शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अधिग्रहित जमिनी परत करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 00:42 IST

परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी पाटबंधारे विभागाच्यावतीने या भागात ४३ वर्षांपूर्वी कालव्याची निर्मिती केली होती.

ठळक मुद्देशेतकºयांची मागणी : कालव्यावर अतिक्रमण करून घरांचे बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कखापरखेडा : परिसरातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी पाटबंधारे विभागाच्यावतीने या भागात ४३ वर्षांपूर्वी कालव्याची निर्मिती केली होती. त्यासाठी काही शेतकºयांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. हल्ली हा कालवा कोरडा असून, काहींनी त्यावर अतिक्रमण करून घरांचे व दुकानांचे बांधकाम केले. हा कालवा निरुपयोगी ठरल्याने पाटबंधारे विभागाने संबंधित शेतकºयांच्या अधिग्रहित जमिनी परत कराव्यात, अशी मागणी भानेगाव शेतकºयांनी केली आहे.खापरखेडा, चिचोली, पोटा, चनकापूर, भानेगाव, वलनी भागातील शेतकºयांना सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी पाटबंधारे विभागाने या भागात कालव्याची निर्मिती केली. त्यासाठी १९७४ साली या भागातील काही शेतकºयांच्या शेतजमिनी अधिग्रहित करण्यात आल्या होत्या. या कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकºयांनी अनेकदा केली, परंतु त्यात कधीच पाणी सोडण्यात आलेनाही. हा कालवा वर्षानुवर्षे निरुपयोगी असल्याने तसेच वाढत्या नागरीकरणामुळे चनकापूर येथील वेकोलि कॉलनीतील काहींनी या कालव्यावर अतिक्रमण केले आणि तो सपाट करून त्यावर घरे व दुकानांचे बांधकाम केले.या कालव्याचा काडीचाही उपयोग नसल्याने तसेच त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून बांधकाम केले जात असल्याने, या जमिनी संबंधित शेतकºयांना परत करण्याची मागणी खुद्द शेतकºयांनीकेली.त्याअनुषंगाने या विषयावर सावनेर पंचायत समितीच्या मासिक सभेत चर्चा करण्यात आली. या जमिनींचे अधिग्रहण १९७४ साली करण्यात आले असून, त्यावेळी संबंधित शेतकºयांना त्यांच्या जमिनींचा अत्यल्प आर्थिक मोबदला देण्यात आला होता.ओलितासाठी शेतकºयांना थेंबभरही पाणी न मिळाल्याने या व्यवहारात शासनाने शेतकºयांची फसवणूक केली, असा गंभीर आरोपही शेतकºयांनी केला.सध्या पाटबंधारे विभागाच्या या जागेवर झोपडपट्टी वसली आहे. पाटबंधारे विभागाने काहींना आॅगस्ट-२०१७ मध्ये नोटीस पाठवून अतिक्रमित जागेवरील दुकाने खाली करण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. पाटबंधारे विभाग दरवर्षी या नोटीस पाठविण्याचे काम करीत असून, अतिक्रमण हटविण्याची कारवाई कधीच करीत नाही, असा आरोपही शेतकºयांनी केला.या अधिग्रहित जागेचा शासनाला कोणताही उपयोग नाही. त्यामुळे ती जमीन संबंधित शेतकºयांना परत करण्यात यावी किंवा त्या जागेचा वापर खापरखेडा-भानेगाव- चनकापूर बायपास रोड तयार करण्यासाठी करावा, अशी मागणीही शेतकºयांनी केली आहे.