आजाराचे फार कमी रुग्ण दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरवर्षी दिसणाºया संसर्गजन्य आजार स्वाईन फ्लूचे रुग्ण नसल्यासारखेच आहेत.

-श्वसनाच्या आजारांच्या रुग्णांतही घट

या दिवसांत धुर व धुळीमुळे वाढणाºया अस्थमाचे रुग्ण कमी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. श्वसनाचा आजार असलेल्यांसाठी मास्क वापरण्याचे आवाहन पूर्वीपासून केले जात होत होते. परंतु आता त्याचा उपयोग करणाºयांची संख्या वाढल्याने याचा फायदा रुग्णांना होता दिसून येत आहे.

-ओपीडीत मोठी घट

मेडिकल व मेयोमध्ये हिवाळाच्या दिवसांत २५०० ते ३००० वर ओपीडी असायची. यात बहुसंख्य रुग्ण हे व्हायरल व श्वसनाशी संबंधित आजाराचे असायचे. परंतु आता १००० ते १५००वर ओपीडी आली आहे. सध्या लॉकडाऊनच्या दरम्यान अंगावर आजार काढलेले रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

विषाणूजन्य आजारांना दूर ठेवण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे ही त्रिसूची महत्त्वाची ठरते. कोरोनाचा दहशतीमुळे का होईना याचा वापर वाढला आहे. परिणामी, सर्दी, खोकला, व्हायरलचे रुग्ण कमी दिसून येत आहे.

-डॉ. प्रशांत पाटील, प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल

मागीलवर्षी ओपीडी-२५००

या वर्षीची ओपीडी १५००

(मागील वर्षी आणि या वर्षी हिवाळ्यातील मेडिकलमधील एका दिवसाची आकडेवारी)