शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

राऊत यांचा यू-टर्न, म्हणाले निर्बंधांची गरज नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोना संक्रमण वाढण्याचा हवाला देत जिल्ह्यात येत्या तीन दिवसात निर्बंध लावण्याचे संकेत देणारे पालकमंत्री ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमण वाढण्याचा हवाला देत जिल्ह्यात येत्या तीन दिवसात निर्बंध लावण्याचे संकेत देणारे पालकमंत्री नितीन राऊत यांनी गुरुवारी यू-टर्न घेतला. सध्या जिल्ह्यात कठोर निर्बंध लावण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भविष्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन सर्व घटकांशी चर्चा केल्यानंतरच यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

पालकमंत्री राऊत यांनी सांगितले होते की, जिल्ह्यात कोरोनाची तिसरी लाट दाखल होत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दोन आकड्यांपर्यंत आली आहे. अशा परिस्थितीत व्यापारी व इतर घटकांशी चर्चा करून निर्बंध लावण्यात येतील. दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत उघडी ठेवणे व शनिवार-रविवारी पूर्ण बंद ठेवण्याचे संकेतही त्यांनी दिले होते.

शहरातील व्यापारी संघटनांनीही याला विराेध दर्शविला होता. संक्रमित रुग्णांची संख्या पाहता सध्या कठोर निर्बंध लावण्याची आवश्यकता नसल्याचे मोठ्या संख्येने लोकांचे म्हणणे हाेते. काँग्रेसचेच मंत्री विजय वडेट्टीवार हे सुद्धा राऊत यांच्या वक्तव्याशी सहमत नव्हते. नागपुरात सध्यातरी कठोर निर्बंधांची गरज नसल्याचे त्यांनी उघडपणे म्हटले होते.

-बॉक्स

दबावात बदलला निर्णय

कठोर निर्बंधांबाबत होत असलेला विरोध पाहता पालकमंत्री राऊत यांना आपला निर्णय बदलावा लागला. शहरातील व्यापारी संघटना सातत्याने सांगत होते की, सध्या संक्रमण इतके वाढलेले नाही की, दुकाने बंद करावी लागतील. जर, अशी परिस्थिती निर्माण झालीच तर, ते सरकारच्या निर्णयाच्या समर्थनार्थ उभे राहतील, असेही व्यापारी संघटनांचे म्हणणे होते.