शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

शिधापत्रिकाधारकांना आता डाळही मिळणार फुकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 21:43 IST

रेशन दुकानातून डाळ गायब झाल्याची ओरड होत असताना, केंद्र सरकार आता शिधापत्रिकाधारकांना डाळ नि:शुल्क देणार आहे. नि:शुल्क डाळीचा पुरवठा रेशन दुकानात झाला असून, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ५ किलो प्रति व्यक्ती तांदूळ नि:शुल्क देण्याबरोबरच प्रत्येक कार्डवर १ किलो डाळही नि:शुल्क मिळणार आहे.

ठळक मुद्देबीपीएल, प्राधान्य गट, अंत्योदय गटातील शिधापत्रिकाधारकांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशन दुकानातून डाळ गायब झाल्याची ओरड होत असताना, केंद्र सरकार आता शिधापत्रिकाधारकांना डाळ नि:शुल्क देणार आहे. नि:शुल्क डाळीचा पुरवठा रेशन दुकानात झाला असून, प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ५ किलो प्रति व्यक्ती तांदूळ नि:शुल्क देण्याबरोबरच प्रत्येक कार्डवर १ किलो डाळही नि:शुल्क मिळणार आहे.केंद्र सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत १ एप्रिलपासून प्रति व्यक्ती ५ किलो मोफत तांदूळ देण्याचा निर्णय घेतला. एप्रिल महिन्यातील बीपीएल, अंत्योदय व प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना १७ हजार ९६७.६ क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. पण मे महिन्याच्या पुरवठ्यात शासनाकडून रेशन दुकानांना गहू व तांदूळ पुरवठा झाला, डाळ मात्र देण्यात आली नाही, त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना डाळ मिळत नसल्याची ओरड होत होती. पण यासंदर्भात विदर्भ रास्त भाव दुकानदार, केरोसीन विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत केंद्र सरकार डाळही नि:शुल्क देणार आहे. नागपूर शहरात ६ झोन आहे. यातील ३ झोनमध्ये तूरडाळ व ३ झोनमध्ये चना डाळ उपलब्ध झाली आहे. शिधापत्रिकाधारकांना ही डाळ नि:शुल्क देण्यात येणार आहे. ज्या झोनमध्ये यंदा चना डाळ आली, पुढच्या महिन्यात त्या झोनला तूरडाळ उपलब्ध होणार आहे.नागपूर शहरात एकूण ६६५ रेशन दुकाने असून, ३ लाखांवर कार्डधारक आहेत. ५५ रुपये किलोप्रमाणे रेशन दुकानात केशरी व बीपीएल कार्डधारकांना एक किलो तूरडाळ उपलब्ध करून देण्यात येते. शहराला महिन्याला ६६७ मेट्रिक टन डाळीची गरज असते.सरकारने या महिन्यात डाळीचे पैसे घेतलेले नाहीत. मात्र डाळीचा पुरवठा केला. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना डाळ नि:शुल्क द्यायची आहे. प्रति व्यक्ती ५ किलो नि:शुल्क तांदळासोबत प्रति कार्डधारकांना १ किलो तूरडाळ नि:शुल्क मिळणार आहे. त्यामुळे कार्डधारकांनी डाळीचे पैसे रेशन दुकानदारांना देऊ नयेत व रेशन दुकानदारांनी डाळीचे पैसे कार्डधारकांकडून घेऊ नये.संजय पाटील, अध्यक्ष, विदर्भ रास्त भाव दुकानदार, केरोसीन विक्रेता संघटना

टॅग्स :Governmentसरकारfoodअन्न