शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला रेकॉर्डब्रेक भाव ८ हजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:07 IST

नागपूर : यंदा मुसळधार पावसामुळे सोयाबीनचे पीक खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच व्यापारी आणि शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या ...

नागपूर : यंदा मुसळधार पावसामुळे सोयाबीनचे पीक खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच व्यापारी आणि शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळत आहे. भाव जास्त मिळत असल्याने अनेक जण कळमना बाजारात सोयाबीन विक्रीसाठी आणत असून, शनिवारी रेकॉर्डब्रेक भावात अर्थात ८ हजार रुपये क्विंटलने सोयाबीनची विक्री झाली. भाववाढीसाठी कमी आवक कारणीभूत असल्याचे अडत्यांनी सांगितले.

सणांमुळे खाद्यतेलाची मागणी वाढली

बाजारात सोयाबीनचा भाव वाढला असला तरीही सध्या कळमना बाजारात केवळ ४०० ते ५०० क्विंटल पोत्यांचीच आवक आहे. त्यात व्यापारी जास्त माल आणत आहेत. कळमना धान्य बाजाराचे अध्यक्ष अतुल सेनाड म्हणाले, विदेशी बाजारात मंदी आहे; पण देशात सणांमुळे मागणी वाढल्याने खाद्यतेल आणि तेलबियांच्या बाजारात सोयाबीनचा भाव रेकॉर्ड स्तरावर पोहोचला आहे. याशिवाय कमी आवक असल्याने भाववाढ झाली आहे. यावर्षी खरीप हंगामाचे सोयाबीन दसऱ्यानंतर बाजारात येणार आहे. यावर्षी सोयाबीनची जास्त लागवड झाली आहे. सध्या पीक चांगले आहे; पण यंदा पावसाच्या अनिश्चिततेमुळे पिकावर संकटच आहे. गेल्या वर्षी काढणीच्या वेळी पाऊस मोठ्या प्रमाणात आल्याने सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यामुळे उत्पन्नात ५० टक्क्यांची घट झाली होती. त्याच कारणाने खाद्यतेलाचे भावही वाढले होते. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदा तशीच परिस्थिती ओढवू नये, असे सेनाड यांनी स्पष्ट केले.

सरकारने तेलबियांच्या उत्पादनावर भर द्यावा

यंदा सोयाबीनच्या तुलनेत कापसाची लागवड कमी झाली आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला जास्त भाव मिळाल्याने सोयाबीनची लागवड वाढली आहे. याशिवाय यंदा सोयाबीनचे बियाणे महाग झाल्याने शेतकऱ्यांची गुंतवणूक वाढली आहे. सेनाड म्हणाले, लातूर आणि नांदेड येथील सोयाबीन तेलनिर्मिती प्रकल्प संचालकांनी सोयाबीन ८,४५० ते ८,७०० रुपये क्विंटल खरेदी केले आहे. हा एक रेकॉर्डच आहे. वाढते दर पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीनची जास्त पेरणी करावी. सरकारने खाद्यतेलाचे आयात शुल्क कमी करण्याऐवजी तेलबियांच्या उत्पादन वाढीवर भर द्यावा आणि आयातीसाठी विदेशी बाजारावर अवलंबून राहू नये. एवढेच नव्हे तर पामोलिनच्या आयातीवर नियंत्रण आणावे, अन्यथा घरगुती रिफायनरी कंपन्या संकटात येतील.