शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

रावतेंचा फर्स्ट गियर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:28 IST

विदर्भाच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा पहिलाच नागपूर दौरा असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

ठळक मुद्दे‘कॉर्पोरेट आॅफिस’वर नाराजी : शिवसैनिक बसणार कुठे ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा पहिलाच नागपूर दौरा असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यातच कार्यालयात ते विशेष संवाद साधणार असल्यामुळे तर विदर्भातील प्रमुख पदाधिकारी तयारीनिशी पोहोचले होते. मात्र गणेशपेठ येथील कार्यालयात पाय ठेवताच रावते यांनी स्थानिक नेत्यावर फर्स्ट गिअर टाकला. त्यांच्या संतापाचे कारण होते कार्यालयाची जागा व स्वरूप. हे पक्ष कार्यालय कमी अन् ‘कॉर्पोरेट आॅफिस’ जास्त वाटत आहे. मात्र बैठकीची व्यवस्था काहीच नाही, या शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली व थेट रविभवनाकडे सर्वांना येण्याचे फर्मान सोडत कार्यालयातून काढता पाय घेतला.दिवाकर रावते रविवारी नागपुरात दाखल झाले. सोमवारी नियोजित कार्यक्रमानुसार ते गणेशपेठेत स्थित पक्ष कार्यालयात स्थानिक प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार होते. यासाठी विदर्भातून प्रमुख पदाधिकारी पोहोचले होते.दुपारी १२ च्या सुमारास रावते पक्ष कार्यालयात आले. तळागाळात काम केलेल्या रावतेंना पक्ष कार्यालयाचा ‘कॉर्पोरेट लूक’ पसंत पडला नाही. दोन डझनाहून अधिक पदाधिकाºयांना एकत्रित बैठकीला बसविण्यासाठी व्यवस्था नसल्याचे पाहून त्यांचा पारा चढला. ‘हे असे कसे पक्ष कार्यालय आहे. येथे बैठक कशी होणार’ या शब्दांत त्यांनी संताप बोलून दाखविला.त्यानंतर तातडीने रविभवनाच्या सभागृहात बैठकीची व्यवस्था करण्यात आली. त्यांच्यासह सर्व पदाधिकारी सभागृहाकडे रवाना झाले. अखेर १.३० वाजता प्रत्यक्ष बैठकीला सुरुवात झाली.कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घ्यारविभवनात पार पडलेल्या बैठकीला जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेकडून विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्याची कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्यात नवी ऊर्जा आणण्याची आवश्यकता असल्याचा पदाधिकाºयांचा सूर होता. रावते यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत पदाधिकाºयांच्या भावना जाणून घेतल्या. विदर्भात पक्ष जुना नाही. गेल्या ४०-४५ वर्षांपासून पक्ष येथे अस्तित्व टिकवून आहे व आता आवाका वाढतो आहे. अनेक आमदारदेखील निवडून आले आहेत. ८० टक्के समाजकारणाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायची आवश्यकता असल्याचे यावेळी रावते यांनी सांगितले.