शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

दंड भरू, पण खड्डे, गतिरोधक, मोकाट जनावरे यांचे काय करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 11:55 IST

नागरिकांच्या समस्या समजावून घेऊन नव्या कायद्याबाबत सरकारची भूमिका व तडजोड शुल्क याचा निर्णय आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घ्यावा, अशी मागणी जनमंचने एका पत्रकातून केली आहे.

ठळक मुद्देजनमंचने वेधले लक्षनवीन मोटार वाहन कायद्याबाबतची भूमिका आचारसंहितेपूर्वी स्पष्ट करावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नव्या मोटार वाहन कायद्यानुसार दंडाची रक्कम दहा पटीने वाढविण्यात आली आहे. कायदे कडक असणे हे जरी आवश्यक असले तरी कायद्याची अंमलबजावणी करणारी प्रशासकीय यंत्रणा भ्रष्टाचाराने बरबटली आहे. यामुळे याकडेही लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे. नागरिकांच्या समस्या समजावून घेऊन नव्या कायद्याबाबत सरकारची भूमिका व तडजोड शुल्क याचा निर्णय आचारसंहिता लागू होण्यापूर्वी घ्यावा, अशी मागणी जनमंचने एका पत्रकातून केली आहे.जनमंचने म्हटले आहे की, अनेक राज्यसरकाने नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतुदी लागू न करण्याचा निर्णय घेतला आहे. हेल्मेट किंवा सिटबेल्ट न घालणे या सारख्या छोट्या गोष्टींसाठी प्रचंड दंडात्मक तरतुदी या कायद्यान्वये करण्यात आलेल्या आहेत. परंतु रस्त्यावरील खड्डे, चुकीच्या पद्धतीने बांधलेले गतिरोधक, रस्त्यांवरील मोकाट जनावरे, रस्त्यावर बंद अवस्थेत असलेली वाहने, वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे विद्युत व टेलिफोन खांब तसेच बंद असलेले पथदिवे यामुळे कित्येक निरपराध नागरिकांचे रोज बळी जात आहेत. मात्र यासाठी जबाबदार सरकारी अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई प्रस्तावित केलेली नाही. आॅटोरिक्षा मीटरने चालण्यास तयार नाही. यांच्यावर वाहतूक पोलीस व आरटीओची कारवाई का होत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. नो पार्किंसाठी मोठ्या दंडाची तरतूद केली जाते, परंतु पार्किंगच्या जागा उपलब्ध न करून देणाºया तसेच नो पार्किंग व पार्किंगचे बोर्ड न लावणाºया कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. नव्या कायद्यात अपघातग्रस्तांना घेऊन चालकांचे हित जोपासले गेले की विमा कंपन्यांचे हित जोपासले जाणार आहे, हा सुद्धा संशोधनाचा विषय असल्याचे जनमंचने पत्रात नमुद केले आहे. शासनाने या संदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी या पत्रातून जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, उपाध्यक्ष राजीव जगताप, महासचिव नरेश क्षीरसागर, शरद पाटील, मनोहर रडके, मनोज चटप, राम आखरे, श्रीकांत दोड, टी.बी. जगताप, दादा झोडे यांनी केली आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा