शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अंकिताच्या पर्सने फोडली वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:48 IST

अंकिता सुनील कनोजिया (वय २२) हिच्यावरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाला तिच्या छोट्याशा पर्सने वाचा फोडल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देसामूहिक बलात्कार हत्याप्रकरण : आरोपींनी शरणागती पत्करल्याची बाबही खोटी ?

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अंकिता सुनील कनोजिया (वय २२) हिच्यावरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाला तिच्या छोट्याशा पर्सने वाचा फोडल्याची खळबळजनक माहिती पुढे आली आहे. एवढेच नव्हे तर, तिची हत्या करणाºया आरोपींनी पोलिसांकडे शरणागती पत्करल्याचीही बाब खोटी असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आरोपींना नाकाबंदी करणाºया पोलिसांनी ताब्यात घेतले अन् चौकशीनंतर त्यांना अटक केल्याची माहिती खास सूत्रांकडून प्रस्तुत प्रतिनिधीला मिळाली आहे. त्यामुळे या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी प्रारंभी शरणागती पत्करल्याची बातमी का पेरली, असा संशय वाढवणारा प्रश्न उपस्थित झाला आहे.पोलीस मुख्यालयात कार्यरत सहायक उपनिरीक्षक सुनील ऊर्फ बबलू कनोजिया यांची अभियंता असलेली मुलगी अंकिता नुकतीच नोकरीला लागली होती. १५ आॅगस्टला तिला तिचे वडील सुनील कनोजिया यांनी मुंबईला नेऊन सोडले होते. रोजच परिवारातील सदस्यांसोबत फोनवरून संपर्कात असलेल्या अंकिताचे तिच्या परिवारातील सदस्यांसोबत शेवटचे बोलणे ४ सप्टेंबरला सकाळी झाले. त्यानंतर तिचा मोबाईल दोन दिवसांपासून लागतच नव्हता. चिंताग्रस्त कनोजिया परिवार अंकिताची माहिती काढण्याचा प्रयत्न करीत होते. मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास त्यांना अंकिताची हत्या झाल्याचे धक्कादायक वृत्त कळले. त्यानंतर नागपुरात एकच खळबळ उडाली. अंकिताची हत्या करणाºया दोन आरोपींनी रत्नागिरी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकारी देऊ लागले.या दोन आरोपींना त्यांच्या नीलेश खोब्रागडे नामक मित्राने आत्मसमर्पण करण्यास सांगितल्याचेही वृत्त आले. मंगळवारी लोकमतने या संबंधाने रत्नागिरी पोलिसांशी संपर्क केला असता तेथील पोलीस अधीक्षक अशोक प्रणय यांनी अशीच काहीशी माहिती देऊन फोन बंद केला. तब्बल तीन दिवसांपासून लोकमत या प्रकरणाची बारीकसारीक माहिती काढण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यातून आज प्रस्तुत प्रतिनिधीला खळबळजनक माहिती मिळाली. त्यानुसार, आरोपींनी आत्मसमर्पण केल्याची माहिती दिशाभूल करणारी असल्याचा दावा खास सूत्रांनी केला आहे. सूत्रांच्या दाव्यानुसार, निखिलेश पाटील, अक्षय वाळूदे आणि नीलेश खोब्रागडे या तिघांनीही अंकितावर बलात्कार केला. तिचा मृतदेह बेळगाव निपाणीच्या जंगलात फेकून दिल्यानंतर आरोपी रत्नागिरी मार्गे नागपूरला यायला निघाले. रत्नागिरी पोलिसांची रस्त्यावर नाकाबंदी सुरू होती.सूत्रांच्या दाव्यानुसार, निखिलेश पाटील, अक्षय वाळूदे आणि नीलेश खोब्रागडे या तिघांनीही अंकितावर बलात्कार केला. तिचा मृतदेह बेळगाव निपाणीच्या जंगलात फेकून दिल्यानंतर आरोपी रत्नागिरी मार्गे नागपूरला यायला निघाले. रत्नागिरी पोलिसांची रस्त्यावर नाकाबंदी सुरू होती. पोलिसांनी या तिघांची कार थांबवली. आतमध्ये डोकावले असता मागच्या सीटवर पोलिसांना एक लेडिज पर्स दिसली. ओढणी अन् असेच कपडेही पडून होते. त्यामुळे पोलिसांना संशय आला. त्यांनी या तिघांना विचारपूस केली.ते गोंधळल्यासारखे झाले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. लेडिज पर्स आणि कपडे आहे, लेडिज कुठे आहे, असा थेट प्रश्न पोलिसांनी त्यांना केला. त्यानंतर नागपूरच्या आमच्या एका मैत्रिणीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याचा आणि मृतदेह कर्नाटक-महाराष्टाच्या सीमेवरील बेळगाव निपाणीनजिक फेकल्याची माहिती निखिलेश आणि अक्षयने पोलिसांना दिली. अशा प्रकारे अंकिताच्या पर्सने तिच्यावरील सामूहिक बलात्कार आणि हत्येला वाचा फोडली.आरोपींवर विश्वास कशापोटी?विशेष म्हणजे, कारमध्ये तिघे होते. सामूहिक बलात्कार आणि हत्या मात्र दोघांनीच (निखिलेश आणि अक्षयने) केल्याचे पोलिसांना सांगितले अन् धक्कादायक बाब अशी की रत्नागिरी पोलिसांनीही आरोपींच्या कथनावर विश्वास ठेवला. तशा प्रकारची माहिती पहिल्या दिवशी रत्नागिरी पोलिसांकडून नागपुरात कळली. एका पोलीस पुत्रीवर सामूहिक बलात्कार झाला अन् तिची हत्या करण्यात आली. त्यानंतरही आरोपींबाबत तब्बल चार दिवस नागपूरकर पोलिसांना या खळबळजनक प्रकरणातील तथ्य कळू शकले नाही. तथ्यहीन माहितीवर नागपूरकर जनताच नव्हे तर पोलीस कर्मचारीही विश्वास ठेवून राहिले. आज शुक्रवारी मात्र या प्रकरणात अंबरनाथ (ठाणे) पोलिसांनी बिल्डर नीलेश खोब्रागडेलाही अटक केली.नीलेशच सूत्रधार ?विशेष म्हणजे, आरोपींना नीलेश खोब्रागडेने आत्मसमर्पण करण्यास सांगितल्यामुळे त्यांनी सामूहिक बलात्कार आणि हत्येचा गंभीर गुन्ह्याचा आरोप स्वीकारला. त्यामागचे कारणही वरिष्ठ सूत्रांकडून कळले. ‘आपला पोलीस दलात चांगला प्रभाव आहे. अनेक वरिष्ठांसोबत आपले संबंध आहेत. तुम्ही आरोप स्वीकारा मी तुम्हाला लगेच बाहेर काढतो. तुमचे लाईफ सेट करून देतो’, असे नीलेशने निखिलेश आणि अक्षयला म्हटले होते, अशी सूत्रांची माहिती आहे. आरोपी स्वत:हून ठाण्यात आला तरी कोणत्याही ठिकाणचे पोलीस त्याला आम्ही पकडून आणल्याचा दावा करतात. ही पार्श्वभूमी असताना रत्नागिरी पोलिसांनी आरोपींच्या आत्मसमर्पणाचा कांगावा का केला, ते कळायला मार्ग नाही.