शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

विदर्भात रिफायनरी प्रकल्पासाठी वेगाने हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:09 IST

नागपूर : ऑइल रिफायनरी प्रकल्प विदर्भात उभारण्यासाठी वेगवान हालचाली केल्या जात आहेत. नुकतेच मुंबईतील रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल तज्ज्ञ ...

नागपूर : ऑइल रिफायनरी प्रकल्प विदर्भात उभारण्यासाठी वेगवान हालचाली केल्या जात आहेत. नुकतेच मुंबईतील रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल तज्ज्ञ विनायक मराठे यांनी नागपुरात केंद्रीय भूपृष्ठ परिवहनमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, हा प्रकल्प विदर्भात उभारण्याबाबत माहिती दिली. यानंतर नितीन गडकरी यांनी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र देत, रिफायनरी प्रकल्प विदर्भाला देण्याचे आवाहन केले. या बैठकीला विदर्भातील रिफायनरी सल्लागार प्रदीप माहेश्वरी आणि जे. एफ. साळवे उपस्थित होते.

भेटीदरम्यान मराठे यांनी रिफायनरीसाठी विदर्भाच्या अनुकूल परिस्थितीवर प्रकाश टाकला. नागपूरच्या ४०० ते ४५० कि.मी.च्या परिघात कोळसा, चुनखडी, लोह व मँगेनीजचे उत्पानद होते. त्यानुसार मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करणारा ऑईल रिफायनरी प्रकल्प विदर्भाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण ठरू शकतो, असे मराठे यांनी सांगितले.

सध्या विदर्भात तेल, पेट्रोकेमिकल्स व पेट्रोलियम पदार्थ ८०० ते १००० कि.मी. अंतरावरून येतात. विदर्भात हा प्रकल्प झाल्यास रत्नागिरीच्या पश्चिम तटावरून नागपूरपर्यंत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाला समांतर पाईपलाईन टाकून कच्चे तेल इथंपर्यंत आणणे शक्य आणि कमी खर्चाचे आहे. याचप्रमाणे निर्माण झालेले पेट्रोलियम पाईपलाईनद्वारे ५०० कि.मी.च्या परिघात वितरित करता येईल. यामुळे लॉगिस्टिकचा कोट्यवधींचा खर्चही वाचेल, असा दावा त्यांनी केला. शिवाय पेटकॉक, बीटूमेन, पिटीए आदी रसायन परदेशातून आणण्यास लागणारा खर्चही वाचेल. इंडोरामा, सिमेंट कंपन्यांसह लघु उद्योगांनाही प्रकल्पाचा लाभ मिळेल, असा विश्वास मराठे यांनी व्यक्त केला. यासोबत २५ हजार लोकांना प्रत्यक्ष, तर ४ लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची हमी त्यांनी दिली. नितीन गडकरी यांनी प्रकल्प उभारण्यासाठी संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

विदर्भ अनुकूल : गडकरी

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पुन्हा पत्र सादर केले आहे. रिफायनरी प्रकल्पासाठी विदर्भ पूर्णपणे अनुकूल असल्याचे सांगत, नागपूरपासून ४० कि.मी.वर १५ हजार एकर जागा उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. गोसी खुर्द प्रकल्पासह नागपूर महापालिकेकडून सांडपाण्यावर प्रक्रिया करून २०० द.ल.घ.मी. पाणी पुरवठा करण्याची माहिती दिली. जवळपास मोठे जंगल असल्याने कार्बन प्रदूषणाची समस्या येणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.