शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नवीन आदेशाने वाढणार रेशनची दुकाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:09 IST

तालुकानिहाय मागविले प्रस्ताव : प्रस्तावानंतरच कळणार नेमकी संख्या लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा ...

तालुकानिहाय मागविले प्रस्ताव : प्रस्तावानंतरच कळणार नेमकी संख्या

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीचा आराखडा अंतिम होईपर्यंत राज्यातील शहरी भागात नवीन स्वस्त धान्य दुकान मंजुरीला १३ डिसेंबर २०१८ रोजी स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती आता उठविण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात रेशन धान्य दुकानांची संख्या आता वाढणार आहे. यासंदर्भात ग्रामीण भागात तालुकानिहाय तर शहरी भागात झोननिहाय प्रस्ताव मागविण्यात आला आहे.

नागपूर जिल्ह्यात १९६८ रेशन धान्याची दुकाने आहेत. यात ग्रामीण भागात १२९० तर शहरी भागात ६७८ रेशन दुकाने आहेत. मागील अनेक वर्षांपासून नवीन रेशन दुकानांना परवानगी नव्हती. ती आता मिळालेली आहे. यासंदर्भात प्रत्येक तालुकास्तरावर त्यांच्या भागात किती नवीन दुकानांची गरज आहे, यासंदर्भात प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव आल्यानंतरच जिल्ह्यात किती रेशन दुकान आणखी वाढणार, याची संख्या निश्चित कळेल. जुन्या नियमानुसार विचार केला तर संस्थेला दुकान द्यायचे असेल तर आठ हजार इतकी लोकसंख्या विचारात घेतली जाते, तर वैयक्तिक दुकानासाठी सहा हजार इतकी लोकसंख्या आहे. लोकसंख्येचाच विचार केला तर ज्या पद्धतीने शहर झपाट्याने वाढले आहे, त्यानुसार नागपुरात रेशन दुकानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्याची गरज आहे. परंतु केवळ लोकसंख्या हाच मुख्य आधार आता राहिलेला नाही. पूर्वी सर्व केशरीधारकांना सरसकट धान्य दिले जात होते. आता प्राधान्य गटालाच धान्य मिळते. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या ही कमी झाली आहे. त्यामुळे संबंधित भागात लाभार्थींची संख्याही विचारात घ्यावी लागणार आहे. यासोबतच वन नेशन वन रेशन योजनाही सुरू आहे. याचाही विचार नवीन दुकान देताना केला जाणार आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकाने

तालुके रेशन दुकान

भिवापूर - ६९

हिंगणा - ७३

कळमेश्वर -७१

कामठी -१०६

काटोल - १२१

कुही - १०४

मौदा -१०६

नागपूर ग्रा. -१३२

नरखेड - ९६

पारशिवनी- ९५

रामटेक -११२

सावनेर - ११७

उमरेड - ८८

शहर - ६७८

कोट

शासनाचे आदेश आले आहेत. त्यासंदर्भात प्रत्येक तालुक्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे. यात संबंधित भागाची लोकसंख्या, नवीन दुकानांची गरज, लाभार्थी संख्या आदींचा समावेश आहे. अहवाल आल्यानंतर त्यासंदर्भात सर्व बाजूंनी विचार करून निर्णय घेतला जाईल. दुकानांची संख्या वाढेल परंतु ती नेमकी किती वाढेल, हे आताच काही सांगता येणार नाही.

रमेश बेंडे, जिल्हा पुरवठा अधिकारी