शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

१० हजारावर जागांची शिफारस

By admin | Updated: April 8, 2016 03:03 IST

‘एमसीआय’ (मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया)ने २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना एम.बी.बी.एस.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालये : ‘एमसीआय’ने दिली गतवर्षीची आकडेवारीनागपूर : ‘एमसीआय’ (मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया)ने २०१५-१६ या शैक्षणिक सत्रात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या १० हजार ७२२ नवीन जागा मंजूर करण्याची शिफारस केंद्र शासनाकडे केली होती तर, खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसाठी ६ हजार ७६० नवीन जागांची शिफारस करण्यात आली होती. ‘एमसीआय’चे विधी अधिकारी शिखर रंजन यांनी गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून २०१५-१६ शैक्षणिक सत्रात शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या बाबतीत विविध विषयांवर घेण्यात आलेल्या निर्णयाची तुलनात्मक आकडेवारी सादर केली. त्यात वरील माहिती देण्यात आली. या सत्रात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी ३९ तर, खासगी महाविद्यालयासाठी ५४ अर्ज आले होते. केंद्र शासनाने ‘एमसीआय’च्या शिफारसीनंतर ११ शासकीय तर, ६ खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना परवानगी दिली. नवीन तुकडी प्रवेशाला परवानगी मिळण्यासाठी ३८ शासकीय तर, ४५ खासगी महाविद्यालयांनी अर्ज केले होते. यापैकी ३८ शासकीय तर, २१ खासगी महाविद्यालयांना नवीन तुकडीची परवानगी देण्यात आली असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. १७ मार्च २०१६ रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. यावर्षी केंद्र शासनाकडे किती वैद्यकीय महाविद्यालयांविषयी नकारात्मक व किती वैद्यकीय महाविद्यालयांविषयी सकारात्मक शिफारस करण्यात आली अशी विचारणा न्यायालयाने आदेशात करून खासगी व शासकीय महाविद्यालयांची वेगवेगळी आकडेवारी मागितली होती. परंतु, ‘एमसीआय’ने यावर्षीची आकडेवारी उपलब्ध नसल्याने गेल्यावर्षीची माहिती सादर केली. यासंदर्भात केंद्र शासनाला शिफारस पाठविण्याची शेवटची तारीख १५ मे आहे. सध्या महाविद्यालयांचे अर्ज विचाराधीन असल्यामुळे २०१६-१७ शैक्षणिक सत्रातील संपूर्ण आकडेवारी १५ मे नंतरच उपलब्ध होऊ शकेल असे स्पष्टीकरण ‘एमसीआय’ने दिले आहे.(प्रतिनिधी)काय आहे मूळ प्रकरण‘एमसीआय’ने यावर्षी चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात केंद्र शासनाकडे नकारात्मक शिफारस केली आहे. ‘एमसीआय’च्या अधिकाऱ्यांनी महाविद्यालयाचे निरीक्षण करून विविध त्रुटी काढल्या आहेत. परिणामी या महाविद्यालयात आगामी शैक्षणिक सत्रात नवीन तुकडीला प्रवेश देण्याची प्रक्रिया धोक्यात आली आहे. या प्रकरणात न्यायालयाने १७ मार्च २०१६ रोजीचा आदेश दिला होता. यासंदर्भात प्रकाश इटनकर (गडचिरोली) व रामदास वागदरकर (चंद्रपूर) यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.