शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

अधिग्रहित जमिनी परत करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:42 IST

परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी पाटबंधारे विभागाच्यावतीने या भागात ४३ वर्षांपूर्वी कालव्याची निर्मिती केली होती.

ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : कालव्यावर अतिक्रमण करून घरांचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा : परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी पाटबंधारे विभागाच्यावतीने या भागात ४३ वर्षांपूर्वी कालव्याची निर्मिती केली होती. त्यासाठी काही शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. हल्ली हा कालवा कोरडा असून, काहींनी त्यावर अतिक्रमण करून घरांचे व दुकानांचे बांधकाम केले. हा कालवा निरुपयोगी ठरल्याने पाटबंधारे विभागाने संबंधित शेतकºयांच्या अधिग्रहित जमिनी परत कराव्यात, अशी मागणी भानेगाव शेतकºयांनी केली आहे.खापरखेडा, चिचोली, पोटा, चनकापूर, भानेगाव, वलनी भागातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी पाटबंधारे विभागाने या भागात कालव्याची निर्मिती केली. त्यासाठी १९७४ साली या भागातील काही शेतकºयांच्या शेतजमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकºयांनी अनेकदा केली, परंतु त्यात कधीच पाणी सोडण्यात आलेनाही. हा कालवा वर्षानुवर्षे निरुपयोगी असल्याने तसेच वाढत्या नागरीकरणामुळे चनकापूर येथील वेकोलि कॉलनीतील काहींनी या कालव्यावर अतिक्रमण केले आणि तो सपाट करून त्यावर घरे व दुकानांचे बांधकाम केले.या कालव्याचा काडीचाही उपयोग नसल्याने तसेच त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून बांधकाम केले जात असल्याने, या जमिनी संबंधित शेतकºयांना परत करण्याची मागणी खुद्द शेतकºयांनीकेली.त्याअनुषंगाने या विषयावर सावनेर पंचायत समितीच्या मासिक सभेत चर्चा करण्यात आली. या जमिनींचे अधिग्रहण १९७४ साली करण्यात आले असून, त्यावेळी संबंधित शेतकºयांना त्यांच्या जमिनींचा अत्यल्प आर्थिक मोबदला देण्यात आला होता.ओलितासाठी शेतकºयांना थेंबभरही पाणी न मिळाल्याने या व्यवहारात शासनाने शेतकºयांची फसवणूक केली, असा गंभीर आरोपही शेतकºयांनी केला.सध्या पाटबंधारे विभागाच्या या जागेवर झोपडपट्टी वसली आहे. पाटबंधारे विभागाने काहींना आॅगस्ट-२०१७ मध्ये नोटीस पाठवून अतिक्रमित जागेवरील दुकाने खाली करण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. पाटबंधारे विभाग दरवर्षी या नोटीस पाठविण्याचे काम करीत असून, अतिक्रमण हटविण्याची कारवाई कधीच करीत नाही, असा आरोपही शेतकºयांनी केला.या अधिग्रहित जागेचा शासनाला कोणताही उपयोग नाही. त्यामुळे ती जमीन संबंधित शेतकºयांना परत करण्यात यावी किंवा त्या जागेचा वापर खापरखेडा-भानेगाव- चनकापूर बायपास रोड तयार करण्यासाठी करावा, अशी मागणीही शेतकºयांनी केली आहे.