शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

‘भारांकन’ पदभरतीचा घोळात घोळ

By admin | Updated: May 23, 2017 02:11 IST

कृषी विभागातील कृषी सेवकांच्या रिक्त पदभरतीसाठी सध्या ‘भारांकन’ पद्घतीने पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे.

कृषी सेवक पदभरती : विभागात १३८ पदे रिक्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कृषी विभागातील कृषी सेवकांच्या रिक्त पदभरतीसाठी सध्या ‘भारांकन’ पद्घतीने पदभरती प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र या अतिशय क्लिष्ट पद्घतीमुळे पुन्हा घोळात घोळ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे, राज्य शासनाने कृषी विभागातील या रिक्त पदभरतीसाठी मागील २९ डिसेंबर २०१५ रोजी एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर ६ आॅगस्ट २०१६ रोजी लेखी परीक्षा घेऊन, ६ सप्टेंबर २०१६ रोजी उमेदवारांची निवड यादी जाहीर केली होती. परंतु त्या निवड यादीत अनियमितता झाल्याने संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द केली होती. त्यानंतर मागील वर्षभरापासून संपूर्ण निवड प्रक्रिया थंडबस्त्यात पडली होती. परंतु अलीकडेच राज्य शासनाने ती रखडलेली कृषी सेवकांची पदभरती थेट ‘भारांकन’ पद्घतीने पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नागपूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाने प्रक्रिया सुरू केली. यात लेखी परीक्षेसाठी कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या पात्र कृषी पदविका व कृषी पदवीधारक उमेदवारांमधून ही निवड केली जाणार आहे. मात्र त्यासाठी कृषी विभागाला सर्व उमेदवारांच्या अर्जांमधून सर्वसाधारण गुणवत्ता यादी तयार करायची आहे. ते काम कृषी विभागासाठी चांगलेच डोकेदुखी बनले आहे. या भारांकन पद्घतीत उमेदवारांच्या पदविका किंवा पदवीतील गुणांच्या आधारे निवड करायची आहे. नागपूर विभागात एकूण १३८ पदे असून, त्यासाठी १३ हजार ४८६ उमेदवारांनी कृषी विभागाकडे अर्ज सादर केलेले आहेत. मात्र कृषी विभागाकडे प्राप्त झालेल्या बऱ्याच उमेदवारांच्या आॅनलाईन अर्जात इयत्ता दहावी, कृषी पदविका व कृषी पदवीची टक्केवारी नमूद केलेली नाही, शिवाय काहींनी चुकीची टक्केवारी दिली आहे. उमेदवारांच्या अर्जातील या त्रुटी दूर करण्यासाठी कृषी विभागातर्फे मागील २३ एप्रिलपासून आतापर्यंत तीन शिबिर घेण्यात आले आहे. मात्र तरीही अजूनपर्यंत ९०० पेक्षा अधिक उमेदवारांच्या अर्जात त्रुटी शिल्लक असल्याची माहिती कृषी विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कृषी पदवीधारकांवर अन्याय का?जाणकारांच्या मते, या ‘भारांकन’ पद्घतीत केवळ पदविका आणि पदवीतील गुणांच्या आधारे निवड केली जाणार आहे, त्यामुळे लेखी परीक्षेतील गुणांचे काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय अनेक उमेदवारांनी कृषी पदविका अभ्यासक्रम हा खासगी महाविद्यालयांमधून पूर्ण केलेला आहे. त्यामुळे त्यांना निश्चितच कृषी पदवीधारक उमेदवारांपेक्षा अधिक गुण मिळाले आहे. त्यामुळे या ‘भारांकन’ पद्घतीत अधिक परिश्रम करून कृषी पदवी प्राप्त करणाऱ्या हुशार उमेदवारांऐवजी खासगी महाविद्यालयातून पदविका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड होण्याची अधिक शक्यता आहे. कृषी विभागाकडे प्राप्त अर्जामध्ये बहुतांश उमेदवार पदविकाधारक असून, त्यांचे गुण पदवीधारक उमेदवारांपेक्षा फार अधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ही ‘भारांकन’ निवड पुन्हा एका नव्या वादात अडकणार का? अशी भीती व्यक्त केली जात आहे.