शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सभापतींकडून कंत्राटदारांची शिफारस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महापालिकेतील विषय समित्यांना संवैधानिक अधिकार नाही. असे असतानाही काही विषय समित्यांचे सभापती विकास कामांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेतील विषय समित्यांना संवैधानिक अधिकार नाही. असे असतानाही काही विषय समित्यांचे सभापती विकास कामांना मंजुरी नसतानाही आपल्या मर्जीतील कंत्राटदारांना कामे मिळावीत यासाठी शिफारस पत्र देताहेत. स्थायी समितीकडे प्रस्ताव न पाठविता परस्पर पत्रव्यवहार सुरू असल्याने सत्तापक्षातील अंतर्गत कलह पुढे आला आहे.

विषय समित्यांनी प्रस्ताव मंजुरीसाठी स्थायी समितीकडे पाठविणे आवश्यक आहे; परंतु प्रस्तावाला मंजुरी मिळण्यापूर्वीच काही सभापती कंत्राटदारांना पत्र देत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे. मनपात असा प्रकार यापूर्वी घडला नसून यामागे अर्थकारण असल्याची चर्चा असल्याने सत्तापक्षाची चांगलीच कोंडी झाली आहे.

मनपा अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर दीड महिन्याने स्थायी समिती कार्यालयात वर्दळ वाढली आहे. नगरसेवक फाईल घेऊन स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांचा शोध घेत भटकंती करीत असल्याचे चित्र आहे. भेट झाली तरी संबंधित शीर्षकात निधी नसल्याचे सांगून नगरसेवकांना परत पाठविले जात आहे. दुसरीकडे भाजपचे डझनभर नगरसेवक व काँग्रेसचे दोन-तीन नगरसेवक वगळले, तर अन्य नगरसेवकांना कोणीही वाली नाही. स्थायी समितीत चेहरा बघून फाईल मंजूर करण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे सत्ता पक्षातील नवीन नगरसेवकांना निराश होऊन परतावे लागत आहे.

स्थायी समिती कक्षातून बाहेर पडताच नाराजी व्यक्त केली. चेहरा बघून काम करण्याची प्रवृत्ती वाढल्याचा आरोप केला. झोन बजेटमध्ये मंजूर असलेली फिक्स प्रायोरिटीची कामे होत नाही. वास्तविक राज्य सरकारकडून दर महिन्याला १०८ कोटी जीएसटी, मालत्ता, नगर रचना, बाजार विभागाचे उत्पन्न वाढले आहे. दोन वर्षांत शहरात कोणतीही नवीन कामे झालेली नाही. याचा विचार करता निधीची कमतरता नाही. दोन वर्षांत कामे न होणे हे सत्ता पक्षाचे अपयश आहे. काही पदाधिकारी स्वत: कामे करण्यात व्यस्त असून, त्यांना शहरातील नागरिकांची चिंता दिसत नाही.

चिंचभुवन घाटासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली होती, तर रस्त्यासाठी दोन वर्षांपासून निधी मागत; परंतु निधी नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याचे एका नगरसेवकाने सांगितले. सत्ता पक्षातील काही पदाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे शहरातील विकास थांबल्याचा आरोप होत आहे. दुसरीकडे विरोधी पक्ष नेत्यांना सत्ताधारी जुमानत नसल्याचा आरोप काँग्रेसच्या नगरसेवकांनी केला. यासंदर्भात स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; परंतु ते कार्यालयात नव्हते. फोनवर संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

....

आयुक्तांशी चर्चा केली - वनवे

रखडलेल्या विकास कामांच्या फाईलला तातडीने मंजुरी द्यावी यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्याशी चर्चा केली. लवकरच कामांना मंजुरी मिळेल. विरोधी पक्षाच्या नगरसेवकांच्या फाईल मंजूर होण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी दिली.