शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

शैक्षणिक परिवर्तनासाठी समाजापर्यंत पोहोचणार

By admin | Updated: June 29, 2015 03:05 IST

देशातील शिक्षणप्रणालीत भारतीय पारंपरिक मूल्यांचा समावेश करण्यात यावा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे.

योेगेश पांडे  नागपूरदेशातील शिक्षणप्रणालीत भारतीय पारंपरिक मूल्यांचा समावेश करण्यात यावा ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका आहे. यासाठी संघ परिवारातील संघटना कामाला लागल्या आहेत. शैक्षणिक परिवर्तनाची गरज समाजापर्यंत पोहोचावी व समाजमन तयार व्हावे यासाठी संघप्रणीत भारतीय शिक्षण मंडळातर्फे विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. मंडळाने तयार केलेला आराखड्याला समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी जुलै महिन्यात राष्ट्रीय स्तरावर ‘अभिमत मोहीम’ राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. समाजात संघाची पाळेमुळे मजबूत करायची असेल तर सामाजिक क्षेत्रासोबतच शिक्षणक्षेत्राकडेदेखील विशेष लक्ष देण्याचा निर्णय संघाने घेतला आहे. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत याचेच प्रतिबिंब दिसून आले. पारंपारिक मूल्यांचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा अशी भूमिका प्रतिनिधींनी यावेळी मांडली होती. पारंपरिक मूल्यांसोबतच कौशल्यावर आधारित शिक्षणावर भर द्यायला हवा अशी सूचना करण्यात आली होती. सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीदेखील ‘केजी ते पीजी’पर्यंतचे शिक्षण एकाच धोरणाखाली आणण्याची गरज वेळोवेळी व्यक्त केली आहे.शिक्षणक्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय शिक्षण मंडळाने देशातील शैक्षणिक परिवर्तनासाठी अनेक शिक्षणतज्ज्ञांची मदत घेऊन शिक्षणाचा आराखडा तयार केला आहे. विद्यापीठ, माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाचा एकमेकांशी संबंध प्रस्थापित करणे, व्यापक परंतु सर्वसमावेशक अभ्यासक्रम लागू करणे, संशोधन पद्धतीत बदल आणणे, भारतीय मूल्यांचा समावेश इत्यादी मुद्यांचा या आराखड्यात समावेश आहे या आराखड्यावर देशात विविध स्तरांवर चर्चा व्हायला हवी अशी मंडळाची भूमिका आहे. या आराखड्यावर मंडळातर्फे देशभरात विविध परिसंवाद व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. परंतु प्रत्यक्ष समाजापर्यंत हा आराखडा पोहोचावा व त्यातून समाजाला अपेक्षित असणाऱ्या आणखी बाबी समोर यावा यासाठी ‘अभिमत मोहीम’ राबविण्यात येणार आहे. १२ ते १६ जुलै या कालावधीत भारतीय शिक्षण मंडळ अभिमत संग्रह करणार आहे. डॉक्टर, इंजिनिअर, शेतकरी, वकील, व्यापारी,शिक्षक, विद्यार्थी, पालक, संस्थाचालक यांच्यासोबत जास्तीत जास्त प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा मंडळाचा प्रयत्न राहणार आहे. या मोहिमेदरम्यान नागरिकांना ‘फिडबॅक फॉर्म’ देण्यात येणार असून त्यांच्या सूचना गोळा करण्यात येणार आहेत. या सूचनांचा समावेश करुन संबंधित आराखडा २०१६ या वर्षात केंद्र शासनाला सोपविण्यात येणार आहे.