शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

कोरोना रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 20:24 IST

Corona death, PIL कोरोना रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा आणि येणाऱ्या काळात कोरोना रुग्ण दगावू नये याकरिता त्यांना प्रभावी वैद्यकीय उपचार व सुविधा पुरविण्यात याव्या, अशा विनंतीसह जनार्दन मून व इतर चार सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.

ठळक मुद्देपाच सामाजिक कार्यकर्त्यांची उच्च न्यायालयात जनहित याचिका

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना रुग्णांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात यावा आणि येणाऱ्या काळात कोरोना रुग्ण दगावू नये याकरिता त्यांना प्रभावी वैद्यकीय उपचार व सुविधा पुरविण्यात याव्या, अशा विनंतीसह जनार्दन मून व इतर चार सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे.

राज्यघटनेतील तरतुदीनुसार नागरिकांच्या प्राणाचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु, देशातील केंद्र सरकार व राज्य सरकार हे दोघेही नागरिकांना कोरोना संक्रमणापासून वाचविण्यात अपयशी ठरले आहेत. कोरोना संक्रमण झपाट्याने वाढत असून कोरोना रुग्णांना वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. जीवनरक्षक औषधे व ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. मृतांना न्याय मिळण्यासाठी जबाबदार व्यक्तींविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविणे आवश्यक आहे, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकेत केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव, राज्याच्या आरोग्य विभागाचे सचिव, नागपूर महानगरपालिका आयुक्त व जिल्हाधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲड. अश्विन इंगोले कामकाज पाहणार आहेत.

घरोघरी जाऊन लसीकरण करावे

कोरोना संक्रमण थोपविण्यासाठी सरकारने नागरिकांना घरोघरी जाऊन कोरोना प्रतिबंधक लस टोचणे आणि त्यांची ॲन्टिजेन व आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक आहे. परंतु, सरकार तसे न करता नागरिकांना ठराविक ठिकाणी बोलवत आहे. परिणामी, कोरोना संक्रमण वाढत आहे. याशिवाय अनेक डॉक्टर कोरोना उपचार नियमांचे पालन करीत नाही. त्यामुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. काही असामाजिक तत्त्व आर्थिक लाभासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करीत आहे. तसेच, राज्यातील खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांकडून अतिरिक्त घेतलेले ३६ लाख १७ हजार २८० रुपये सरकारने अद्याप वसूल करून दिले नाही, असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयcorona virusकोरोना वायरस बातम्या