शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

१० हजारावर जागांची शिफारस

By admin | Updated: April 8, 2016 03:03 IST

‘एमसीआय’ (मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया)ने २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना एम.बी.बी.एस.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये : ‘एमसीआय’ने दिली गतवर्षीची आकडेवारीनागपूर : ‘एमसीआय’ (मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया)ने २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या १० हजार ७२२ नवीन जागा मंजूर करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे केली होती तर, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ६ हजार ७६० नवीन जागांची शिफारस करण्यात आली होती. ‘एमसीआय’चे विधी अधिकारी शिखर रंजन यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून २०१५-१६ शैक्षणिक सत्रात शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या बाबतीत विविध विषयांवर घेण्यात आलेल्या निर्णयाची तुलनात्मक आकडेवारी सादर केली. त्यात वरील माहिती देण्यात आली. या सत्रात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ३९ तर, खासगी महाविद्यालयासाठी ५४ अर्ज आले होते. केंद्र शासनाने ‘एमसीआय’च्या शिफारसीनंतर ११ शासकीय तर, ६ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी दिली. नवीन तुकडी प्रवेशाला परवानगी मिळण्यासाठी ३८ शासकीय तर, ४५ खासगी महाविद्यालयांनी अर्ज केले होते. यापैकी ३८ शासकीय तर, २१ खासगी महाविद्यालयांना नवीन तुकडीची परवानगी देण्यात आली असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. १७ मार्च २०१६ रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. यावर्षी केंद्र शासनाकडे किती वैद्यकीय महाविद्यालयांविषयी नकारात्मक व किती वैद्यकीय महाविद्यालयांविषयी सकारात्मक शिफारस करण्यात आली अशी विचारणा न्यायालयाने आदेशात करून खासगी व शासकीय महाविद्यालयांची वेगवेगळी आकडेवारी मागितली होती. परंतु, ‘एमसीआय’ने यावर्षीची आकडेवारी उपलब्ध नसल्याने गेल्यावर्षीची माहिती सादर केली. यासंदर्भात केंद्र शासनाला शिफारस पाठविण्याची शेवटची तारीख १५ मे आहे. सध्या महाविद्यालयांचे अर्ज विचाराधीन असल्यामुळे २०१६-१७ शैक्षणिक सत्रातील संपूर्ण आकडेवारी १५ मे नंतरच उपलब्ध होऊ शकेल असे स्पष्टीकरण ‘एमसीआय’ने दिले आहे.(प्रतिनिधी)काय आहे मूळ प्रकरण‘एमसीआय’ने यावर्षी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात केंद्र शासनाकडे नकारात्मक शिफारस केली आहे. ‘एमसीआय’च्या अधिकाऱ्यांनी महाविद्यालयाचे निरीक्षण करून विविध त्रुटी काढल्या आहेत. परिणामी या महाविद्यालयात आगामी शैक्षणिक सत्रात नवीन तुकडीला प्रवेश देण्याची प्रक्रिया धोक्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने १७ मार्च २०१६ रोजीचा आदेश दिला होता. यासंदर्भात प्रकाश इटनकर (गडचिरोली) व रामदास वागदरकर (चंद्रपूर) यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.