शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

प्रशासनामुळे अडली परिचारिकांची भरती

By admin | Updated: May 9, 2014 02:30 IST

'हेल्थ पोस्ट' साठी ६0 परिचारिकांच्या भरतीचे प्रकरण मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अडले आहे. इतकेच नव्हे तर मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी एक वर्ष होऊनही नियुक्ती न झाल्याने ही ....

नागपूर : 'हेल्थ पोस्ट' साठी ६0 परिचारिकांच्या भरतीचे प्रकरण मनपा प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अडले आहे. इतकेच नव्हे तर मनपा आयुक्त श्याम वर्धने यांनी एक वर्ष होऊनही नियुक्ती न झाल्याने ही नियुक्ती प्रक्रियाच थांबविण्याची शिफारस केली आहे. संबंधित हेल्थ पोस्ट'मधील डॉक्टर आणि परिचारिकांचे वेतन देण्यास केंद्र सरकार तयार होते. अशा परिस्थितीत जाणीवपूर्वक भरती अडकवून ठेवण्यात आली. या प्रकरणात थेट आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप करीत त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक प्रकाश तोतवानी यांनी पत्रपरिषदेद्वारा केली आहे. तोतवानी यांनी सांगितले की, हेल्थ पोस्टसाठी १५ पैकी १२ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तीन जागा आरक्षित असल्याने ती पदे भरण्यात आलेली नाही. परिचारिकांची नियुक्ती होऊ न शकल्याने डॉक्टरांचे वेतन महापालिकेलाच द्यावे लागत आहे. २00९ मध्ये हेल्थ पोस्टसाठी जाहिरात काढण्यात आली. मुलाखती झाल्या. १५ डॉक्टर, ६0 नर्स आणि १६ मिडवाईफ नर्सच्या नियुक्तीच्या प्रस्तावास मान्यता मिळाली. २0१0 मध्ये डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली. परंतु परिचारिकांची नियुक्ती मात्र अडकली. परिचारिकांच्या नियुक्तीसाठी २२ एप्रिल २0१२ रोजी मनपा आयुक्तांनी राज्य सरकारला पत्र पाठवून त्यासंदर्भात सूचना मागविल्या. २५ मे २0१२ ला पत्र आले की परिचारिकांची भरती करता येऊ शकते. २८ सप्टेंबर २0१२ ला मनपा सभागृहात प्रस्तावाला मंजुरी मिळाली. चार महिन्यानंतर अंमलबजावणी करण्याची तयारी झाली. मुलाखती व इतर प्रक्रियाही पार पडल्या. परंतु नियुक्ती मात्र झाली नाही. एक वर्ष उलटल्यानंतर मनपाने पुन्हा १२ मार्च २0१४ ला राज्य सरकारला पत्र पाठविले आणि केलेली नियुक्ती रद्द करण्यात यावी, अशी शिफारस केली आहे. (प्रतिनिधी) 

यासाठीच मनपाने घेतली माघार ■ प्रशासकीय सूत्रानुसार केंद्र सरकारने संबंधित नियुक्तीला मान्यता दिली आहे. परंतु नंतर त्यात एक अटसुद्धा घातली आहे. त्या अटीनुसार कुटुंब नियोजनामध्ये जे हेल्थ पोस्ट यशस्वी राहतील त्याच डॉक्टर व परिचारिकांच्या वेतनासाठी अनुदान दिले जाईल. ८0 टक्के यशस्वी ठरणार्‍यांना १00 टक्के, ८0 ते ५0 टक्के यशस्वी ठरणार्‍यांना ५0 टक्के आणि त्याखाली राहणार्‍यांना अनुदान मिळणार नाही. यामुळेच मनपा संबंधित नियुक्तीतून माघार घेत आहे.