शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ; ना आरोपींची ‘लिंक’, ना नाण्यांचा शोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 10:45 IST

Nagpur News राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून वाकाटककालीन मौल्यवान नाणी व अन्य पुरातन वस्तूंच्या संशयास्पदरीत्या गायब होण्याचे प्रकरण उघडकीस येऊन पाच वर्षांचा कालावधी झाला.

ठळक मुद्देनाणे गायब प्रकरणात पाच वर्षानंतरदेखील फारशी प्रगती नाहीविद्यापीठाकडूनदेखील पाठपुरावा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विभागातून वाकाटककालीन मौल्यवान नाणी व अन्य पुरातन वस्तूंच्या संशयास्पदरीत्या गायब होण्याचे प्रकरण उघडकीस येऊन पाच वर्षांचा कालावधी झाला. मात्र अद्यापपर्यंत या प्रकरणात ना नागपूर विद्यापीठाने ठोस कारवाई केली आहे, ना पोलीस विभागाला आरोपी सापडले आहेत. या प्रकरणातील ‘लिंक’ अद्यापदेखील सापडली नसल्याने विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

१९६७ साली पवनारजवळील शेतात सापडलेली २१६ नाणी विभागात नसल्याची बाब २०१६ मध्ये लोकमतने समोर आली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात संबंधित नाण्यांची किंमत कोट्यवधींमध्ये असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले होते. त्यानंतर विद्यापीठाने अगोदर प्राथमिक चौकशी केली व दबावानंतर पोलिसांत नाणी गहाळ झाल्याची तक्रार केली होती. तक्रार दाखल झाल्यानंतर अंबाझरी पोलीस ठाण्याच्या एका ‘एपीआय’कडे तपासाची जबाबदारी देण्यात आली. संबंधित ‘एपीआय’ने सखोल चौकशी केली व संबंधित प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावे, असा अहवालदेखील दिला. प्रकरणाची फाईल अंबाझरी पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखेकडे पाठविण्यात आली. मात्र लगेच ती फाईल परत आली. त्यानंतर या प्रकरणात फारशी प्रगती झाली नाही. विशेष म्हणजे सद्यस्थितीत पोलीस तपास कुठवर आला आहे याची विद्यापीठातील अधिकाऱ्यांना काहीच माहिती नाही. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी कुलगुरू डॉ.सुभाष चौधरी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

विद्यापीठाची चालढकल भोवली

संबंधित नाणी गहाळ झाल्याची विद्यापीठाने तक्रार केली होती. नाण्यांच्या तपासाला वेग यावा, यासाठी विद्यापीठाने चोरीची तक्रार दाखल करावी, अशी सूचना करणारे पत्र पोलिसांनी विद्यापीठाला दिले होते. यातही बराच वेळ घालविल्यानंतर विद्यापीठाने नाणेचोरीची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तपासात फारसे काही गवसले नव्हते.

माजी विभागप्रमुखांवर कारवाई का नाही ?

प्राथमिक चौकशीच्या आधारावर विभागातील नाणी गायब झाल्याचा निष्कर्ष तत्कालिन कुलगुरूंनी काढला होता. नाणी सांभाळण्याची जबाबदारी विभागप्रमुखाची असते. असे असतानादेखील माजी विभागप्रमुख डॉ.प्रदीप मेश्राम यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात आली नाही. एरवी विद्यार्थ्यांचे थोडेसे शुल्क जरी शिल्लक असेल तर त्याची कागदपत्रे थांबविली जातात. या प्रकरणात तर विभागातून नाणी गायब झाल्याचा पुरावा विद्यापीठाला मिळाला होता. परंतु तरीदेखील माजी विभागप्रमुखांवर विद्यापीठाकडून कुठलीही कारवाई का झाली नाही हा प्रश्नदेखील अनुत्तरितच आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ