शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
4
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
5
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
6
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
7
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
8
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
9
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
10
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
11
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
12
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
13
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
14
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
15
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
16
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
17
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
18
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
20
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...

कस्तूरचंद पार्कवरच रावण दहन, हेरिटेज कमिटीने दिली चार अटींवर मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 23:36 IST

शहरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर हेरीटेज कमिटीने चार अटी घालून परवानगी दिली आहे. यामुळे गेल्या ६५ वर्षांपासून येथे आयोजित होणारा दसरा उत्सव या वर्षीही आयोजित  करता येणार आहे.  हेरीटेज कमिटीची बैठक मंगळवारी महापालिकेत झाली.

नागपूर, दि. 5 - शहरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्कवर रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर हेरीटेज कमिटीने चार अटी घालून परवानगी दिली आहे. यामुळे गेल्या ६५ वर्षांपासून येथे आयोजित होणारा दसरा उत्सव या वर्षीही आयोजित  करता येणार आहे.  हेरीटेज कमिटीची बैठक मंगळवारी महापालिकेत झाली. अध्यक्षस्थानी नीरी चे माजी संचालक डॉ. तपन चक्रवर्ती होते. कमिटीचे सदस्य पी.एस. पाटनकर, उज्ज्वला चक्रदेव, सुप्रिया थूल, अशोक मोखा यांच्यासह अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होेते. हेरिटेज कमिटीने कस्तुरचंद पार्कवर रावण दहनाची परवानगी देताना आयोजकांना चार अटींचे काटेकोरपणे पालन करण्याचे बंधन घातले. कमिटीचे सदस्य अशोक मोखा यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, हेरीटेज कमिटी सांस्कृतिक कार्यक्रमांच्या विरोधात नाही.  सांस्कृतिक कार्यक्रम देखील हेरिटेजचाच एक भाग आहे, असे आमचे मानने आहे. विशेषत: जे सांस्कृतिक कार्यक्रम गेल्या अनेक वर्षाापासून सुरू आहेत व ते शहराची ऐतिहासिक परंपरा बनले आहेत, अशा कार्यक्रमांच्या आयोजनासाठी मार्ग काढण्याचीच कमिटीची भूमिका आहे. कमिटीने रावण दहनाची परवानगी दिली. आता आयोजकांनी अटींचे पालन करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.  

अशा आहेत अटी

- कस्तूरचंद पार्कच्या मध्य भागात असलेले स्मारक ज्याला बारादरी असे संबोधले जाते, ते जीर्ण होत आहे. त्यामुळे या कुणी स्पर्श करू नये याची काळजी घ्यावी. यासाठी या स्मारकापासून २० फूट अंतरावर  सुरक्षा कवच उभारावे लागेल. 

- कार्यक्रमाच्या आयोजनावेळी केवळ दुचाकींनाच प्रवेश दिला जाईल.  चारचाकी वाहनांमुळे मैदानातील माती खालवर होते व त्यामुळे मैदानाचे नुकसान होते. 

- या स्मारकापासून रावणाचा पुतळा शक्य तेवढ्या लांब असावा तसेच पुतळ्याची उंची स्मारकाच्या किमान दुप्पट असावी. त्यामुळे पुतळ्याचे दहन करताना स्मारकाला नुकसान होणार नाही. 

- अशा आयोजनांमध्ये आतिषबाजी केली जाते. यामुळे प्रदूषण होते. पर्यावरणाचे होणारे हे नुकसान भरून काढण्यासाठी आयोजक सनातन धर्म ययुवक सभेला  कस्तूरचंद पार्कमध्ये वृक्षारोपण करून वर्षभर जतन करावे लागेस. विशेष म्हणजे त्यांनी लावलेले रोपे पुढील वर्षांपर्यंत जगणे आवश्यक आहे.