शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

रेशन दुकानदारांच्या संपाचा शिधापत्रिकाधारकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 21:27 IST

रेशन दुकानदारांच्या मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने रेशन दुकानदार संघटनेने १ जूनपासून संप पुकारला आहे. दुकानदारांनी रेशन वाटप बंद केले आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेपासून रेशन वाटपास सुरुवात होते. परंतु दुकानेच बंद असल्याने त्याचा फटका शिधापत्रिकाधारकांना बसतो आहे.

ठळक मुद्देदुकाने सुरू, वितरण बंद : दुकानात येऊन परत जातात शिधापत्रिकाधारक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशन दुकानदारांच्या मागण्यांची शासनाने दखल न घेतल्याने रेशन दुकानदार संघटनेने १ जूनपासून संप पुकारला आहे. दुकानदारांनी रेशन वाटप बंद केले आहे. महिन्याच्या पहिल्या तारखेपासून रेशन वाटपास सुरुवात होते. परंतु दुकानेच बंद असल्याने त्याचा फटका शिधापत्रिकाधारकांना बसतो आहे.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाने गेल्या अडीच महिन्यापासून देशात लॉकडाऊन केले होते. यामुळे अनेकांचे रोजगार ठप्प पडल्याने रेशनवरील धान्य फार मदतीचे ठरले. अशा संकटाच्या परिस्थितीत कुणीही गरीब उपाशी राहू नये म्हणून रेशन दुकानदारही आपला जीव संकटात घालून कार्यरत होते. परंतु शासनाकडून त्यांची दखलही घेतल्या गेली नाही, अशी खंत व्यक्त करुन आम्हालाही ‘कोविड योद्धा’ म्हणून घोषित करा यासह प्रत्येक रेशन दुकानदाराचा ५० लाख रुपयांचा विमा काढा, अशा विविध मागण्यांसाठी रेशन दुकानदारांनी संप पुकारला. रेशन दुकानदारांच्या मागण्या शासनाला मान्य नसल्याने, शासनाने त्यांच्या मागण्यांसंदर्भात अजूनही ठोस निर्णय घेतला नाही. जून महिन्याचा धान्याचा पुरवठा दुकानांमध्ये पोहचला असून, दुकानदारांनी जूनचे धान्य वितरण करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे गरीब शिधापत्रिकाधारकांचे चांगलेच वांधे झाले आहेत.रेशन दुकानदारांच्या संपाबाबत शहर अन्नधान्य वितरण अधिकारी अनिल सवई यांना विचारले असता, ते म्हणाले की, रेशन दुकानांमध्ये शासनाकडून धान्य पुरवठा सुरू आहे आणि शिधापत्रिका धारकांनाही धान्याचे वितरण करण्यात येत आहे.दुकाने सुरू असली तरी, जोवर शासन रेशन दुकानदारांना विमा सुरक्षा देत नाही, तोवर धान्य वितरण करणार नाही.संजय पाटील, अध्यक्ष, विदर्भ रास्तभाव केरोसीन विक्रेता संघटना

टॅग्स :Strikeसंपfoodअन्न