शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

अधिग्रहित जमिनी परत करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:42 IST

परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी पाटबंधारे विभागाच्यावतीने या भागात ४३ वर्षांपूर्वी कालव्याची निर्मिती केली होती.

ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : कालव्यावर अतिक्रमण करून घरांचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा : परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी पाटबंधारे विभागाच्यावतीने या भागात ४३ वर्षांपूर्वी कालव्याची निर्मिती केली होती. त्यासाठी काही शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. हल्ली हा कालवा कोरडा असून, काहींनी त्यावर अतिक्रमण करून घरांचे व दुकानांचे बांधकाम केले. हा कालवा निरुपयोगी ठरल्याने पाटबंधारे विभागाने संबंधित शेतकºयांच्या अधिग्रहित जमिनी परत कराव्यात, अशी मागणी भानेगाव शेतकºयांनी केली आहे.खापरखेडा, चिचोली, पोटा, चनकापूर, भानेगाव, वलनी भागातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी पाटबंधारे विभागाने या भागात कालव्याची निर्मिती केली. त्यासाठी १९७४ साली या भागातील काही शेतकºयांच्या शेतजमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकºयांनी अनेकदा केली, परंतु त्यात कधीच पाणी सोडण्यात आलेनाही. हा कालवा वर्षानुवर्षे निरुपयोगी असल्याने तसेच वाढत्या नागरीकरणामुळे चनकापूर येथील वेकोलि कॉलनीतील काहींनी या कालव्यावर अतिक्रमण केले आणि तो सपाट करून त्यावर घरे व दुकानांचे बांधकाम केले.या कालव्याचा काडीचाही उपयोग नसल्याने तसेच त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून बांधकाम केले जात असल्याने, या जमिनी संबंधित शेतकºयांना परत करण्याची मागणी खुद्द शेतकºयांनीकेली.त्याअनुषंगाने या विषयावर सावनेर पंचायत समितीच्या मासिक सभेत चर्चा करण्यात आली. या जमिनींचे अधिग्रहण १९७४ साली करण्यात आले असून, त्यावेळी संबंधित शेतकºयांना त्यांच्या जमिनींचा अत्यल्प आर्थिक मोबदला देण्यात आला होता.ओलितासाठी शेतकºयांना थेंबभरही पाणी न मिळाल्याने या व्यवहारात शासनाने शेतकºयांची फसवणूक केली, असा गंभीर आरोपही शेतकºयांनी केला.सध्या पाटबंधारे विभागाच्या या जागेवर झोपडपट्टी वसली आहे. पाटबंधारे विभागाने काहींना आॅगस्ट-२०१७ मध्ये नोटीस पाठवून अतिक्रमित जागेवरील दुकाने खाली करण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. पाटबंधारे विभाग दरवर्षी या नोटीस पाठविण्याचे काम करीत असून, अतिक्रमण हटविण्याची कारवाई कधीच करीत नाही, असा आरोपही शेतकºयांनी केला.या अधिग्रहित जागेचा शासनाला कोणताही उपयोग नाही. त्यामुळे ती जमीन संबंधित शेतकºयांना परत करण्यात यावी किंवा त्या जागेचा वापर खापरखेडा-भानेगाव- चनकापूर बायपास रोड तयार करण्यासाठी करावा, अशी मागणीही शेतकºयांनी केली आहे.