शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

वास्तववादी अनुभूतीचे ‘चलती का नाम गाडी’

By admin | Updated: October 31, 2014 00:49 IST

मानवी जीवनातील दैनंदिन खाचखळग्यांच्या, सुखदु:खांच्या प्रवासाचे प्रातिनिधिक स्वरूप असलेल्या रेल्वे प्रवासातील यात्रेकरूंच्या भावभावनांच्या परस्पर अनुबंधाचे ‘चलती का नाम गाडी’ हे नाटक आज

दीपरंग नाट्य महोत्सव : आनंदी नाट्य संस्थेचे सादरीकरण नागपूर : मानवी जीवनातील दैनंदिन खाचखळग्यांच्या, सुखदु:खांच्या प्रवासाचे प्रातिनिधिक स्वरूप असलेल्या रेल्वे प्रवासातील यात्रेकरूंच्या भावभावनांच्या परस्पर अनुबंधाचे ‘चलती का नाम गाडी’ हे नाटक आज दीपरंग महोत्सवात सादर करण्यात आले. वास्तववादी अनुभूतीचे, सकस लेखनाचे ‘चलती का नाम गाडी’ या नाटकाच्या प्रयोगाने आज रसिकांना जिंकले. मानवी जीवनातील सुखदु:खांचे वास्तव या नाटकात प्रशंसनीय पद्धतीने सादर करण्यात आले. लेखिका अरुणा भिडे आणि सारंग मास्टे दिग्दर्शित या नाटकाने रसिकांचे लक्ष वेधले. सर्वसाधारणपणे सारखाच वाटणारा फ्लॅटफॉर्म, रेल्वेगाड्यांची वर्दळ व सातत्याने प्रवास करणारे प्रवासी, त्यांची जीवनशैली आणि त्यांच्या सुखदु:खाचे हे नाट्य होते. मुंबईत स्वत:चे नाव कमविण्यासाठी येणारे तीन तरुण. त्यातला एक शायर, दुसरा अभिनेता आणि तिसरा संगीतकार. आपल्या लाडक्या लेकीच्या विवाहाचे स्वप्न घेऊन मुंबईला निघालेल्या मायलेकी आणि आपले घरदार विकून भावी आश्वासक जीवनापेक्षेने मुलाकडे कायम राहण्यासाठी निघालेले मायबाप अशा पात्रांभोवती हे नाट्य गुंफले आहे. अनोळखी व्यक्तींच्या संवादातून प्रत्येकाच्याच वेदना जवळपास सारख्याच असतात, याची मांडणी करणारे हे नाट्य रसिकांना रिलेट करीत गुंतवणारे होते. कलात्मक मांडणीने हा प्रयोग उपस्थितांची दाद घेणारा ठरला. जीवनाकडे सकारात्मकतेने पाहताना इतरांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण मदत करावी, असा संदेश या प्रयोगातून देण्यात आला. लेखिकेचे सहज, सोपे ओघवते संवाद, कुशल दिग्दर्शन आणि सर्वच कलावंतांनी समरसून केलेले सादरीकरण यामुळे हा प्रयोग रसिकांची दाद घेणारा ठरला. नेपथ्य हा नाटकाच्या सुखद अनुभूतीचा भाग असतो. याची प्रचिती संजय काशीकर यांच्या नेपथ्यातून आली. यात देवदत्त केळकर, अभिजित खेर, बालकलावंत आर्यन दाभोळकर, विजय मोडक, नीता खोत, कल्याणी गोखले, ओंकार लपालकर, सागर पंडित, सतीश ठेंगडी यांनी भूमिका केल्या. प्रकाशयोजना शिवशंकर माळोदे यांची आणि संगीत अभय पांडे यांचे होते. रंगभूषा चेतना केळकर यांनी केली. याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेल्या ट्रॅव्हलकिंगचे व्यवस्थापक माधुरी व जिंतेंद्र नाकाडे, डॉ. नीलकांत कुलसंगे, अरुणा भिडे, संगीत समीक्षक मधुरिका गडकरी, मंजूषा जोशी यांचे स्वागत आयोजकांतर्फे श्रद्धा तेलंग व प्रभा देऊस्कर यांनी केले.