शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

रावतेंचा फर्स्ट गियर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:28 IST

विदर्भाच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा पहिलाच नागपूर दौरा असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

ठळक मुद्दे‘कॉर्पोरेट आॅफिस’वर नाराजी : शिवसैनिक बसणार कुठे ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भाच्या संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा पहिलाच नागपूर दौरा असल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यातच कार्यालयात ते विशेष संवाद साधणार असल्यामुळे तर विदर्भातील प्रमुख पदाधिकारी तयारीनिशी पोहोचले होते. मात्र गणेशपेठ येथील कार्यालयात पाय ठेवताच रावते यांनी स्थानिक नेत्यावर फर्स्ट गिअर टाकला. त्यांच्या संतापाचे कारण होते कार्यालयाची जागा व स्वरूप. हे पक्ष कार्यालय कमी अन् ‘कॉर्पोरेट आॅफिस’ जास्त वाटत आहे. मात्र बैठकीची व्यवस्था काहीच नाही, या शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली व थेट रविभवनाकडे सर्वांना येण्याचे फर्मान सोडत कार्यालयातून काढता पाय घेतला.दिवाकर रावते रविवारी नागपुरात दाखल झाले. सोमवारी नियोजित कार्यक्रमानुसार ते गणेशपेठेत स्थित पक्ष कार्यालयात स्थानिक प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करणार होते. यासाठी विदर्भातून प्रमुख पदाधिकारी पोहोचले होते.दुपारी १२ च्या सुमारास रावते पक्ष कार्यालयात आले. तळागाळात काम केलेल्या रावतेंना पक्ष कार्यालयाचा ‘कॉर्पोरेट लूक’ पसंत पडला नाही. दोन डझनाहून अधिक पदाधिकाºयांना एकत्रित बैठकीला बसविण्यासाठी व्यवस्था नसल्याचे पाहून त्यांचा पारा चढला. ‘हे असे कसे पक्ष कार्यालय आहे. येथे बैठक कशी होणार’ या शब्दांत त्यांनी संताप बोलून दाखविला.त्यानंतर तातडीने रविभवनाच्या सभागृहात बैठकीची व्यवस्था करण्यात आली. त्यांच्यासह सर्व पदाधिकारी सभागृहाकडे रवाना झाले. अखेर १.३० वाजता प्रत्यक्ष बैठकीला सुरुवात झाली.कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घ्यारविभवनात पार पडलेल्या बैठकीला जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेनेकडून विदर्भाकडे दुर्लक्ष झाल्याची कार्यकर्त्यांमध्ये भावना आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्यात नवी ऊर्जा आणण्याची आवश्यकता असल्याचा पदाधिकाºयांचा सूर होता. रावते यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीबाबत पदाधिकाºयांच्या भावना जाणून घेतल्या. विदर्भात पक्ष जुना नाही. गेल्या ४०-४५ वर्षांपासून पक्ष येथे अस्तित्व टिकवून आहे व आता आवाका वाढतो आहे. अनेक आमदारदेखील निवडून आले आहेत. ८० टक्के समाजकारणाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न करायची आवश्यकता असल्याचे यावेळी रावते यांनी सांगितले.